धर्माचा असा बाजार कुठल्या व्यवस्थेस हितकारक ठरणार आहे? 
पडघम - सांस्कृतिक
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 06 September 2018
  • पडघम सांस्कृतिक हिंदू Hindu मुस्लिम Muslims धर्म Religion

समाजधारणेसाठी म्हणून धर्मसंकल्पना विकसित झाली. एका प्रचंड जनसमुदायाच्या सामूहिक वर्तनाचे परिचालन योग्य दिशेने व्हावे यासाठी धर्मश्रद्धा आणि त्यातील नैतिक मूल्यांच्या रुजुवातीस प्रारंभ झाला. ही रुजुवात व्यवस्थेच्या शिस्तबद्ध वाटचालीसाठी होती की, एका सुव्यवस्थित रचनेतील विवेक सुटून तिच्या झुंडी व्हाव्यात यासाठी होती, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धारणेत अडसर निर्माण झाल्यास अथवा काही संकल्पना कालबाह्य ठरत असल्यास या धर्मसंकल्पनांची परखड चिकित्सा व्हायला हवी, असाही विचार या नीतिविषयक संकल्पना, श्रद्धाभाव रुजू करणाऱ्यांनी मांडून ठेवलेला असणारच. पण मग तरीही अशा धर्मश्रद्धांची चिकित्सा करण्याचे का टाळले जाते?

कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती अंधश्रद्धांना निमंत्रण ठरत असते, मानवी इतिहासातील उत्क्रांतीच्या टप्प्यावर आधुनिकतेच्या प्रबोधनपर्वानंतरही सुधारणांचा आग्रह धरण्यात आलेला आहेच. वास्तवाचे परीक्षण करणारा हा प्रवाह थोडासा अंधुक असेल, पण अखेरीस त्याचे अस्तित्व कायम राहिलेले आहे. मग तरीही जनसमुदायांकडून विवेकाला सोडचिठ्ठी देण्याचे प्रकार का घडतात? झारखंडमधील एका मृतदेहाचा धर्म ठरवण्याची चढाओढ ही अशाच प्रकारे आपल्या समाजव्यवस्थेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करणारी आहे.

या घटनांमुळे पुन्हा आपल्या वाटचालीसमोरील प्रश्न आ वासून उभे राहतात. धनबादनजीक झालेल्या अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेल्या या युवकाचा मृतदेह नेमका कोणत्या धर्माचा, असा प्रश्न स्थानिक पोलिस यंत्रणेसमोर पडला आहे. त्याचा मृतदेह कोणाकडे सोपवावा, यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्यानंतर दोन भिन्नधर्मीय कुटुंबीयांनी या मृतदेहासाठी दावा केला आहे. या युवकाच्या हातावर ‘जय श्रीराम’ असे गोंदवल्यामुळे एका हिंदू कुटुंबाने त्याच्या पार्थिवाची मागणी केली आहे, तर याचवेळी या युवकाची खतना झाल्याचेही समोर आल्यामुळे एका मुस्लिम कुटुंबानेही त्याच्या मृतदेहाचा ताबा मागितला आहे. तपासासाठी आता यंत्रणा डीएनए चाचणीचाही पर्याय आजमावून पाहणार आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

या घटनेत भलेही स्थानिक पोलिसांसमोर मृतदेहाचा धर्म कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला असला तरी हा प्रश्न खरा आपल्या समाजव्यवस्थेसमोरील अडसर मानायला हवा. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही धर्माचे भूत असे मानगुटीवर बसायला हवे का? मृतदेहाला असतो का कुठला धर्म? हा प्रश्न पडण्याइतपत आपला विवेक ढळावा अशी आपली वाटचाल झाली आहे का? अर्थात त्या घटनेत त्या मृतदेहावरील सोपस्कार पार पाडण्यासाठी त्याच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला जाणे साहजिक आहे. पण एक समाज म्हणून, व्यवस्था म्हणून आपल्याकडे एखाद्याचे निव्वळ माणूस असणे एवढे गौण ठरावे का? ही खरोखरच अस्वस्थ करणारी बाब आहे.

प्रथमदर्शनी साधी वाटणारी ही घटना आपल्या वाटचालीचा पट नीट तपासून पहायला हवा. मानवता हाच मोठा धर्म आहे, हे मूल्य आपल्या व्यवस्थेला का महत्त्वाचे वाटत नाही? त्या-त्या काळातील समाजव्यवस्थेच्या धारणेसाठी म्हणून दृढमूल झालेल्या नीतीविषयक संकल्पना या मुळात माणसातला आपपरभाव नाहीसा करण्यासाठी, तसेच हे जनसमुदाय अधिक उन्नत व्हावेत यासाठी प्रस्थापित झालेल्या आहेत. असे असतानाही आज या समूहाचे वर्तन याच्या अगदी विरुद्ध टोकाचे का बनते आहे? नीतिविषयक संकल्पनांचे स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष फरक आज असे विद्रूप स्वरूप धारण करून अखिल मानवतेसमोरील अडसर का बनायला लागले आहेत? 

पाश्चिमात्त्य व्यवस्थांवरील धार्मिक पगडा झुगारून देताना आधुनिकीकरणाच्या टप्प्यात धर्माचे वर्णन अफूची गोळी म्हणून करण्यात आलेले आहे. समूहातील विवेकवाद, चिकित्सक वृत्ती संपल्यास या नीतीविषयक आचारसंहितेच्या अवडंबरावर स्वार झालेल्या झुंडींचा इतिहास ताजा असल्यामुळे हे विवेचन अनाठायी मानता येत नाही. पण भारतीय उपखंडातील नीतीविषयक संकल्पनांच्या मुळाशी खोलवर कुठेतरी अखिल मानवजातीच्या कल्याणाचे, वैविध्यातील ऐक्याचे सूत्र निश्चितपणे आढळते. हे सूत्र अधिक प्रज्ज्वलित करण्याऐवजी आपला समूह त्याच्यावरील अनुषंगिक आवरणे कवटाळत बसला आहे का? उपनिषदांमधील मानवतावादाच्या अंत:प्रेरणेपेक्षा माणसा-माणसांत द्वेष निर्माण करणाऱ्या बेगडी अस्मितांचे जाळे आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटते का? 

या संकल्पनांची काळानुरूप चिकित्सा करायला हवी, तरच समाजव्यवस्थेच्या विकासातील उर्ध्वगामी टप्पे पादाक्रांत करता येतील. अन्यथा सध्या अनुभवण्यास मिळत असलेल्या आंधळ्या अस्मितांचा अनाचार व पोकळ धर्मश्रद्धांचा बाजार कोणत्याही मानवीसमूहाचे कसलेच हित साधू शकणार नाही. 

अखिल मानवजातीच्या कल्याणास आक्षेप घेणारी धर्मश्रद्धा कुठल्याही समूहाच्या उपयोगाची नसते. मानवी समुदायाच्या विकासात अडसर निर्माण करणारे विचार प्रवाहात टिकू शकत नाहीत. नीतीविषयक संकल्पनांचा विधायक, व्यापक विचार हा उदारमतवादाचा, मानवतावादाचा आविष्कार असतो. त्यामुळेच धर्म हा अखिल मानवी समूहाच्या उत्थानाचा मार्ग ठरावा; त्याचा असा बाजार कुठल्या व्यवस्थेस हितकारक ठरणार आहे? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......