विकीपीडियाची संकल्पना उत्तम असली तरी त्याचा वापर ‘अज्ञाना’ला ‘ज्ञाना’च्या पंगतीत बसवण्यासाठीच करतो आपण!
पडघम - देशकारण
मंदार काळे
  • ‘विकीपीडिया’चे बोधचिन्ह आणि ‘भारत देशाची संकल्पने’चं संकल्पचित्र
  • Mon , 06 August 2018
  • पडघम देशकारण विकीपीडिया Wikipedia भारत देशाची संकल्पना Idea of India ट्रोल Troll

‘विकिपीडिया’ हा खुला माहितीकोश आणि ‘भारत देशाची संकल्पना’ यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती, त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो, तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरताच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टलवर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे ‘मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आहे असे वाटते,’ म्हणून ती आपला आकार बदलून त्रिकोणी होत नसते.

तरीही माहिती-संकलन म्हणून विकीपीडियाचे स्थान नाकारता येणार नाही.

असे असले तरी भारताशी संबंधित सर्व पाने मी सर्वस्वी अविश्वासार्ह मानतो मी!

याचे कारण आपल्या वृत्तीत आहे. सर्व उत्तम शोधांची/पर्यायांची एकतर आपण स्वार्थासाठी वाट लावतो किंवा कुठल्या मसण्या जुन्या ग्रंथाचे नाव सांगून त्यात हे आम्ही आधीच शोधले होते म्हणून त्यावर ‘मेड इन इंडिया’चे लेबल लावून ‘जितं मया’चा शड्डू ठोकतो. त्या पलीकडे तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे त्या जुन्या ग्रंथाचा आधार घेऊन पुढचा एखादा महत्त्वाचा शोध, पाश्चात्यांपूर्वी आपणच लावण्याचा. पण निर्मिती बुद्धीचे नि कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आयते आपले लेबल लावणे सोपे असते. तद्वतच विकीपीडियाची सर्व मिळून माहिती नि ज्ञान संकलनाची संकल्पना कितीही उत्तम असली तरी त्याचा वापर ज्ञानाच्या देवाणघेवाणीऐवजी अज्ञानाला ज्ञानाच्या पंगतीत बसवून ज्ञानाची महतीच कमी करतो आपण. इतर कुणी उंच असेल तर आपली उंची कशी वाढेल हा आपल्यासमोरचा प्रश्न नसतो, त्या उंच माणसाची कशी कमी करता येईल, हा प्रश्न आपण सोडवणुकीसाठी घेतो. राजकारणापासून, साहित्यकारणापर्यंत सर्वत्र एकाच माळेचे मणी.

याशिवाय आपण या साऱ्यांमध्ये प्रगतीचा विचार करण्याऐवजी, पुढच्या आवृत्तीत अधिक काय देता येईल, द्यावे अशी मागणी करावी या विचाराऐवजी आहे त्यात काय वाचवता येईल असा ‘दात कोरून पोट भरण्याचा’ प्रयत्न करतो. इतरांचे उत्पादन, नेता इत्यादींना आमचेच म्हणण्यामागेही नेमका हाच आळस असतो. आपल्याकडे मोबाईलचा शोध लागला नाही, पण मिस्ड कॉलचा शोध लागला, हे या संदर्भातील बोलके उदाहरण.

वीकिपीडियाचा असाच गैरवापर विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी भरपूर केला आहे. जगातले सगळे किंवा प्राचीन ग्रेट ते आमचेच असल्या ‘माहिती’ने पानेच्या पाने भरली आहेत. ‘आपण वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील सर्व महिने ही मुळात संस्कृत नावे आहेत’ अशी मखलाशी नेहमीप्रमाणे शाब्दिक खेळ करून सिद्ध करणारे पेज अस्तित्वात आहे. असल्या खोटारडेपणाने असंख्य पाने भरलेली आहेत. नेहरू कुटुंबियांच्या पेजेसवर हे पुंड वर्षानुवर्षे धुमाकूळ घालत आहेत. त्यांचे पूर्वज मुस्लिम होते, ही माहिती काढून टाकल्यावर पुन्हा पुन्हा भरली जाते.

आज प्रथमच या पुंडाना समोरून तसेच प्रत्युत्तर दिले गेले आहे. आता यात समाधान मानायचे की, आता ‘माझे असत्य विरुद्ध तुमचे असत्य’ असाच सामना या देशात पाहायला मिळणार आणि वस्तुनिष्ठ अथवा पडताळून पाहता येण्याजोगे खरे किंवा सत्य असे काही शिल्लकच राहणार नाही, याची खंत बाळगावी हे समजेनासे झाले आहे. सारे काही ‘मतांनी’ ठरवायचे, वस्तुनिष्ठतेला हद्दपार केलेला समाज काय लायकीचा असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. या समाजात स्त्रीला आपले निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्याची सिद्धता मागणाऱ्या समाजात काही फरक असेल का? ‘तुम्ही या बाजूचे का त्या बाजूचे ते सांगा. याकूबाला फाशी देणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे उत्तर द्या मुकाट, मुळात फाशीच हवी का नको अशा फालतू तात्त्विक चर्चा नको,’ म्हणणाऱ्या स्वयंघोषित वैचारिक गुंडांची संख्या आणखी वाढत जाणार याची भीती वाटू लागली आहे.

रस्त्यावरची झुंड एकाच माणसाला घेरून मारते, हे स्वयंघोषित वैचारिक पुंड पिढीच्या पिढी... कदाचित आणखी पुढच्या काही पिढ्यांना ठार मारत असतात.

............................................................................................................................................

लेखक मंदार काळे तरुण अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Prashant

Tue , 07 August 2018

superb article Sir!


vishal pawar

Mon , 06 August 2018


Alka Gadgil

Mon , 06 August 2018

Yalach post truth mhantat


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......