बा विठ्ठला, ज्ञानियाचे ‘पसायदान’ जगण्याचे आणि तुकोबाचा अभंग अंगी बाणण्याचे बळ आम्हाला दे!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
देवेंद्र शिरुरकर
  • पंढरपूरची विठ्ठल मूर्ती
  • Mon , 23 July 2018
  • पडघम कोमविप विठ्ठल Vitthal वारी wari आषाढी एकादशी Ashadhi Ekadashi

परमेश्वराचे अस्तित्व नाही अशी जागाच अस्तित्वात असणे शक्य नाही. त्याचे आणि त्याने निर्माण केलेल्या चराचरसृष्टीचे नाते अभेद्य आहे. ज्याने हे विश्व निर्माण केले आहे, तोच या विश्वाचा कर्ताधर्ता, चालक, मालक आणि प्रेरकही असणारच. परमेश्वरी अस्तित्वाच्या प्रेरणा निसर्गाशी अधिक मिळत्या-जुळत्या असतात. म्हणूनच आपण नंतरच्या औपचारिक चौकटी उभारणारे मर्त्य मानव निसर्गदत्त अधिकारांची भाषा बोलत असतो.

हा विश्वनियंता आपल्याला केवळ या व्यवस्थेत आणून ठेवत नाही, तर काही विहित भूमिका पार पाडण्याचे बंधनही घालतो. तसेच या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे मार्गही शिकवतो. हे मार्ग अनुसरताना पाळावयाची नैतिक संहिता भंग होऊ द्यायची नाही, हा नियम कटाक्षाने पाळला जाणे त्याला सर्वांकडून अभिप्रेत असते. ठराविक कर्तव्ये पार पाडताना सगळे काही संकलित केलेले तिथल्या तिथे एका क्षणभरात सोडण्याची वृत्ती अंगी बाळगणे आणि पुन्हा त्याच्या आदिभौतिकात स्वत्व विलीन करणे ही प्रक्रिया म्हणजेच ‘वारी’ असते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आषाढी एकादशीस गत अनेक शतकांपासून आपण हा उपक्रम अव्याहतपणे करतो आहोत. परमेश्वर, जगनियंता आणि आणखी बऱ्याच विशेषणांनी उल्लेखित सर्वसमावेशक निर्मात्याकडे जाताना सर्वस्व-समर्पणाचा हा सोहळा आमच्या नित्य जगण्यातही बा विठ्ठलाने निर्माण करावा. व्यवस्थेच्या चालकाबद्दल आदर, प्रेम आणि विश्वास असणे गैर नाही. तो अभिव्यक्त करण्याचा अजरामर सोहळाही अवर्णनीयच मानावा लागेल. फक्त या सोहळ्याचा मतितार्थ लक्षात न घेता धर्म, अंधश्रद्धा, तुम्ही आणि आम्ही हा अमंगळ भेदाभेद आपल्या दैनंदिनीत का यायला लागला? असा विठुरायाचा तोकडा सवाल आपण अनुत्तरित ठेवता कामा नये.

व्यावहारिक पातळीवर सर्वच क्षेत्रांत अंगिकारण्यात आलेला दुजाभाव हा केवळ पाप आणि पुण्याच्या कल्पनांना तडे देणारी बाब नसून समाजव्यवस्थेतला हा दुटप्पीपणा आपल्या वर्तनपद्धतीबद्दलच शंका उपस्थित करायला लागतो. मुखी हरीनामाचा गजर आणि प्रत्यक्ष वर्तन मात्र दांभिकाचे, असा व्यवहार ना ‘ज्ञानेश्वरी’त आहे ना ‘गाथे’मध्ये. मग पांडुरंग कसा पावणार?

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

विश्वनियंता आणि आपण सगळे यातील अंतर वाढवत दांभिकतेची पुटे चढलेली व्यवस्था निर्माण करण्यात आली. परमेश्वरानेच दिलेल्या बुद्धीचा समाजवास्तवातील वापर थांबला. योग्य-अयोग्यतेचा सारासार विचार खुंटला. पांडुरंग सर्वांचा आहे, हे विश्वच त्याने निर्मिलेले आहे. तो माझ्यात आहे, तसाच तुझ्यातही आहे. अगदी तो त्याला न मानणाऱ्या नास्तिकातसुद्धा आहे. त्याचे तसे असणे मला मान्य करायचे आहे. हा विचार ज्याने निर्माण केले, त्यानेच आपल्याला दिला आहे, याचाही विसर पडला.

या अंध:काराचे इमले तोडत, धर्माच्या, निसर्गाच्या उपजत रचनांवर चढवण्यात आलेले दांभिकतेचे आवरण दूर सारत ध्यान-ज्ञानसाधनेच्या जोरावर संत ज्ञानेश्वरांनी तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार एकनाथ या समविचारी संतांसोबत तो विठ्ठल पुन्हा एकदा भक्तीसंप्रदायात आणला. दावे-प्रतिदावे, वादविवादात अडकलेल्या व तत्कालिन मोहपाशाचे जंजाळ सोडवू पाहणाऱ्या एका विशाल मऱ्हाटी जनसमुदायाला अव्याहतपणे पंढरीस उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाकडे जाणारी वाट दाखवली. ही वाट अंध:कारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अहंभावातून त्यागाकडे, अस्मितांच्या दुराभिमानातून अस्मितांची जळमटे गळून पडण्यासाठीच निर्मिली होती.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

म्हणूनच ‘वारी’ हा निव्वळ ईशप्राप्तीचा पोथिनिष्ठ मार्ग नव्हता, तर तो तुमच्या-आमच्यातला विठ्ठल जागवण्यासाठी विचारपूर्वक सुरू केलेला जागर ठरला. रंजल्या-गांजल्याच्या सेवेसाठी समाजव्यवस्थेतील अहंभाव जाळण्याची साद घालणाऱ्या भागवत पंथाचा हुंकार होता. भौतिक जगण्यातले रडगाणे, जात-पंथ, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भिंती तोडून या जगातल्या सर्वोच्च विश्वात्मक देवाशी तादात्म्य पावण्याचा हा यथोचित मार्ग आहे. या विश्वाच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी एक ध्वज खांद्यावर घेऊन एकाच पथावर चालणाऱ्या सकल जणांच्या मुखीचा 'जय जय राम कृष्ण हरी' हा वेदांचा प्रतिघोष ठरला.

‘स्व’ विसरून, अहंभाव जाळून एकरूप होत जाणारी दिंडी एकाच वेळी स्वत:शी आणि चराचर सृष्टीच्या धारणकर्त्याशी एकरूप होते. विश्वव्यापक केशवाच्या चरणी लीन होणेच वारकऱ्यांच्या  ‘ग्यानबा-तुकाराम’ला  अपेक्षित आहे. तर आपल्या तना-मनातील विठुबाने क्षणभर तरी दर्शन द्यावे, ही आसही आजतागायत चिरंतन आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

आळंदी, देहू आणि भागवत संप्रदायातील तुळशीची माळ ज्या-ज्या घरात आहे, त्या प्रत्येक ठिकाणाहून निघालेला हा भक्तीप्रवाह अखेरीस आषाढीला त्या पांडुरंग चरणी समर्पित होतो आणि ‘अवघा रंग’ एक जाहल्याचा साक्षात्कार अनुभवण्यास मिळतो.

तुझ्यासमोर माथा टेकवताना जळालेले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार आमच्या दैनंदिन जगण्यातही जाळण्याची शक्ती दे. पाऊसपाणी तर तूच पाडतोस, तू विश्वनिर्धारक, जगाचा तारणहार आहेस. तुझेच रूप असलेल्या ज्ञानियाचे ‘पसायदान’ जगण्याचे आणि तुकोबाचा अभंग प्रत्यक्षात अंगी बाणण्याचे बळ आम्हाला दे, एवढीच काय ती बा विठ्ठलचरणी आपली करुणा!

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......