अजूनकाही
प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो...
एका बाजूने स्त्रीचा ‘जननी’ म्हणून सन्मान केला जातो, तर दुसरीकडे तिच्यावर अमानुष अत्याचार होत असतात. या संदर्भात सर्वच समाज कमीअधिक प्रमाणात दोषी असल्याचे दिसते. असं असलं तरी जवळपास सर्व समाजांत स्त्रीच्या अदभुत जननक्षमतेबद्दल भीतीयुक्त आदर दिसून येतो. खुद्द स्त्रीलासुद्धा मातृत्वाची ओढ असते. मात्र एकविसाव्या शतकातील तरुण स्त्रिया या समजांना आणि श्रद्धांना आव्हान देत आहेत...
एरिक फ्रॉम या मानसशात्रज्ञाने लग्नसंस्थेची मानसिक गरज सर्वांत सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. या जगात माणूस तसा एकटा असतो. या एकटेपणाच्या भावनेने त्याला अत्यंत असुरक्षित बनवलेले असते. नुसत्या प्रेमाने ही भावना जात नाही. निष्ठा आणि प्रेम या दोन गोष्टी हातात हात घालून माणसाच्या आयुष्यात आल्या, तरच माणसाच्या मनात सुरक्षिततेची आणि रुजलेपणाची सुंदर भावना तयार होते...
हे आंदोलन शिक्षण व नोकरीत आरक्षण हवे की नको, कुणास हवे व कुणास नको, किती हवे व किती नको, या मुद्द्यांवरसुद्धा नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे, या मुद्द्यावर हे आंदोलन उभे राहिले आहे. नेमके बदल काय हवेत, याची कुणाला कल्पना नसेल, पण आपली सध्याची शिक्षण व्यवस्था सडलेली आहे, किडलेली आहे, कुचकामी आहे आणि म्हणून ती बदलायची आहे, ही सार्वत्रिक भावना आहे...
मूळ अमेरिकन नाटकात कैझाद कोतवाल यांनी यथोचित बदल करत ही घटना १९४०च्या दशकातल्या बंगाल प्रांतात आणली आहे. मात्र एक छोटासा फरक आहे. अमेरिकेत ‘ईडन क्रिक’ नावाचं गाव आहे, तर कोतवाल यांच्या नाटकात हे काल्पनिक ठिकाण आहे. आणखी एक पण जास्त महत्त्वाचा फरक म्हणजे मूळ अमेरिकन नाटकातल्या पाचही स्त्रिया साध्या कुटुंबातल्या आहेत. या नाटकात या स्त्रिया हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन अशा बहुधर्मीय आहेत...
‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा कानाला कितीही गोड वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवणं शक्य नाही. लक्षात घ्या, अर्थव्यवस्था सगळ्या दिशांना एकाच वेळी धावू शकत नाही. तसं धावत सुटलो आणि समजा अगदी नजीकच्या भविष्यात भारत ‘पाच ट्रिलियन डॉलर’च्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलाच, तरी तो हत्तीरोग झालेल्या रोग्यासारखा दिसेल — एका पायावर किळस येण्याइतकी सूज वाढलेली, आणि दुसऱ्या पायाच्या काटकुळ्या! ...
नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!...
अलीकडच्या काळात राजकारण आणि प्रशासनातील नेते-अधिकारी बोलणं आणि वागण्यातही खूपच बेताल आणि उर्मट झाले आहेत. ‘हुच्च’ नेत्यांची फौजच आता राजकारणात आहे. राजकारणात आडदांडपणा आणि ‘राडा संस्कृती’ आणली ती शिवसेनेनं आणि त्याची लागण सर्वपक्षीय झालेली आहे. प्रयोगशाळेतल्या शेपटी तोडलेल्या उंदरासारखी अवस्था बहुसंख्य संपादकाची झालेली आहे. ...
या प्रकरणातील सर्वांत कळीची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप या वादाच्या गुणवत्तेवर कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. न्यायालयाने केवळ निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे, असा काढता येणार नाही...
बीटी तब्बल अडीच दशकं विधिमंडळाच्या राजकारणात होते, पण पक्षीय राजकारणाचा शिंतोडा त्यांनी त्यांच्या अंगावर चुकूनही उडू दिला दिला नाही. साधारण २००० आधीच्या राजकारणात जाणकार, समंजस अभ्यासू आणि पाय जमिनीवर घट्ट रोवलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत होतं. धनाच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या विद्यमान राजकारणात बीटी यांच्यासारख्या राजकारण्यांना मुळीच आता स्थान उरलेलं नाही. त्यांची जागा कोणताही नेता घेऊ शकणार नाही! ...
इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल...
माध्यमांवर बहुतांशी यांचाच ताबा. त्यामुळे यांच्या गैरकृत्यांना प्रसिद्धी मिळत नाही. माध्यमं फक्त यांच्याच आरत्या ओवाळत असतात. पण तरीही यांचं समाधान नाही, कारण अद्यापही काही स्वाभिमानी लोक यांच्यावर टीका करतात, यांच्या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडतात. देशातच नाही, तर परदेशातही ते प्रसिद्ध होतं. मग मात्र यांचा चडफडाट होतो, कारण तिथं यांना काही करता येत नाही. मग मात्र संबंधिताना तळतळाट, शिव्याशाप देऊन गप्प राहतात...
समजा अभिजित कमी पडला अथवा पराभूत झाला, तर ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’च्या नावाखालचा ‘पुनरुज्जीवनवाद’ आणि ‘मनुस्मृती’चा पुनर्जन्म याविरुद्ध कोण लढणार? अभिजित टिकून राहिला, तर त्यालाही या नव्या शैक्षणिक धोरणांवर हल्ला चढवावाच लागणार आहे. शिक्षण महाग करणे, शिक्षक-प्राध्यापक यांची भरती कमी करणे, विरोधी विचारांना निपटून काढणे, कुलगुरू म्हणून संघस्वयंसेवक बसवणे, याविरुद्ध कोण लढणार? ...
परिणामी आशाला त्याच कॅफेत उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागते. तिथं तिला मध्यमवयीन मॅक एका वेगळ्या प्रकारे भेटतो. म्हणजे तो बसल्या बसल्या खुर्चीवर मेलेला असतो. अचानक त्याचा मोबाईल वाजतो. तो उचलत नाही म्हटल्यावर आशा फोन उचलते. इथून नाटक गती घेतं. आशाला काही वेळानंतर समजतं की, तो मेलेला आहे आणि तिच्याजवळ त्याचा फोन आहे. हा फोन अनेकदा वाजतो. यातून वेगळ्या प्रकारचं नाटक निर्माण होतं....
ही कादंबरी वेगळी वाटली, बेहद्द आवडली. याचं कारण हे आकर्षण केवळ बाह्य नाही, तर कादंबरीलेखनाची ती ताकद आहे, हे ‘पीळ’ वाचून संपवल्यावर जाणवलं. अशात मराठी साहित्यात सतीश नाईक, पंकज भोसले, डॉ. राजेंद्र मलोसे अशा काहींचं काहीवेगळ्या विषयावरचं लेखन वाचायला मिळत आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या मालिकेत बसणारी ‘पीळ’ ही कादंबरी आहे...
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.