दूरदर्शन, आकाशवाणीनं ‘बॅन’ केलेलं त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण
पडघम - देशकारण
माणिक सरकार
  • त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार
  • Mon , 21 August 2017
  • पडघम देशकारण त्रिपुराचे मुख्यमंत्री Tripura CM माणिक सरकार Manik Sarkar

माझ्या प्रिय त्रिपुरावासियांनो,

आज स्वातंत्र्यदिनी मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बलिदान करणाऱ्या सर्व शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करतो. जे स्वातंत्र्यसैनिक आज आपल्यात हयात आहेत, त्यांनाही मी प्रणाम करतो!

स्वातंत्र्य दिन हा काही फक्त एक उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही. या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन, या दिवसाशी आपल्या निगडित भावना लक्षात घेऊन, आपण आजचा हा उत्सव साजरा करताना आपल्या संपूर्ण देशाला अंतर्मुख होण्याची गरज आहे.

या स्वातंत्र्यदिनी, आपल्यासमोर काही समकालीन, महत्त्वाचे आणि ज्वलंत विषय आहेत.

विविधतेतील एकता हाच भारताचा पारंपरिक वसा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या महान मूल्यानंच आपण भारतीयांना एकत्र आणलं आहे. मात्र आज आपलं धर्मनिरपेक्षतेचं सत्त्वच धोक्यात आलेलं आहे. कारस्थानं रचून, प्रयत्नपूर्वक आपल्यात गुंते निर्माण केले जात आहेत, दुफळी निर्माण केली जात आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाच्या जाणीवेवर जात-धर्म-जमातीच्या नावावर धार्मिक भावना भड़कावून आघात केले जात आहेत, गोरक्षणाच्या नावावर भगवेकरण चाललं आहे. या सर्वांमुळे अल्पसंख्याक आणि दलित यांच्यावर जीवघेणे आघात होत आहेत. त्यांच्यात सुरक्षिततेची जाणीव नाहीशी होते आहे. त्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. असल्या घातक वृत्तींना कुठलाही थारा मिळता कामा नये. या वृत्ती या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या ध्येयाच्या, स्वप्नांच्या आणि मूल्यांच्या आड़ येतात. स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात असलेले, अत्याचारी धोकेबाज, निर्दयी ब्रिटिशांना ज्यांनी साथ दिली, त्यांच्यासमोर नमतं घेतलं, दोस्ती केली, त्याच देशद्रोह्यांनी आज वेगवेगळ्या रंगरूपात समोर येऊन भारताच्या एकता आणि बंधूभावाची मुळे खंदण्यास सुरुवात केलेली आहे. देशाप्रती निष्ठा असलेल्या प्रत्येक देशप्रेमीनं एकसंध भारताच्या बाजूनं उभं राहून असल्या देशविघातक पाताळयंत्री हल्ल्यांच्या विरोधात भूमिका घेणं आवश्यक बनलं आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन दलित व अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची हमी भरली पाहिजे, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवली पाहिजे.

आज ‘आहे रे’ व ‘नाही रे’ वर्गातली दरी प्रचंड वाढलेली आहे. देशातली अमाप संसाधनं आणि संपत्ती काही मूठभरांच्या हाती एकवटली आहे. बहुसंख्य जनता गरिबीच्या खाईत लोटली गेली आहे. हे गरीब, अमानवी शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार यांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यांना असं जगावं लागावं, हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचं उद्दिष्ट नक्कीच नव्हतं. आजचं राष्ट्रीय धोरण या अधोगतीला जबाबदार आहे. अशा जनविरोधी धोरणांना उलटवणं गरजेचं आहे. मात्र नुसतं बोलून दाखवल्यानं हे होणार नाही. त्यासाठी देशातल्या परिघावरच्या गरीब, दुःखी भारतीयांनी निर्भय होऊन आवाज उठवला पाहिजे. देशातल्या सर्व जनतेपर्यंत ज्याचे फायदे पोहचतील, असं पर्यायी धोरण आखणं आपल्याला गरजेचं आहे. असं पर्यायी धोरण आखता यावं म्हणून देशातल्या गरीब, पीड़ित जनतेनं आज स्वातंत्र्यदिनी अशी शपथ घ्यावी की, एका व्यापक सामाजिक-आर्थिक-राजकीय लढाईला ते सुरुवात करतील.

बेरोजगारीच्या वाढत्या प्रश्नानं आपल्या देशाच्या जाणीवेत एक निराशा आणलेली आहे. एकीकडे बेरोजगारांच्या रांगेत करोडो नवीन तरुण सामील होत असतानाच, त्यात लाखो रोजगार गमावलेल्या बेकारांची भर पड़ते आहे. हा महाकाय प्रश्न, असं राष्ट्रीय धोरण राबवल्याशिवाय सुटू शकत नाही, ज्यात गरिबांची क्रयशक्ती वाढवण्याचा विचार नसेल. त्यासाठी काही मोजक्या कॉर्पोरेट्सना फायदा करवून देणारं आजचं राष्ट्रीय धोरण बदलवावं लागेल. अशा देशविघातक धोरणांना बदलवून टाकण्याची शपथ विद्यार्थी, युवक, कष्टकऱ्यांना या स्वातंत्र्यदिनी घ्यावी लागेल व त्यासाठी एकजुटीनं निरंतर लढ़ा द्यावा लागेल.

अशा सर्व पार्श्वभूमीवर त्रिपुरा सरकारनं मात्र राज्य सरकारच्या असंख्य मर्यादा असूनसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांना भिडून त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या सर्व गरजांची काळजी घेणारं धोरण जनतेच्याच सहभागानं राबवलं. हे अगदी वेगळं आणि पर्यायी धोरण आहे. या धोरणाचं आकर्षण त्रिपुराच्याच जनतेला आहे, असं नाही, तर भारतातल्या तमाम गरीब जनतेलासुद्धा या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद द्यावासा वाटतो. त्यामुळे इथल्या, त्रिपुरातल्या विघातक वृत्तींची पोटदुखी वाढली आहे. इथली शांती, एकोपा, बंधुभाव नष्ट करण्यासाठी त्यांच्या कुरापती चालू आहेत. तसंच विकासांच्या कामातही खोडा घालणं सुरू आहे. अशा या पाताळयंत्री कारवायांना लगाम लावणं, आणि त्यांना विलग करण्याचं काम आमच्यावर येऊन पडलं आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वातंत्र्यदिनी त्रिपुराच्या शांतताप्रिय, विकसनशील जनतेनं घातकी शक्तींच्या विरोधात एकजुटीनं काम करण्याची शपथ घेण्याची गरज आहे.

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - प्रज्ज्वला तट्टे. अनुवादक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......