एखादा प्रदेश अन्यायकारकरित्या बळकावल्यानंतर त्याच्या न्याय्य हक्कासाठी भांडणाऱ्याबद्दल ‘जैसे थे’ स्थिती ठेवू इच्छिणाऱ्याची जी भूमिका असेल, तीच कर्नाटकची आहे

सीमाभागातले मराठे आणि महाराष्ट्राला लागून नसलेल्या प्रदेशांतील मराठे यांच्या सीमाप्रश्नविषयक भूमिकेत द्वैत आहे, ते स्वाभाविकही आहे. पण, या मंडळींच्या लक्षात येत नाही की, महाराष्ट्राने बंगलोर-म्हैसूरला लागून असलेला मराठी प्रदेश मागितलेला नाही. अगदी धारवाडही मागितलेलं नाही. त्यामुळे सीमाभागातल्या मराठी लोकांचं दुखणं उर्वरित कर्नाटकातल्या मराठ्यांना कळणार नाही.......

महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मुख्यमंत्र्यांनी पदावर असताना सीमाप्रश्नाबद्दल अनुकूल भूमिका घेतलेली होती, मात्र या सर्वांमध्ये शरद पवारांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती

महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांना बरेचदा या पराभवामुळे आता ही लढाईच सोडून द्यावी म्हणजे ‘वेटिंग फॉर गोदो’च्या नाटकातून सीमावासीयांना मुक्त होता येईल असं वाटतं. मात्र सीमाभागात घडणाऱ्या घडामोडींची महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रातल्या किती जणांना माहिती असते? किंवा त्याबद्दल काही करावेसे वाटते? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांना सीमाप्रश्न म्हणजे केवळ बेळगावचा प्रश्न वाटतो.......

सार्वमत आणि निवडणुका ही जनमानस जाणून घेण्याची दोन स्वतंत्र साधनं आहेत, एवढं साधं भान ज्या आयोगाला नाही, त्याच्याकडून वस्तुनिष्ठ अहवालाची अपेक्षा बाळगणं, हा वेडेपणाच ठरेल...

महाजनांनी राज्य पुनर्रचना आयोगाचे सिद्धांत आणि निष्कर्ष त्यांना जिथे सोयीचे आहेत, तिथे चलाखीने वापरले आहेत, हे कासरगोडच्या प्रश्नाने सिद्ध होते. कासरगोडमधली पंचावण्ण टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मल्याळी भाषक असल्यामुळे तो भाग केरळला द्यावा, असे राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवले होते. असा निर्णय देताना भाषिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही मुद्द्यांचा आपण विचार केला आहे, असं राज्य पुनर्रचना आयोगाने म्हटलं होतं.......

समकालीन भारतात सीमाभागातल्या मराठी माणसांनी केंद्र सरकारची अनास्था आणि कर्नाटक सरकारची दडपशाही, अरेरावी यांच्या विरोधात दिलेला लढा ऐतिहासिकच मानला पाहिजे

आज हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यावर जो निर्णय देईल, त्याची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे, असं काही जणांना वाटतं. मला तसं वाटत नाही. सर्वोच्च न्यायालय पोकळीत जगत नाही. कायद्याचा कीस काढणं आणि नियमांवर बोट ठेवणं हे जरी सर्वोच्च न्यायालयाचं काम असलं, तरी सर्वोच्च न्यायालयापुढे वस्तुस्थितीची जी माहिती येते, त्यामध्ये लोकांच्या परिस्थितीचा मागोवा असतोच.......