अन्नपूर्णा देवी स्वतःच स्वतःच्या कैदेत राहिल्या. त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. या एकांतानं त्यांचं संगीताशी असलेलं नातं मात्र अधिकच दृढ केलं

या पुस्तकात अन्नपूर्णा देवींच्या सांगीतिक प्रतिभेबाबत ठिकठिकाणी गौरवोद्गार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावातील गाठी, एककल्लीपणा यांचं मानसशास्त्रीय विश्लेषणही केलंय. त्यांच्या हट्टीपणामुळे संगीतातील एक विलक्षण प्रतिभा चौकटीतच अडकून पडली, याची कारणमीमांसाही करण्याचा प्रयत्न केलाय. एवढ्या विलक्षण प्रतिभेच्या संगीतकार असूनही त्यांचं व्यवस्थित दस्तवेजीकरण होऊ शकलं नाही, याविषयीदेखील खंत व्यक्त केलीय.......

‘इरफान : डायलॉग्ज  विथ द विंड’ - दोन कलावंत माणूस म्हणून कसं एकमेकांशी व्यक्तिगत नातं घडवत जातात, याचा सुंदर पट या पुस्तकातून उलगडत जातो

इरफानचं अभिनयातील निर्विवाद कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहेच, परंतु हे कलावंतपण त्याच्या जगण्यातील छोट्या छोट्या क्षणांतून त्याने कसं जपून ठेवलं होतं, याविषयी अनुप सिंग यांनी फार सुंदर लिहिलं आहे. इरफानची अभिनयातील टोन आणि ऱ्हिदम जपण्याची असोशी, व्यक्तिरेखा समजून घेऊन, त्यांत प्रवेश करण्याचा ध्यास, संगीतातून, त्यातल्या प्रेरणेतून स्वतःमधील अभिनेत्याला तपासण्याची जिद्द, या पुस्तकातून तपशीलवार मांडली आहे.......