बुक्सनामा : अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • http://www.booksnama.com/client/home
  • Sun , 23 April 2017
  • पडघम साहित्यिक बुक्सनामा ‌Booksnama अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर

सहा महिन्यापूर्वी डायमंड पब्लिकेशन्सने ‘अक्षरनामा’ हे मराठीतलं पहिलंवहिलं ‘डिजिटल डेली फीचर्स पोर्टल’ सुरू केलं. गेल्या सहा महिन्यांच्या काळात या पोर्टलने चांगले विषय, चांगला मजकूर, नवे लेखक आणि योग्य-परखड विश्लेषण यांच्या बळावर आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. लवकरच ‘अक्षरनामा’चे आय फोन अॅपही सुरू होईल. वेबसाइटही अधिक आकर्षक आणि सुटसुटीत होईल. त्याचबरोबर आणखी नवे लेखक आणि नवे विषय यांचाही समावेश होईल. चालू घटना-घडामोडींवरील लेखन शक्य तितक्या तत्परतेनं देण्याचा ‘अक्षरनामा’चा प्रयत्न असतो. त्यात प्रत्येक वेळीच यश येत असं नाही, पण तरीही रोज काही महत्त्वाच्या घडामोडींवरील लेख दिले जातात. कुणाच्याही बाजूने नाही आणि कुणाच्याही विरोधात नाही, अशी ‘अक्षरनामा’ची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे, यापुढेही राहील. कारण भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संकल्पनांशी बांधीलकी हे ‘अक्षरनामा’चं ब्रीद आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात ‘अक्षरनामा’ने आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे.

आजपासून ‘बुक्सनामा’ हे ‘अक्षरनामा’चं नवं भावंड ऑनलाईन माध्यमात दाखल होत आहे. मराठी पुस्तकं घरबसल्या ऑनलाईन खरेदी करता यावीत आणि तीही आकर्षक सवलतीमध्ये करता यावीत, हा ‘बुक्सनामा’चा उद्देश आहे. ऑनलाईन ग्रंथखरेदीसाठी खरं तर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इन्फीबिम या इंग्रजी बेवसाईटपासून बुकगंगा, मॅजेस्टिक ऑन द नेट, रसिक या मराठी बेवसाईटपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही आम्ही ‘बुक्सनामा’ ही ऑनलाईन ग्रंथखरेदीसाठीची वेबसाईट सुरू केली आहे. त्याची काही खास कारणं आहेत. ती तुम्हाला आमच्या या वेबसाईटला भेट दिल्यावर लक्षात येतीलच.

मराठीतल्या आघाडीच्या बहुतेक प्रकाशकांच्या स्वत:च्या बेवसाईटस आहेत. त्यावरून त्या त्या प्रकाशनसंस्थांची पुस्तकं घरबसल्या विकत घेता येतात. शिवाय बुकगंगा, मॅजेस्टिक ऑन द नेट, रसिक या बेवसाईटसवरूनही हवी ती पुस्तके विकत घेता येतात. ‘बुक्सनामा’ हा मराठीतील आघाडीच्या, नामवंत आणि लोकप्रिय लेखकांची पुस्तकं एकत्र उपलब्ध करून देईल. आघाडीच्या सर्व प्रकाशकांची पुस्तकंही इथं विक्रीसाठी उपलब्ध असतील. शिवाय ही पुस्तकं विशेष सवलतीमध्ये असतील. २५ टक्क्यांपर्यंत पुस्तक खरेदीवर सवलत दिली जाईल. एक हजाराच्या वरील पुस्तक खरेदीसाठी टपाल\कुरिअर खर्च आकारला जाणार नाही.

त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार सुटसुटीत आणि पारदर्शक पद्धतीने करता यावेत यासाठी Payumoney च्या सुरक्षित पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे द्वारा नेटबँकिंग, तसंच सर्व प्रकारच्या क्रेडीट, डेबिट कार्ड मार्फत व्यवहार करण्याची सुविधा असेल.

लवकरच ‘बुक्सनामा’वर मराठीमधील दुर्मीळ, दुर्लक्षित आणि विस्मरणात गेलेली पुस्तकंही आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ग्रंथवेड्या, ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथोपासक रसिकांसाठी ती पर्वणी असेल.

‘अक्षरनामा’प्रमाणेच ‘बुक्सनामा’चंही वेगळेपण तुम्हाला वेबसाईट पाहिल्यानंतर जाणवलेच. ‘अक्षरनामा’प्रमाणेच विश्वासार्हता, दर्जा आणि तत्परता हा ‘बुक्सनामा’चाही विशेष असेल. तेव्हा तुम्हाला हवी असलेली पुस्तकं पहा, त्याविषयी जाणून घ्या आणि आवडलेली पुस्तकं आकर्षक सवलतीमध्ये विकत घ्या.

ट्रेंड येतात आणि जातात, पण परंपरांचं तसं नसतं. त्यांची मुळं मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. डायमंड पब्लिकेशन्सच्या माध्यमातून गेली ३० वर्षं आम्ही मराठी-इंग्रजी ग्रंथप्रकाशन आणि वितरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या या साहित्यसेवेची ‘बुक्सनामा’ व ‘अक्षरनामा’ ही या नव्या पारंब्या आहेत.

तुमचा अभिप्राय, सूचना आणि मतं आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत.

‘बुक्सनामा’ हे अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर आहे!

……………………………………………………………………………………………

‘बुक्सनामा’ला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/home

……………………………………………………………………………………………

नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी पहा -

 http://www.booksnama.com/client/authors

……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......