भारत - चीन संबंध : दोन निरीक्षणं
पडघम - विदेशनामा
कॅ. मिलिंद परांजपे
  • तिबेटी धर्मगुरू दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांग भेटीदरम्यान
  • Fri , 14 April 2017
  • पडघम विदेशनामा दलाई लामा Dalai Lama चीन China शुआन त्सांग Xuan Zang चायना डेली China Daily तवांग Tawang अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तिबेटी धर्मगुरू दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांगला भेट देणार म्हणून चीनने त्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली. धमक्याही दिल्या (‘ठोशास ठोसा’ वगैरे). मात्र भारताने खंबीर भूमिका घेऊन आपल्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू नये म्हणून चीनला ठणकावले. रविवार नऊ एप्रिलच्या पहाटे आम्ही एअर चायनाने मुंबईहून बीजिंगमार्गे अमेरिकेस जाण्यास निघालो. ‘चायना डेली’ हे बीजिंगहून प्रकाशित होणारे वर्तमानपत्र विमानात वाचावयास मिळाले. शनिवार आठ एप्रिल आणि रविवार नऊ एप्रिलचा एकच सामाईक अंक होता. चीनमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही. म्हणजे वर्तमानपत्रातील बातमी हे सरकारचं अधिकृत धोरण असतं असं समजायला काही हरकत नाही. ‘चायना डेली’सारख्या पत्रात चिनी सरकारची दलाई लामांच्या तवांग भेटीवरची प्रतिक्रिया वाचण्याची उत्सुकता होती. बीबीसीने टीव्हीवर दलाई लामा तवांगमध्ये प्रचंड समुदायासमोर बोलताहेत असं चित्र दाखवलेलं मी सात एप्रिलला पाहिलं होतं. म्हणून जागेवर बसल्याबरोबरच संबंध वर्तमानपत्र अधाशीपणे पुन्हा पुन्हा नीट बघितलं. दलाई लामांच्या भेटीबद्दल काहीही बातमी किंवा लेखाचा अभाव पाहून आश्चर्य वाटलं. आधीच्या म्हणजे चार-सहा एप्रिलला ‘चायना डेली’मध्ये छापलेला धमकीवजा अग्रलेख इंटरनेटवर वाचला. भारतीय आणि परदेशी वर्तमानपत्रांनी चिनी आक्षेपाला बरीच प्रसिद्धी दिली होती. मात्र भारत इस्राएलकडून क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान विकत घेणार एवढीच फक्त बातमी भारताबद्दल छापलेली वाचायला मिळाली.

फ्लाईटमध्ये ‘शुआन त्सांग’ (Xuan Zang) सिनेमा पाहावयास मिळाला. सातव्या शतकात शुआन त्सांग हा चिनी प्रवासी खुष्कीच्या खडतर मार्गानं नालंदा विद्यापीठात येऊन भारतीय विशेषतः बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवतो आणि सतरा वर्षांनी परत मायदेशी पोचतो. त्यावर हा सिनेमा आधारलेला आहे. त्यात भारतातील अस्पृश्यता आणि सतीच्या चालीबद्दल काही प्रसंग दाखवले आहेत. शुआन त्सांग एका निरपराध स्त्रीला सक्तीच्या विवाह आणि सतीपासून वाचवतो असा तो प्रसंग आहे. अस्पृश्यता आणि सतीची प्रथा या गोष्टी शुआन त्सांगच्या चित्रपटात दाखवण्याचं काही कारण नव्हतं. तार्किक वादविवादात त्सांग इतर भारतीय विद्वानांना हरवतो म्हणून त्याची हत्तीवरून मिरवणूक काढतात असाही प्रसंग आहे. बोलपटाचे हे भाग काल्पनिक असले तरी चिनी विद्वान भारतात येऊन आध्यात्मिक, धार्मिक ज्ञान घेऊन गेले हा सत्य मुद्दा राहतोच. दीड-दोन हजार वर्षांची चीनवरील भारतीय सांस्कृतिक श्रेष्ठता नाकारता येत नाही. त्सांग भारतात पोहचेपर्यंतची सिनेमातली संभाषणं चिनी भाषेत आहेत. त्यामुळे ती आपल्याला समजत नाहीत. भारतातील संभाषणे हिंदीत पण खाली चिनी भाषेत दिलेली (सब टायटल्स) आहेत. चिनी सरकारी निर्मात्यांनी भारतीयांच्या सहकार्यानं बनवलेला हा सिनेमा हल्लीच्या भारत-चीन स्पर्धात्मक वातावरणापासून वेगळ्या वळणाचा आहे आणि बघण्यासारखा आहे.

वाजपेयी चीनला गेले तेव्हा त्यांनी त्सांगच्या समाधी स्थळास भेट दिली होती, ही गोष्ट अनेकांना आठवत असेलच. चिनी पंतप्रधान भारतात आले तेव्हा त्यांनी डॉ. कोटणीसांच्या बहिणीला भेटले होते हेही अनेकांना आठवत असेल. एअर चायनाची सेवा उत्तम होती. बिजिंग विमानतळावर लोक फ्रेंडली वाटले.

प्रवासात वरील दोन निरीक्षणं लक्षात आली म्हणून लिहिली.

 

लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......