‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि ‘मैत्री मनाशी’ : मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबतची सजगता, सतर्कता आणि जाण वाढवणारी पुस्तके
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल विद्या माने
  • ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि ‘मैत्री मनाशी’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Mon , 08 January 2024
  • ग्रंथनामा शिफारस भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी Bhavnik Prathmopchar Gharchya Ghari मैत्री मनाशी Maitri Manashi

कोविडपाठोपाठ जगभर मानसिक अस्वस्थतेची एक साथ येऊन गेली. तिचे पडसाद अजूनही चालूच आहेत. अर्थात हेही तितकेच खरे की, अलीकडच्या काळात जगातील जवळपास सर्वच देशांत, समाजांत मानसिक स्वास्थ्याबद्दलची सजगता वाढू लागली आहे. खरं तर ती आता दैनंदिन मूलभूत गरजांइतकी महत्त्वाची झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेट आणि मानसिक आरोग्य, अशी आधुनिक जीवनशैलीची ‘पंचसूत्री’ सांगता येतील.

भारतात दर हजार लोकसंख्येमागे उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञांची संख्या अतिशय कमी आहे. त्यात भर म्हणजे बऱ्याचशा समस्या अज्ञान, अनास्था यांमुळे निर्माण होतात. आपल्या वागण्यातील बऱ्याचशा नकारात्मक बदलांची नोंद, अभ्यास आणि त्यांचे विश्लेषण हे पुरेशा वैज्ञानिक पद्धतीने होत नाही अन् त्यावर विवेकी संवादही होत नाही.

अर्थात या संवादासाठी मोकळ्या मनाची आणि समोरच्याचे ऐकून संयमी, तर्कशील प्रतिसाद देणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्या भवतालच्या माणसांचा या विषयावरील प्राथमिक जागृतीचा लसाविसुद्धा सकारात्मक असावा लागतो. त्याचबरोबर सामूहिक साक्षरता आणि सामूहिक इच्छाशक्ती यांची टक्केवारी वाढवावी लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

म्हणूनच याच विषयावरील नुकत्याच प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांची दखल घेणे अत्यावश्यक आणि गरजेचे ठरते. डॉ. हमीद दाभोलकर यांचे ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि दीपक पाटील यांचे ‘मैत्री मनाशी’ ही ती दोन पुस्तके. हे दोन्ही लेखक मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे स्वरूप केवळ माहितीचे संकलन अशा प्रकारचे नसून ते अभ्यास, अनुभव आणि कार्यानुभवातून आलेले आहे. माहितीचे नेमकेपण, अचूकता आणि बदलत्या काळानुसार मानसिक ताणतणावांच्या व्यवस्थापनासमोरची आव्हाने लक्षात घेऊन सोप्या भाषेतले, पण वैज्ञानिक भान जागवणारे लेखन, ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये सांगता येतील. 

दाभोळकर यांच्या पुस्तकात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सुरू केलेल्या ‘मानसिक प्रथमोपचार मोहिमे’च्या अनुषंगाने आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आलेल्या अनुभवांच्या आधारे मांडणी केली आहे. समाजातील सर्वच आर्थिक किंवा सामाजिक स्तरांत मानसिक आरोग्याबाबतच्या अज्ञानाचा आणि गैरसमजांचा निर्देशांक बराच मोठा असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण दाभोळकर नोंदवतात.

अज्ञान दूर करून मनोव्यापाराबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याच्या दृष्टीने संवाद साधणे, मानसिक आधार देण्याचे कौशल्य शिकणे आणि इतरांच्या ताणतणावाची कारणे समजून घेण्यासाठी व त्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी वापरणे, ही या प्रथमोपचाराची सुरुवातीची पावले आहेत, यावर ते भर देतात.

हे स्पष्ट करताना दाभोळकर ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ‘मानसिक प्रथमोपचार पुस्तिके’मध्ये उल्लेख केलेल्या काही पायऱ्या नमूद करतात.

मानसिक प्रथमोपचार म्हणजे :

- व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप न होईल याप्रमाणे त्यांना आधार देणे आणि त्यांची काळजी घेणे.

- अन्न, पाणी या प्रकारच्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.

- मानसिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींचे ऐकण्याची तयारी ठेवणे, पण त्यांना बोलायला भाग पाडण्यासाठी दबाव टाकू नये. 

- त्यांना बरं वाटेल आणि ते शांत होतील यासाठी प्रयत्न करणे.

- अधिक हानी होण्यापासून त्यांना वाचवणे. 

दाभोळकर यांनी सहा भागांत पुस्तकाची रचना केली आहे. पहिल्यात मनाच्या प्रश्नांची तोंडओळख करून दिलेली आहे. दुसऱ्यात मनातील भावनांच्या विविध छटा समजावून सांगितल्या आहेत. यामध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रसंगांना, अवस्थांना आपण सामोरे जात असतो, त्याबद्दल माहिती दिली आहे. यात अपराधीपणा, रागाचा स्फोट, दारुण अपयश, चिंताग्रस्त राहणे, भीती व अप्रिय घटना घडणे, तसेच निराशेच्या टोकातून आत्महत्येचे विचार येणे, लैंगिक भावनांची गुंतागुंत, संशय अशा विविध मनोवस्थांबद्दल दैनंदिन जगण्यातील काही गोष्टी सांगून संवाद साधला आहे.

त्याचप्रमाणे मानसिक प्रथमोपचार म्हणजे काय नाही, हेसुद्धा ‘जागतिक आरोग्य संघटने’ची पुस्तिका स्पष्ट करते.

- मानसिक प्रथमोपचारचे काम फक्त प्रशिक्षित तज्ज्ञ करू शकतात असे अजिबात नाही.

- हे काम म्हणजे व्यावसायिक पातळीवरचे समुपदेशन नाही

- ज्या कारणांमुळे तणाव वाढतो, त्याची कारणमीमांसा करून सखोल विश्लेषण करण्याचे ते ‘debriefing’ सत्र नाही.

- एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काय काय आणि कसे कसे झाले, त्याचा क्रमवार आलेख मांडणे म्हणजे प्रथमोपचार नाही.

- व्यक्ती-व्यक्तींच्या आयुष्यात घडत असलेल्या कहाण्या ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी उपलब्ध असणे, हे यात येऊ शकते, परंतु याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्यास दबाव टाकणे, हे येत नाही.

हे सर्व लक्षात घेऊन ताण-तणावातील व्यक्तीला मदत करताना तिच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीनुसार वागवणे, तिच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी काळजी घेणे, चुकीची माहिती न देणे, आपल्या कौशल्याबद्दल अवाजवी दावा न करणे, तिच्या आत्मसन्मानाला ठेस लागू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, यावर ‘जागतिक आरोग्य संघटना’ विशेष भर देते. 

दाभोळकर यांनी सहा भागांत पुस्तकाची रचना केली आहे. पहिल्यात मनाच्या प्रश्नांची तोंडओळख करून दिलेली आहे. दुसऱ्यात मनातील भावनांच्या विविध छटा समजावून सांगितल्या आहेत. यामध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रसंगांना, अवस्थांना आपण सामोरे जात असतो, त्याबद्दल माहिती दिली आहे. यात अपराधीपणा, रागाचा स्फोट, दारुण अपयश, चिंताग्रस्त राहणे, भीती व अप्रिय घटना घडणे, तसेच निराशेच्या टोकातून आत्महत्येचे विचार येणे, लैंगिक भावनांची गुंतागुंत, संशय अशा विविध मनोवस्थांबद्दल दैनंदिन जगण्यातील काही गोष्टी सांगून संवाद साधला आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे…

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

संशोधन सांगतं की, सतत ऑनलाइन व्यवहार/देवाणघेवाण करणारे लोक हळूहळू प्रत्यक्ष व्यवहार करण्यात असमर्थ ठरतात. त्यांच्या ‘सामाजिक क्षमतां’चा ऱ्हास होत जातो!

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

..................................................................................................................................................................

तिसऱ्या भागात आपण स्वत:च स्वत:ला कसे सावरू शकतो, याबद्दल छोट्या व सोप्या उपायांची माहिती दिली आहे. चौथ्यात मानसिक आरोग्य आणि नाती-गोती यांचा आढावा घेतला आहे. पाचव्यात भावनिक प्रथमोपचारामध्ये आवश्यक असलेली काही पथ्ये आणि मर्यादा याबद्दलची चर्चा आहे. सहाव्या आणि शेवटच्या भागात मनाची निगराणी करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे सांगितले आहे.

दीपक पाटील यांचे ‘मैत्री मनाशी’ हे दुसरे पुस्तक मानसिक आरोग्याच्या समस्या, त्यांची लक्षणे, त्या दूर करण्यातील विविध आव्हाने यांची चर्चा करते. याच्या पहिल्या भागात मानसिक आरोग्य म्हणजे काय, चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणे काय, मानसिक आजार म्हणजे काय, त्याचे प्रकार व लक्षणे कोणती, आजार व उपचाराचा कालावधी किती आणि मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा कोणकोणत्या आहेत, याची माहिती दिली आहे.

दुसऱ्यात मानसिक आजारशी निगडीत कलंकाची भावना यावर भर दिला आहे. कलंकाच्या भावनेमुळे रुग्ण व कुटुंबावर होणारे परिणाम आणि ती हाताळण्याच्या पद्धती, याची चर्चा केली आहे.

तिसऱ्यात मानसिक आजार आणि व्यसन यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला आहे. यात व्यसन म्हणजे काय, व्यसन हा मानसिक आजार आहे का, त्याचे सर्वसाधारण प्रकार कोणते, व्यसनी व्यक्तीची शारीरिक व मानसिक लक्षणे, दारू-अमली पदार्थ वगैरे व्यसने कशी वाढत जातात, व्यसन करण्याची कारणे आणि व्यसनाचे कुटुंबावर, समाजावर काय परिणाम होतात, याची मांडणी केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मानसिक आरोग्याचे मूलभूत ज्ञान वाढवण्याबरोबर या आजाराचे ‘कलंक’ व ‘व्यसनाधीनता’ हे दोन महत्त्वाचे दुष्परिणाम या पुस्तकात अधोरेखित केले आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीमागची सर्व माणसे ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबद्दल सर्वेक्षण, संवाद आणि समुपदेशन करणारी आहेत. कार्यकर्ता म्हणून आणि या विषयाचे जाणकार म्हणून, या व्यक्ती कोणत्याही विशेष आर्थिक पाठिंब्याशिवाय समाजप्रबोधन करण्याचे काम करतात.

या छोट्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात आलेल्या महत्त्वाच्या संकल्पना सोप्या करून सांगणारे तक्ते, याद्या, फ्लो-चार्टस, सचित्र गोष्टी. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनाही मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यांबाबतची आपली समज वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.  

दाभोळकर यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे नाव आहे- ‘मानसिक आरोग्याच्या क्षितिजावर तांबडे फुटत आहे’. ‘जे जे क्लिष्ट ते ते सोपे करून सांगावे, सजग - संवेदनशील करून सोडावे सकळ जण’, अशी या दोन्ही पुस्तकांची भूमिका आहे.

थोडक्यात, ही दोन्ही पुस्तके मानसिक आरोग्याबाबत समंजस जागृती करण्याचे चांगले काम करतील, असा विश्वास वाटतो.

‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ - डॉ. हमीद दाभोलकर

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने - १३० | मूल्य - २०० रुपये.

‘मैत्री मनाशी’ - दीपक पाटील

पाने – ४० | मूल्य – ५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक राहुल विद्या माने अनुवादक, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत.

nirvaanaindia@gmail.com
.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......