भाजपचं खुजं, सुडाचं राजकारण!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • काँग्रेस नेते राहुल गांधी
  • Fri , 24 March 2023
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress भाजप BJP

गुजरात राज्यातील सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याने बदनामीच्या फौजदारी खटल्यात दोषी ठरवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द (कायदेशीर भाषेत ‘disqualified’\अपात्र) करण्याची भाजपची कृती, हे कमालीचं खुजं राजकारण आहे. देशभर काढलेल्या पदयात्रेनंतर जनाधार वाढलेल्या राहुल गांधी यांना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अख्खा भारतीय जनता पक्ष घाबरतोय, असाच संदेश या कृतीतून जगभर गेला आहे.

मुळात सुरत (इथं ‘गुजरात कनेक्शन’ लक्षात घ्यायला हवं!) न्यायालयानं जी शिक्षा राहुल गांधी यांना ठोठावली, त्याला याच न्यायालयानं उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची स्थगिती दिली, शिवाय जामीनही मंजूर केला आहे. म्हणजे ही शिक्षा सध्या प्रलंबनाच्या अवस्थेत आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात अपील केलं नाही किंवा अपील केलं, तर त्याचा निर्णय लागून ते अपील फेटाळलं गेलं, तरच ती शिक्षा नक्की होईल. म्हणजे जी शिक्षाच अजून नक्की नाही, तिच्या परिणामस्वरूप दुसरी कारवाई करण्याची कृती कायदेशीर आणि कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या संदर्भात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्या तिघांची (नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी)  कथित बदनामी राहुल गांधी यांनी केली, असा दावा केला जातो. त्यापैकी एकानंही तक्रार दाखल केलेली नाही. शिवाय राहुल गांधी यांचं ते कथित वक्तव्य कर्नाटकातल्या कोलारमधलं आहे. म्हणून हा खटला सुरतच्या न्यायालयानं चालवावा किंवा नाही, हा एक वादाचा मुद्दा होता.

आणखी एक मुद्दा म्हणजे या खटल्यात ‘bench hunting’ (म्हणजे न्यायाधीशपदी ‘योग्य व्यक्ती’ येण्याची वाट बघितली जाणं) घडलेलं होतं, अशी चर्चा रंगलेली आहेच. न्यायालयाच्या निष्पक्ष न्यायावर संशयाचे एवढे गडद ढग दाटून आलेले असताना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणं सर्वार्थानं उचित ठरलं असतं, पण ते घडलेलं नाही.

अशा स्थितीत सभागृहात बहुमत असल्यानं आपण घेऊ तो निर्णय रेटून नेऊ, अशा दडपशाहीच्या वृत्तीनं भाजपकडून राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणलं गेलं, असंच म्हणण्यास प्रत्यवाय उरत नाही. हे केवळ खुजंच नाही तर सुडाचंही राजकारण आहे.

आणीबाणीनंतर इंदिरा आणि संजय गांधी यांच्या संदर्भात ज्या चुका तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जनता पक्षानं केल्या, त्याचं स्मरण या निमित्तानं होणं अपरिहार्य आहे. त्यामुळे जनता पक्षाचा जनमानसातल्या आधाराचा पाय आणखी खोलातच जात राहिला. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पंतप्रधानपद टिकवण्यासाठी आणीबाणी लादणं, ही इंदिरा गांधी यांची चूक होतीच. (सहकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा निर्णय घेतला होता, असं सांगितलं गेलं असलं, तरी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती गांधी यांचीच जबाबदारी मानायला पाहिजे.) आणीबाणीच्या काळात घडलेल्या दडपशाहीच्या अनेक कृतींमुळे काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी त्याची फार मोठी शिक्षा समस्त काँग्रेसजनांना दिली. त्यातून इंदिरा गांधीही सुटल्या नव्हत्या.

मात्र जनता पक्षाच्या राजवटीत लोकशाहीचे संकेत आणि कायद्याच्या सर्व मर्यादा ओलांडून केवळ राजकीय सूडबुद्धीनं इंदिरा आणि संजय गांधी यांचा छळ करण्यात आला. अतिशय फुटकळ आरोप लावून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ३ ऑक्टोबर १९७७ला अटक करण्यात आली (ते लोकशाहीवर लागलेलं लांच्छनच आहे.), पण त्यांच्यावर लावलेला आरोप न्यायालयानं दुसऱ्याच दिवशी रद्दबातल ठरवला होता!

पुन्हा डिसेंबर १९७८मध्ये इंदिरा गांधी यांना अटक करण्यात आली. उच्च कोटीचा नीचपणा म्हणजे त्यांच्या घरचे फोन्सचे कनेक्शन कापण्यात आले. संजय गांधी यांना तर किमान सहा वेळा अटक करण्यात आली, पण ती प्रत्येक कृती कायद्याच्या कसोटीवर टिकली नाही.

या सर्व कृती सुडाच्या होत्या. त्यातून जनता पक्षाचा पाय आणखी खोलात बुडत गेला आणि लोकशाहीचाही संकोच होत गेला. लोकशाहीचा गळा घोटला गेला, अशी भावना जनमानसात पसरत गेली. त्या (आणि अंतर्गत  लाथाळ्यां)मुळे पुढच्या निवडणुकीत भारतीय मतदारांनी काँग्रेसला पुन्हा कौल दिला होता. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, संसदेत विरोधकांना बोलू न दिलं जाणं, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं न मिळणं, अन्य पक्षात फूट पाडणं, धर्मांध राजकारणाला प्रोत्साहन देणं आणि हे कमी की काय म्हणून आता राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करणं, हे काही महान भारतीय लोकशाही परंपरेचं जतन करणारं नाही, तर संकोच करणारं आहे.

लोकशाहीच्या गळ्याला नख लावल्यासारखं आहे. भारतीय जनता पक्षाचं हे खुजं, सुडाचं राजकारण आहे. त्यामुळे भाजपचा बुडत्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. सुज्ञ भारतीय मतदार या खुज्या, सूडाच्या राजकारणाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

आता, या पक्षानं अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं नाव लावण्याचा अधिकार पूर्णपणे गमावला आहे.

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......