‘मॅजेस्टिक’ची केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा...
पडघम - साहित्यिक
निवेदन
  • केशवराव कोठावळे, मध्यभागी वसंत सरवटे यांनी केशवरावांचं केलेलं रेखाचित्र
  • Sat , 24 September 2022
  • पडघम साहित्यिक केशवराव कोठावळे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस कादंबरी स्पर्धा

केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा -

प्रथम पुरस्कार - ₹ ५०,०००

द्वितीय पुरस्कार - ₹ ३०,०००

तृतीय पुरस्कार - ₹ २०,०००

नियम व अटी -

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची ‘किमान किंवा कमाल’ अशी कोणतीही मर्यादा नाही.

२) स्पर्धेसाठी पाठवलेली कादंबरी मराठीत किंवा मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत असावी.

३) कादंबरीच्या आशय/विषयावर कोणतेही बंधन नाही.

४) कादंबरी कोठेही पूर्वप्रकाशित असता कामा नये.

५) कादंबरी पूर्णतः नवी आणि मूळ स्वरूपातील (Original) असावी, ती भाषांतरित किंवा इतर भाषेतील कादंबरीची मराठी आवृत्ती (adaptation) नसावी.

६) कादंबरीची किमान शब्दसंख्या ५०,००० (पन्नास हजार) इतकी असणे बंधनकारक आहे; ती जास्तीत जास्त कितीही शब्दांची असू शकते.

७) परीक्षकांच्या मते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करण्याकरता स्पर्धेतील कोणतीही कादंबरी गुणवत्तेच्या निकषांवर पात्र न ठरल्यास पारितोषिक न देण्याचा अधिकार संयोजकांकडे असेल.

८) स्पर्धेच्या निकालाबाबतचे सर्वाधिकार संयोजकांकडे असतील; त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार किंवा तत्सम स्पष्टीकरण देण्याचे बंधन संयोजकांवर नसेल.

९) पारितोषिक विजेती कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित होईल.

१०) स्पर्धकांनी आपल्या कादंबरीची छापील प्रत (लिखित किंवा टाईप केलेली हार्ड कॉपी) खालील पत्त्यावर दि. २८ फेब्रुवारी २०२३पर्यंत पाठवावी.

मान्यवर लेखकांनाही या स्पर्धेत भाग घेता येईल.

ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमात पाठवलेली कादंबरीची सॉफ्ट कॉपी स्पर्धेकरता ग्राह्य धरली जाणार नाही.

पत्ता :

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

३०८ फिनिक्स,

४५७ एस. व्ही. पी. रोड,

गिरगाव,

मुंबई – ४००००४.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......