‘मॅजेस्टिक’ची केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा...
पडघम - साहित्यिक
निवेदन
  • केशवराव कोठावळे, मध्यभागी वसंत सरवटे यांनी केशवरावांचं केलेलं रेखाचित्र
  • Sat , 24 September 2022
  • पडघम साहित्यिक केशवराव कोठावळे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस कादंबरी स्पर्धा

केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा -

प्रथम पुरस्कार - ₹ ५०,०००

द्वितीय पुरस्कार - ₹ ३०,०००

तृतीय पुरस्कार - ₹ २०,०००

नियम व अटी -

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची ‘किमान किंवा कमाल’ अशी कोणतीही मर्यादा नाही.

२) स्पर्धेसाठी पाठवलेली कादंबरी मराठीत किंवा मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत असावी.

३) कादंबरीच्या आशय/विषयावर कोणतेही बंधन नाही.

४) कादंबरी कोठेही पूर्वप्रकाशित असता कामा नये.

५) कादंबरी पूर्णतः नवी आणि मूळ स्वरूपातील (Original) असावी, ती भाषांतरित किंवा इतर भाषेतील कादंबरीची मराठी आवृत्ती (adaptation) नसावी.

६) कादंबरीची किमान शब्दसंख्या ५०,००० (पन्नास हजार) इतकी असणे बंधनकारक आहे; ती जास्तीत जास्त कितीही शब्दांची असू शकते.

७) परीक्षकांच्या मते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करण्याकरता स्पर्धेतील कोणतीही कादंबरी गुणवत्तेच्या निकषांवर पात्र न ठरल्यास पारितोषिक न देण्याचा अधिकार संयोजकांकडे असेल.

८) स्पर्धेच्या निकालाबाबतचे सर्वाधिकार संयोजकांकडे असतील; त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार किंवा तत्सम स्पष्टीकरण देण्याचे बंधन संयोजकांवर नसेल.

९) पारितोषिक विजेती कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित होईल.

१०) स्पर्धकांनी आपल्या कादंबरीची छापील प्रत (लिखित किंवा टाईप केलेली हार्ड कॉपी) खालील पत्त्यावर दि. २८ फेब्रुवारी २०२३पर्यंत पाठवावी.

मान्यवर लेखकांनाही या स्पर्धेत भाग घेता येईल.

ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमात पाठवलेली कादंबरीची सॉफ्ट कॉपी स्पर्धेकरता ग्राह्य धरली जाणार नाही.

पत्ता :

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

३०८ फिनिक्स,

४५७ एस. व्ही. पी. रोड,

गिरगाव,

मुंबई – ४००००४.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......