डोंबिवलीक येवा, साहित्य संमेलन आपलाच आसा!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • संमेलनाचे बोधचिन्ह व मुख्य मंडप
  • Fri , 03 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan आगरी युथ फोरम Agri Youth Forum सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल Savlaram Maharaj Sport Complex

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  आजपासून, शुक्रवार रविवारपर्यंत डोंबिवली (पूर्व) येथील पु. भा. भावे साहित्य नगरी अर्थात ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकूल इथं होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत संमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. डोंबिवलीमध्ये होणारं हे संमेलन फारशा कुठल्याही ताज्य वादाशिवाय होऊ पाहत आहे. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर राजकारण्यांचा भरणा, नियोजनातला काहीसा ढिसाळपणा आणि बहुधा अपुरी पडणारी जागा, अशा काही गोष्टींची चर्चा आजपासून पुढची दोन दिवस होत राहीलच. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडला डी.वाय.पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या संमेलनाशी या संमेलनाची तुलना कालपासूनच सुरू झाली होती आणि त्याबाबतीत डोंबिवलीच्या संमेलनाने मार खाल्ला असाही वहिम व्यक्त केला जात होता. असो. अशा चर्चांना अंत नसतो. काल संध्याकाळपर्यंत संमेलनाची जोरदार तयारी आयोजक संस्था करत होती. त्याची ही चित्रमय झलक...

साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवेशद्वार - पु. भा. भावे साहित्य नगरी

खालच्या बाजूला दिसणारे संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार क्रमांक दोन. डावीकडे दिसणारा मुख्य मंडप

मुख्य मंडप. संमेलनाचे उदघाटन, समारोप आणि काही महत्त्वाचे कार्यक्रम याच व्यासपीठावर होतील.

मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. किमान दहाएक हजार लोक बसू शकतील एवढा मोठा हा मंडप आहे.

मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. व्यासपीठाच्या डाव्या बाजूने घेतलेले छायाचित्र

मुख्य मंडपाच्या डाव्या बाजूला ग्रंथप्रदर्शन असून त्यात तीनशेच्या आसपास पुस्तकांचे स्टॉल्स आहेत.

मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूची तयारी काल रात्री उशिरापर्यंत चालू होती. हे छायाचित्र संध्याकाळचे आहे.

कवीसंमेलन व इतर परिसंवादासाठीचा छोटा मंडप उजवीकडे तर डावीकडे भोजनकक्ष आहे.

भोजनकक्षाची आतील रचना. इथे पापलेट, बांगडा आणि सुरमई मिळेल की नाही हे अजून माहीत नाही! आज दुपारीच कळेल.

छोटीशी भूक व तहान भागवणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. हे स्टॉल्स प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून येताना डाव्या बाजूला आहे तर, मुख्य प्रवेशद्वारातून येतानाही ते डाव्या बाजूलाच लागते.

मुख्य प्रवेशद्वार व प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून आत आल्यानंतर दिसणारा संमेलनाचा मुख्य मंडप.

साहित्य संमेलन ही महाराष्ट्रातील एक अभूतपूर्व अशी सांस्कृतिक घडामोड आहे. डोबिंवलीत ज्या म्हात्रे क्रीडा संकुलमध्ये हे संमेलन होत आहे, त्याचा गेल्या १०-१२ दिवसांत पुरता कायापालट झाला आहे. ती मूळ जागा २२ जानेवारीपर्यंत कशी होती, हे पाहण्यासाठी http://www.aksharnama.com/client/article_detail/443 या लिंकवर क्लिक करा.

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......