जल्लिकट्टूला घेतलं ‘पेटा’ने शिंगावर, तामिळी जनता उतरली रस्त्यावर!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘जल्लिकट्टू’चे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 January 2017
  • पडघम देशकारण jallikattu जल्लिकट्टू Tamil Nadu तामिळनाडू Pongal पोंगल बुल फायटिंग Bullfighting

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. जल्लिकट्टू या खेळाच्या बंदीविरोधात केवळ सर्वसामान्यच नाहीतर रजनीकांत, ए.आर. रहमान यांच्यासारखे चित्रपटकलावंतही मैदानात उतरले आहेत. जल्लिकट्टू हा तामिळनाडूमधील राज्य खेळाचा दर्जा असलेला प्राचीन खेळ आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणल्यापासून तो पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. शेवटी काल केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारला या खेळाबाबत अध्यादेश काढण्याची परवानगी दिली. त्यानुसार आज तामिळनाडूचे राज्यपाल तसा अध्यादेश काढून या खेळाला परवानगी देतील.

आंदोलनकर्त्यांनी या खेळाच्या विरोधात जनहितयाचिका दाखल करणाऱ्या पेटा (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेवरच बंदी आणण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पेटाने राज्यापालांच्या अध्यादेशालाही न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं जाहीर केलं आहे.

पेटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहितयाचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने २०१४मध्ये या खेळावर बंदी घातली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारने पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती स्वीकारली नाही. गतवर्षी केंद्र सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती, पण न्यायालयाने त्यावरही स्टे आणला होता. आता सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यावर न्यायालय लवकरच निर्णय देईल.

तो येईल तेव्हा येईल. तो काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण बंदीचा असेल तर पुन्हा तामिळी जनतेमध्ये क्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

तूर्त या खेळाविषयी थोडक्यात जाणून घेऊ…

‘जल्ली’ हा शब्द सल्ली या शब्दापासून आल्याचे मानले जाते. त्याचा अर्थ होतो, सिक्के. तर ‘कट्टू’ या शब्दाचा अर्थ होतो, बांधलेला.

पोंगलच्या दिवसांत तामिळनाडूमधील प्रत्येक शहर आणि गावामध्ये हा खेळ खेळला जातो. या खेळाला तामिळी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानतात.

हा खेळ चारशे वर्षं जुना असल्याचं सांगितलं जातं. काही लोक हा खेळ २००० वर्षं जुना असल्याचाही दावा करतात. प्राचीन काळी नवऱ्या मुली वराची निवड करण्यासाठी या खेळाचा आधार घेत असंही सांगितलं जातं. त्यामुळे या खेळाचं आयोजन स्वयंवरासारखं केलं जात असे.

हा खेळ पीक काढणी झाल्यानंतर पोंगलच्या काळात आयोजित केला जातो. धष्टपुष्ट वळूच्या शिंगांना लाल कापड बांधलं जातं आणि त्याला भडकावून गर्दीत सोडलं जातं. तरुणांनी त्याची शिंगं पकडून त्याला ताळ्यावर आणून त्याच्या शिंगाला बांधलेलं कापड सोडवायचं असतं. जो तरुण ते सोडवतो त्याला बक्षिस दिलं जातं.

वळूंना भडकावण्यासाठी त्यांना दारू पाजली जाते किंवा त्याच्या डोळ्यात तिखट टाकलं जातं किंवा त्याची शेपटी पिरगाळली जाते. आणि यामुळेच पेटाच्या कार्यकर्त्यांचा या खेळावर आक्षेप आहे.

या खेळाआधी तामिळी लोक आपापल्या गावात आपल्या वळूंना घेऊन या खेळाचा सराव करतात. मातीच्या ढिगाऱ्यावर शिंगे रगडायला लावून वळूकडून खेळाचा सराव करून घेतला जातो. त्याला बळकट खुंट्याला बांधून उचकवले जाते. त्यामुळे तो भडकून आपल्या शिंगांनी समोरच्याला अंगावर घेण्याच्या प्रयत्न करतो.

खेळाच्या सुरुवातीला एकेक करून तीन वळूंना मैदानात सोडलं जातं. ते गावातले सर्वांत वृद्ध वळू असतात. त्यांना कुणीही पकडत नाही. ते गावाची शान असतात. त्यानंतर खेळ सुरू होतो. हा खेळ तीन दिवस चालतो.

काही लोक या खेळाची तुलना स्पेनमधील बुल फायटिंगशी करतात. पण जल्लिकट्टू बुल फायटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळा खेळ आहे. यात वळूनला मारलं जात नाही किंवा वळूला ताळ्यावर आणण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा आधार घेतला जात नाही.

जल्लिकट्टू या खेळामध्ये वळूला वंदनीय मानलं जातं, कारण तो शेतीचा आधार असतो. बुल फायटिंगचं तसं नाही. ते वळू शेतीच्या कामासाठी वापरले जात नाहीत, ते फक्त या खेळासाठीच तयार केले जातात.

या खेळासाठी जेलिकट या जातीचेच वळू वापरले जातात. हे वळू स्वभावत:च आक्रमक असतात. ते आपल्या शिंगांनी मारतात.

या खेळात वळूंना ताळ्यावर आणण्यात अनेक तरुण जखमी होतात. काहींच्या जिवावरही बेततं. २०१० ते २०१४ या चार वर्षांत तामिळनाडूमध्ये या खेळात साधारणपणे अकराशेहून अधिक तरुण जखमी झाले होते, तर १७ जणांचा मृत्यू झाला होता.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......