२४ मार्च ते ३१ मे २०२० : लॉकडाउन ते अनलॉक १.० - देश गोठवून टाकणाऱ्या दिवसांची एक व्हिडिओमय झलक
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘उठेंगे हम’ या माहितीपटाचे एक पोस्टर
  • Sat , 13 June 2020
  • पडघम देशकारण उठेंगे हम Uthenge Hum उठेंगे हम We Will Rise भारतबाला Bharatbala करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

२४ मार्च २०२० हा दिवस या वर्षांतला ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ म्हणून गणला जाईल. कदाचित या दशकातला तो ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ही ठरेल. कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. तो नंतर वाढवत वाढवत १ जूनपर्यंत गेला. नक्की सांगता येत नाही, पण भारतीयांचं जगणं बंदिस्त करणारा, त्यांचा वावर कडकोट बंदिस्त करणारा दिवस म्हणूनही त्याचं नाव भावी इतिहासात नोंदलं जाईल.

तसाच ३१ मे २०२० हा दिवसही. या दिवशी रेड झोन वगळता इतर ठिकाणचा लॉकडाउन संपून ‘अनलॉक १.०’ सुरू झाला. (हळूहळू ऑफिसेस, बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याला हळूहळू परवानगी मिळतेय. अनलॉकनंतरही करोनाची भीती वर्तवली जातेच आहे. पण तो वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे.)

या दोन महिने एक आठवड्याच्या कालावधीत आपला देश कसा होता, लॉकडाउन होता म्हणजे नेमका काय होता, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या औरसचौरस, खंडप्राय, मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय देशाने या सक्तीच्या लॉकडाउनमध्ये कसे दिवस व्यतीत केले, याचा शोध घेतला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक व फिल्ममेकर भारतबाला आणि त्यांच्या टीमने.

२५ मार्चपासून देशभरात तब्बल ११७ ठिकाणी टीम बांधून त्यांनी ‘उठेंगे हम’ हा चार मिनिटे दहा सेकंदांचा विशेष माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात १३० कोटी भारतीयांची आणि त्यांच्या भारत या देशाची गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......