२४ मार्च ते ३१ मे २०२० : लॉकडाउन ते अनलॉक १.० - देश गोठवून टाकणाऱ्या दिवसांची एक व्हिडिओमय झलक
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘उठेंगे हम’ या माहितीपटाचे एक पोस्टर
  • Sat , 13 June 2020
  • पडघम देशकारण उठेंगे हम Uthenge Hum उठेंगे हम We Will Rise भारतबाला Bharatbala करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

२४ मार्च २०२० हा दिवस या वर्षांतला ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ म्हणून गणला जाईल. कदाचित या दशकातला तो ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ही ठरेल. कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. तो नंतर वाढवत वाढवत १ जूनपर्यंत गेला. नक्की सांगता येत नाही, पण भारतीयांचं जगणं बंदिस्त करणारा, त्यांचा वावर कडकोट बंदिस्त करणारा दिवस म्हणूनही त्याचं नाव भावी इतिहासात नोंदलं जाईल.

तसाच ३१ मे २०२० हा दिवसही. या दिवशी रेड झोन वगळता इतर ठिकाणचा लॉकडाउन संपून ‘अनलॉक १.०’ सुरू झाला. (हळूहळू ऑफिसेस, बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याला हळूहळू परवानगी मिळतेय. अनलॉकनंतरही करोनाची भीती वर्तवली जातेच आहे. पण तो वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे.)

या दोन महिने एक आठवड्याच्या कालावधीत आपला देश कसा होता, लॉकडाउन होता म्हणजे नेमका काय होता, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या औरसचौरस, खंडप्राय, मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय देशाने या सक्तीच्या लॉकडाउनमध्ये कसे दिवस व्यतीत केले, याचा शोध घेतला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक व फिल्ममेकर भारतबाला आणि त्यांच्या टीमने.

२५ मार्चपासून देशभरात तब्बल ११७ ठिकाणी टीम बांधून त्यांनी ‘उठेंगे हम’ हा चार मिनिटे दहा सेकंदांचा विशेष माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात १३० कोटी भारतीयांची आणि त्यांच्या भारत या देशाची गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......