भव्य ग्रंथदिंडी काहीशा बोचऱ्या थंडीत उस्मानाबादकरांसाठी ऊब आणणारी ठरली!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • ग्रंथदिंडीची छायाचित्रे
  • Fri , 10 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अ. भा. मराठी साहित्य संमेलन

आजपासून उस्मानाबाद इथं ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली भव्य ग्रंथदिंडी उस्मानाबादकरांसाठी काहीशा बोचऱ्या थंडीत ऊब आणणारी ठरली. तब्बल १५ वर्षांनी उस्मानाबादमध्ये सहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा उत्साह ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत होता.

उस्मानाबादमधील तेर हे गाव संत गोरोबा यांचं जन्मगाव. त्यामुळे सहित्य संमेलनस्थळाचं 'संत गोरोबाकाका सहित्यनगरी' असं नामकरण केलं आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत गोरोबाकाका यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता

संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासमोर बाल वारकरी हरिनामाचा गजर करत होते

त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांच्या नावाची गाडी आणि देखावेही होते

संत गोरोबाकाका याच्या मातीच्या गोळ्यातून मडकी घडवणार्‍या चाकाची हलती प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती

शालेय मुलं आणि मोठे यांचा उत्साह ओसंडत होता

मुली आणि महिला यांची संख्या लक्षणीय होती

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने त्यांचं जन्मगाव, वसई इथून आलेले अनेक ख्रिस्ती बांधव ग्रंथदिंडीमध्येही सह्भागी झाले होते

बाबा रामदेव यांनी ग्रंथदिंडीमध्येही आपली जाहिरात करण्याची संधी सोडली नाही. यातून आपण मराठी माणसं कधी बोध घेणार?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 14 January 2020

फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अचानक का बिघडली या ग्रंथदिंडीच्या वेळेस? हिंदू धर्मग्रंथ डोक्यावर घ्यावे लागतील म्हणून तर नाही?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......