भव्य ग्रंथदिंडी काहीशा बोचऱ्या थंडीत उस्मानाबादकरांसाठी ऊब आणणारी ठरली!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • ग्रंथदिंडीची छायाचित्रे
  • Fri , 10 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अ. भा. मराठी साहित्य संमेलन

आजपासून उस्मानाबाद इथं ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली भव्य ग्रंथदिंडी उस्मानाबादकरांसाठी काहीशा बोचऱ्या थंडीत ऊब आणणारी ठरली. तब्बल १५ वर्षांनी उस्मानाबादमध्ये सहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा उत्साह ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत होता.

उस्मानाबादमधील तेर हे गाव संत गोरोबा यांचं जन्मगाव. त्यामुळे सहित्य संमेलनस्थळाचं 'संत गोरोबाकाका सहित्यनगरी' असं नामकरण केलं आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत गोरोबाकाका यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता

संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासमोर बाल वारकरी हरिनामाचा गजर करत होते

त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांच्या नावाची गाडी आणि देखावेही होते

संत गोरोबाकाका याच्या मातीच्या गोळ्यातून मडकी घडवणार्‍या चाकाची हलती प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती

शालेय मुलं आणि मोठे यांचा उत्साह ओसंडत होता

मुली आणि महिला यांची संख्या लक्षणीय होती

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने त्यांचं जन्मगाव, वसई इथून आलेले अनेक ख्रिस्ती बांधव ग्रंथदिंडीमध्येही सह्भागी झाले होते

बाबा रामदेव यांनी ग्रंथदिंडीमध्येही आपली जाहिरात करण्याची संधी सोडली नाही. यातून आपण मराठी माणसं कधी बोध घेणार?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 14 January 2020

फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अचानक का बिघडली या ग्रंथदिंडीच्या वेळेस? हिंदू धर्मग्रंथ डोक्यावर घ्यावे लागतील म्हणून तर नाही?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......