जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने पूर्वपदावर आणावे
पडघम - देशकारण
गणेश देवी आणि इतर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरचा नकाशा
  • Mon , 30 September 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi जम्मू-काश्मीर Jammu and Kashmir लडाख Ladakh

प्रति

श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान, भारत सरकार

माननीय महोदय,

सहिष्णुता आणि सलोखा ही आपल्या महान राष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्र उभारणीची निरंतर प्रक्रिया ही राष्ट्रातील जनतेच्या भावनिक अनुबंधावर अवलंबून असते. नागरी स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती आणि समाजाची प्रगती शक्य नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे.

सध्या जम्मू-काश्मीरमधील जनता जीवनावश्यक गरजा आणि नागरी स्वातंत्र्यापासून वंचित असल्याने अत्यंत हलाखीच्या आणि तणावग्रस्त स्थितीमध्ये आहे. तेथील लहान मुलांच्या मनावरही विपरीत परिणाम झाला आहे. तेथील स्थानिक नेत्यांना स्थानबद्ध किंवा अटक केलेली असून त्यांचा जनतेशी संपर्क तोडण्यात आला आहे. नेतृत्वहीन समाज हे अराजकाला आमंत्रण असते.

आम्ही आपल्याला आवाहन करतो की, जम्मू-काश्मीरमध्ये नागरी स्वातंत्र्याची पुनर्स्थापना करून समाजातील सर्व घटकांशी सहानुभूतीने संवाद सुरू करावा. शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे. तसेच ५ ऑगस्ट २०१९ पासून अटकेत आणि स्थानबद्ध असलेले राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची सुटका करावी. स्वतंत्र निरीक्षक आणि माध्यमातील व्यक्तींना मुक्त संचारास परवानगी देऊन जम्मू-काश्मीरमधील कारभारात पारदर्शीपणा आणावा.

कळावे

आपला नम्र

मी भारताचा नागरिक

डॉ. गणेश देवी, निमंत्रक, दक्षिणायन; राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल

डॉ. जी जी पारीख, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक

डॉ. सुगन बरंठ, सेवाग्राम कलेक्टिव्ह

आशिष नंदी, समाजशास्त्रज्ञ, लेखक

मलिका साराभाई, प्रसिद्ध नृत्यांगना

प्रकाश शहा

रामदास भटकळ, प्रकाशक, लेखक

फैजल खान, राष्ट्रीय संयोजक, खुदाई खिदमदगार

अरविंद अंजुम

संजीव साने, स्वराज्य अभियान, महाराष्ट्र

.............................................................................................................................................

या अर्जाला पाठिंबा देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdK4V

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 02 October 2019

अरे वा! पत्राचा आव तर असं की जणू काश्मिरात मोठ्ठी दुर्घटनाच घडलीये. काश्मिरी जनतेला भ्रष्ट नेत्यांची (मुफ्ती, अब्दुल्ला पितापुत्र, गुलाम नबी आझाद वगैरे यांची ) कसलीही काळजी पडली नाहीये, हे खरं दुखणं आहे. काश्मिरी हिंदू कापले गेले, त्यांच्या आयाबहिणी नासवल्या गेल्या, ते नेसत्या कपड्यांवर परागंदा झाले, तेव्हा कोणी असली पत्रंबित्रं लिहिल्याचं ऐकिवात नाही. मग आज असं काय घडलं की तथाकथित विचारवंतांना जनतेचा पुळका आला?

-गामा पैलवान


Sachin Shinde

Mon , 30 September 2019

Khup Chan he aaj hone garjeche aahe ani mazihi ashich bhavana aahe


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा