चालता-बोलता मनुष्यरूपी रोबोट बनवण्याऐवजी बुद्धिमान भारतीय नागरिक कसा बनवता येईल?
पडघम - देशकारण
रजनीकांत मोहन पालवे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 24 April 2019
  • पडघम देशकारण शिक्षण Education तक्षशिला विद्यापीठ Takshashila University नालंदा विद्यापीठ Nalanda University मॅकॉले Macaulay

आज आपली शिक्षण व्यवस्था अतिशय गंभीर वळणावर उभी आहे. शिक्षण देण्याच्या भाऊगर्दीत बुद्धिमत्ता देण्यात या व्यवस्थेला अपयश येताना दिसून येत आहे. शिक्षणाचे जे बाजारीकरण सुरू आहे, त्यावर उपाय शोधण्याचा सरकार-प्रशासन प्रयत्न करेलच, परंतु  सामान्य नागरिक म्हणून आपण यातून कसा मार्ग काढू यावर सामूहिक चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला या व्यवस्थेच्या जन्मापासूनच्या प्रवासाकडे जावे लागेल. कदाचित या प्रवासातूनच आपल्याला काही शिकता येईल आणि आणि अपेक्षित बदलाच्या नांदीची सुरुवात करता येईल.

भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केल्यास आपल्याला द्रविड, आर्यन, मंगोलियन आणि सायशियन या राज्यकर्त्यांच्या इतिहासात डोकवावे लागेल. या चारपैकी द्रविड आणि आर्यन साम्राज्यात लोकाभिमुख कार्य झाले होते. द्रविड कारभार प्रामुख्याने बांधकाम आणि संगीत यावर आधारित होता, तर आर्यन राज्यकारभार आध्यात्मिक व नैतिक कल्पनेवर आधारित होता.

आपल्या देशावर आर्यन संस्कृतीचा पगडा जास्त काळ टिकला. त्यासोबतच आपली भौगोलिक परिस्थिती इतर देशाच्या तुलनेत चांगली होती. त्यामुळे युरोपियन आणि इतर तत्सम देशांसारखा जगण्यासाठीचा (खाद्य शोधणे) संघर्ष आपल्या नशिबी कमीच आला. म्हणूनच आपण वेळेचा सदुपयोग आणि आर्यन संस्कृती यामुळे आपण ध्यानधारणा आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात पारंगत झालो. आणि तिथून आपल्या शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी सुरू झाली.

सुरुवातीच्या काळात गुरुकुल आणि पाठशाळा पद्धतीत आचार्य (शिक्षक)-शिष्य (विद्यार्थी) ही अनमोल परंपरा रूढ झाली. वेदिक शिक्षणाचे दूरगामी फायदे दिसू लागल्यामुळे दुसऱ्या देशातील समाजदेखील याकडे आकर्षित होऊ लागला. त्याचीच फलनिष्पती म्हणून आर्यभट्ट आणि चाणक्य यांसारखे हिरे आपण जगाला देऊ शकलो.

तदनंतर बौद्ध आणि जैन शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. त्याचाच परिपाक म्हणून जगातील पहिले भव्यदिव्य, साहित्य संपदेने विपुल असे ‘नालंदा विद्यापीठ’ आपण जगाला समर्पित करू शकलो. त्यासोबतच बौद्धी शिक्षण व्यवस्थेचा उत्कृष्ट परिणाम म्हणून ‘तक्षशिला विद्यापीठ’ नावाजले गेले. नंतरच्या मुस्लिम शासकांच्या काळात व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात झाली. परंतु दुर्देवाने मुस्लिम शासकांच्या काळातच नालंदा आणि तक्षशिला उद्ध्वस्त करण्यात आली.

१८०० च्या काळात भारतीय शिक्षणव्यवस्था ब्रिटिश पुरस्कृत वसाहती शिक्षणाच्या नावाखाली ब्रिटिश मिशनरींच्या एका छुप्या अजेंड्याकडे खेचली गेली आणि तिथूनच आपल्या देशाचा बौद्धिक ऱ्हास सुरू झाला. जुन्या व्यवस्थेत शिष्य-गुरूला आजीवन सेवारूपी गुरुदक्षिणा द्यायचा, पण ब्रिटिश काळापासून शिक्षकांना पैसेरूपी पगार देऊन शिक्षकांना वळचणीला बांधण्याची पद्धत सुरू झाली. नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरात सुरू करण्याचा सपाटा लावला गेला. विभागनिहाय विद्यापीठे काढून त्याची पाळेमुळे आणखी घट्ट केली गेली. शिक्षणातूनच सरकारी नोकरी असा नवा दंडकदेखील इथूनच सुरू झाला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

ब्रिटिश राजवटीने भारतीय शिक्षण व्यवस्थेत कमालीचा बदल केला, पण त्यात काही अनिष्ट परंपरांनी जन्म घेतला. जसे की, संपूर्ण शिक्षण सहस्त्र वर्षे जुन्या मायबोलीऐवजी इंग्रजीतून, फी नुसार शाळांची वर्गवारी करून गरिबी-श्रीमंतीमध्ये भिंत उभी केली गेली, शाळेवर खाजगी मंडळांचे नियंत्रण आणले गेले वगैरे.

या अनिष्ट प्रथांमुळेच आज आपली शिक्षण व्यवस्था एका भयानक अवस्थेतून मार्गक्रमण करत आहे. स्वातंत्रपूर्व काळात औद्योगिक गरजांवर आधारित मनुष्यबळाची संख्या वाढवण्यासाठी पार्टटाईम शिक्षणाचा प्रकार सुरू झाला. जितक्या प्रमाणात पार्टटाईम विद्यार्थी तितक्या प्रमाणात, रोजगार नसल्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत गेली.

आज आपली शिक्षण पद्धती निश्चितच समाधानकारक आहे, परंतु ती तितकीच मर्यादितही आहे. या शिक्षणातून चांगले नोकर जरूर मिळतील, परंतु एक बुद्धिमान, ध्येयवेडा, कुटुंबासह देशाला प्रगतीपथावर नेणारा वर्ग खचितच देऊ शकू. या संपूर्ण उलट्या प्रवासात व्यवस्थेत होणाऱ्या बदलासोबत पालकांची बदलत गेलेली मानसिकताही कारणीभूत आहे. संसार-नोकरी/व्यवसाय या रहाटगाड्यात गुंतून मुलांच्या परिपूर्ण विकासाकडे दुर्लक्ष करून सारी भिस्त शिक्षण व्यवस्थेवरती ठेवल्यामुळेच ही वेळ आली आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.

अर्थात जागरूक पालक वर्ग याला नक्कीच अपवाद आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही चांगल्या बाबी नक्की आहेत. म्हणूनच देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांना भरपूर मागणी आहे. आपला विद्यार्थी जागतिक पातळीवरती भारताचा झेंडा दिमाखात मिरवत आहे, परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात बुद्धिमत्तेची मोजदाद करावयाची वेळ आल्यास ती खेददायक असेल.

काही वर्षापूर्वीचे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही लागू होतात की, “आपली शिक्षण व्यवस्था मुळात चुकीची आहे. ज्यामध्ये विचार कसा करावा हे न बिंबवता घोकंमपट्टी आधारित शिक्षणाने मेंदूवर ताबा घेतला आहे.”  

भविष्यात आपल्याला चालता-बोलता मनुष्यरूपी रोबोट बनवण्याऐवजी बुद्धिमान भारतीय नागरिक कसा बनवता येईल, यावर पर्याय शोधला पाहिजे. वाढती लोकसंख्या, वाढते संगणकीकरण आणि घटत जाणारे रोजगार यावर कालबद्ध पर्याय काढण्यासाठी सरकार-प्रशासन यांनी संयुक्त पातळीवर जोरदार प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरून उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्तता करणे, ब्रिटिशकालीन अनिष्ट प्रथा बंद करणे, इंग्रजीचा अट्टहास न करता मायबोलीतून शिकवले गेले तर स्व:अध्ययन सोपे जाईल, फी शाळेत न भरता थेट सरकारकडे जमा करण्याची यंत्रणा उभी करणे, लघु-मध्यम तसेच शेतीपूरक उद्योगांचा अभ्यासक्रमात समावेश करणे, नोकरीतर पर्यायांची ओळख करून देणे, योगा, ध्यानधारणासोबत खेळाचा कुठलाही एक प्रकार बंधनकारक करून मुलांच्या कल्पकतेवर आधारित विषयांची बांधणी करणे, अशा गोष्टी व्यवस्थेत आणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासोबत त्याला जबाबदार नागरिक करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे.

भूतकाळात आपली शिक्षण व्यवस्था किती महान होती, यावर चर्चा करण्यापेक्षा भूतकाळातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण वर्तमानकाळात केल्यास आपला भविष्यकाळ नक्कीच सुंदर व समृद्ध होईल. जास्तीत जास्त लोकांच्या समूहांपर्यंत शिक्षण आणि बुद्धिमत्ता पोहोचल्यास भारत जगात बलशाली राष्ट्र म्हणून पुढे येईल यात तीळमात्र शंका राहणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक रजनीकांत मोहन पालवे मराठवाडा मित्रमंडळ तंत्रनिकेतन, पिंपरी चिंचवड इथे अधिव्याख्याता आहेत.

palwerm@mmpolytechnic.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dhananjay Bhosale

Wed , 24 April 2019

अभ्यासपूर्ण विश्लेषण.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......