पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची माझ्या अल्पवयीन भारतीय नागरिकांची देशभक्ती
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
रजिया सुलताना
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 March 2019
  • पडघम कोमविप पंचायत भारती Panchayat Bharti पुलवामा दहशतवादी हल्ला Pulwama attack

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सुरक्षादलांवरील सर्वांत मोठा हल्ला ठरला. ४५ भारतीय सैनिक मारले गेले. जखमींचा आकडा अद्याप हातात आलेला नाही. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारेही लागले. ते लागायलाच हवे. या हल्ल्यानंतर राजकीय स्तरातून सैनिक सुरक्षेचे समीक्षणदेखील झाले. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून यांवर फार मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले गेले. कँडल मार्च निघाला. या श्रद्धांजलीचे फोटोसेशनदेखील झाले खरे. म्हणजे श्रद्धांजलीच्या बॅनरवर स्वतःच्या फोटोची काहीच गरज नसताना तोही टाकला गेला. टाकणाऱ्यांना एवढेही भान राहिले नाही, हा फोटो फॅशनेबल आहे.

असो. मुळातच सोशल मीडिया, स्मार्ट फोन, व्हॉटसअॅप या दुनियेपासून दूर असल्यामुळे मी इतके दिवस माझ्या समाजात या हल्ल्याबाबत काय खदखदते याचा कानोसा घेतला. मला अपेक्षित होते, गुरुवारी हा हल्ला झाल्यानंतर शुक्रवारच्या नमाजात मस्जिदमधून जो खुदबा (धार्मिक उपदेश) होतो, तो नक्षलवादी समस्येवर आणि या घटनेवर व्हावा. मात्र तसे कमीच झाले. नेहमीचेच तेच प्रवचन ‘मरने के बाद क्या होगा? जन्नत के हकदार हम कैसे बनेंगे’ हेच ऐकायला मिळाले. मग दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक मोठ्या शहरातील चांदणी चौकातून निषेध मोर्चा, बॅनर मोर्चा, कँडल मोर्चा निघाले. काही ठिकाणी निषेध सभादेखील झाल्या.

यावेळी मला आशावादी चित्र बघायला मिळाले. हिंदू-मुस्लीम सामाजिक एकतेवर सामाजिक अभिसरण प्रकल्पात काम करताना, एरवी काही धार्मिक प्रसंगी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ज्यांना उद्देशून म्हटले जात होते, त्याच समाजातील लहान लहान मुलांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे लावले.

माझ्या या अल्पवयीन भारतीय नागरिकांना गर्दी जमा करता येते, मात्र विचार मांडता येत नाही. मग त्यांनी चांगले विचार मांडणाऱ्या गुरुजींना बोलावले, कार्यक्रमाकरिता पैसे नव्हते. कार्यक्रमाला स्टेज बनवण्याकरिता माझ्याच घरचा लाकडी तख्त (पलंग) नेला. मुले वयाने लहान होती. मात्र दहा-बारा लहान मुलांनी तो पलंग कार्यक्रमाकरिता उचलून नेला. घरच्याच फाटक्या सतरंज्या, चादरी बसायला टाकल्या. त्यांच्या प्रत्येक वृत्तीतून मला देशभक्ती दिसत होती. कँडल मार्च, मुर्दाबादचे नारे लावण्याची त्यांना गरजच पडली नाही. या चिमुकल्यांच्या कार्यक्रमाला गर्दीही भरपूर होती. जेवढे फाटक्या चादरीवर बसले होते, तेवढेच उभे होते. आणि तेवढेच गच्चीवरून ऐकत होते.

मागील ३५ वर्षांपासून आम्ही यांसारख्या चिमुकल्यांना मस्जिदीच्या बाहेर पडल्यानंतर एवढीच शिकवण दिली, ‘जेवढं आपण धर्मावर प्रेम करतो, तेवढंच देशावर करा. दुसरं म्हणजे आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, नंतर मुसलमान आहोत. हे कायमचे लक्षात असू द्या.’ या विचार प्रवाहाचे सार्थक झाले, याचा मला आनंद झाला. अभिमानही वाटला. कार्यक्रमाच्या समाप्तीला सर्वांनीच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे लावले. आतापर्यंत हे नारे गैरमुस्लीमाच्या तोंडून निघत होते. ते बघतच राहले. कारण आता मुसलमानांना कळून चुकलेले आहे. खऱ्या अर्थाने देशभक्ती सिद्ध करायची वेळ आपल्यावर आहे. अन्यथा आपल्या पिढीचे काही खरे नाही.

माझा नातू दहा वर्षांचा आहे. त्याला सैनिक दलाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. हल्ल्यानंतर टीव्हीवरचे दृश्य बघून त्याला आम्ही म्हणालो, “सैनिक दलात गेले की, असे मरण येते.’ तरीही उत्साहात तो आम्हाला म्हणाला, ‘मला सैनिकच व्हायचे आहे. देशसेवाच करायची आहे.’ येणारा काळ त्याचे उत्तर देईल. कारण मानव प्राणी भूतकाळ विसरून वर्तमान जगत असतो. हा हल्लाच इतका भयंकर होता की, लिखाणाची, बोलण्याची ताकदच संपली. मला सावरायला तीन दिवस लागले. या तीन दिवसांत मी काही घटनांचे अवलोकन केले. मुल्ला-मौलाना यांच्याशी दहशतवादाचे विश्लेषण केले आणि जनसामान्यांशी संवाद केला.

यानंतर जे अनुभव आले ते असे, अजूनही २५ टक्के लोक दुःखद टाहो फोडत आहेत आणि २५ टक्के लोक सैनिकांच्या वेदनांचे भांडवल करून स्वतःची प्रसिद्धी, मोबाईल स्टेटस् आणि सैनिक कल्याण निधीच्या नावावर स्वतःच्या अर्थार्जनाची सोय करत आहेत. समाजात हे चालणारच. समाज म्हटला की, हौसेनवसे, गवसे, सगळेच आले.

सरतेशेवटी माझ्या डोळ्यासमोर येतो तो दहशतवादी हल्ला घडवून आणणारा आदिल, त्याला जन्म देणारी आई आणि समाजात शरमेने खाली मान घालून चालणारा त्याचा बाप. मुले वयात आली की, आई-वडिलांचे ऐकत नाहीत हा भाग. मुले घरात भरपूर पैसे आणत असतील तर ते कोठून येतात, हे न विचारणारे मायबाप, मुलगा वाईट वळणावर गेला म्हणून त्याचा पिच्छा सोडून देणारे मायबाप, डोक्यात मौलाना टोपी घालून पाचदा तो घाईने काश्मिरी मस्जिदीत जातो म्हणजे तो ‘अल्लाह के राहपर चलनेवाला नेक बंदा’ असे समजणारे मायबाप. खरंच या आई-वडिलांना हे माहिती नसेल, एके दिवशी आपला मुलगा असे देशविघातक कृत्य करेल?

जन्नतचे आमीष आणि घरात येणारे पैसे यामुळे हे वरील चिंतन कोणत्याच कुटुंबात होत नाही. अजूनही भारतात, मुस्लीम समाजात असे कितीतरी आदिल, ओसामा, कसाब असतील ज्यांना वयाच्या पंचविशीच्या आतच असे कृत्य करून जन्नतमध्ये पाठवले जाईल. मृत्यूला न भिणारे हे तरुण मरताना ‘या खुदा’ म्हणतात. खुदा खरेच यांना माफ करेल?

या दहशतवादी हल्ल्याच्या वेदनेबद्दल इतकेच म्हणावेसे वाटते.

आता बोलबाला वेदनांचा फार झाला.

भावनांचा केवढा व्यापार झाला.

आदिल, तू दिल्या वेदना इतक्या की,

मोजताना आकडाही पार झाला.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 28 March 2019

रझिया सुलताना, तुमच्या भावनेशी १००% सहमत आहे. इस्लाममध्ये जो आतंकवाद घुसला आहे त्याला आईच काबूत आणून नष्ट करू शकते. शीख आतंकवाद पंजाबी माताभगिनींनी संपवला. आतंक्यांना अपेक्षित असलेलं लोकांचं पाठबळ मिळालंच नाही. पंजाबी माताभगिनींनी जे बालकांवर संस्कार केले होते त्यांत निरपराध्यांना ठार मारण्याची शिकवण नव्हती. मुस्लिम (विशेषत: सुन्नी) मातांना नेमकं हेच करायचं आहे. ते तुम्ही कराल, असाच तुमचा निर्धार दिसतोय. यासोबत आजून एक गोष्ट आवर्जून करा. तुमच्या मुलांना समजावून सांगा की हरामाचा पैसा गिळून कोणीही जन्नतमध्ये जात नसतो. आज मुस्लिम बालकांच्या मनांत पद्धतशीरपणे तेढ वाढवण्यात येत आहे. त्याला सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा कारणीभूत आहे. तुम्ही माताभगिनी त्या पैशाला सर्वार्थाने पराभूत करू शकता. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......