विजय तेंडुलकर यांचे ‘साधना’च्या संपादकांना पत्र
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • विजय तेंडुलकरांनी साधनाच्या संपादकांना लिहिलेल्या पत्राचे छायाचित्र
  • Fri , 01 June 2018
  • पडघम माध्यमनामा विजय तेंडुलकर Vijay Tendulkar जयदेव डोळे Jaydeo Dole साधना साप्ताहिक Sadhana Saptahik

मराठीतील श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनाला नुकतीच, म्हणजे १९ मे रोजी १० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं ‘विजय तेंडुलकर यांना एका संपादकाचे अनावृत पत्र’ हा लेख २८ मे रोजी प्रकाशित केला होता. आता हा दुसरा लेख. हे पत्र तेंडुलकरांनी १९९८ साली ‘साधना’ साप्ताहिकाच्या तत्कालिन संपादकद्वयांपैकी श्री. जयदेव डोळे यांना लिहिलं होतं. त्यामुळे अर्थातच हे पत्र म्हणजे २८ मेच्या पत्राला प्रत्युत्तर नाही. तर या पत्रातून तेंडुलकरांच्या स्वभावाचा - तरुण पत्रकारांप्रती आणि एकंदर सामाजिक चळवळींतील कार्यकर्त्यांप्रती असलेल्या ममत्वाचा - पैलू उजागर होतो.

.............................................................................................................................................

२७ ऑगस्ट १९९८, मुंबई

प्रिय जयदेव,

तुम्ही पाठवलेला ‘साधना’चा १५ ऑगस्टचा अंक वाचतो आहे. कार्यकर्त्यांचे अनुभव आणि लेख वाचून झाले आहेत. अनुभवातून आलेले यातले बरेचसे लेखन असल्याने त्यात दम आहे.

सूचना एकच की, अशा लेखनावर, त्याचा अधिक विस्तार, संपादन असे काही काम छापण्यापूर्वी व्हायला हवे. कधी थोडे संपादकीय, प्रास्ताविकही आवश्यक होते. अनुभवाचे वाचन कसे करावे हे सुचवावे लागते. त्याअभावी तो ‘कच्चा माल’ राहतो आणि दृष्टी नसलेल्या वाचकाला त्यातून काही मिळू शकत नाही.

कुणाचाही अनुभव - जगण्याची किंमत देऊन घेतलेला - असा वाया जाऊ नये. त्याने वाचकाला काही दिले पाहिजे.

साधनेच्या पानांची मांडणी अधिक आकर्षक (म्हणजे सजावट नव्हे;) व्हायला हवी. टाइपांचा विचार व्हायला हवा. मुख्यत: नेहमीच्या अंकाची पाने वाढली पाहिजेत. असलेल्या पानांत विषय गुदमरतात. आणि विषय तर पुष्कळ आहेत.

काही विषय Topical असले तरी Predictable असतात. यावर सवड ठेवून आधीच लिहून घ्यावे. विषय संग्रही ठेवून योग्य वेळी छापावेत. याने लिहिणाराला आणि संपादन करणाराला सुधारण्याला अवसर मिळतो. एरवी लेख असेल तसा छापावा लागतो.

हे पत्र छापण्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे.

- विजय तेंडुलकर

….….….….….….….….….….….….….….

शक्य तेवढे टंकाचे, आकर्षकतेचे, लेआऊटचे, मुखपृष्ठाचे, कागदाचे बदल मिलिंद जोशी या आर्टिस्टच्या मदतीने केलेले होते. ते अर्थातच अपुरे होते म्हणून विजयकाकांनी कार्ड पाठवले होते. मी तेव्हा ४०चा व नरेंद्र बहुधा ५२चा होता. तरुण (म्हणजे प्रधान-बापट यांच्या मानाने) संपादकांना अशा आपुलकीने, सदभावाने सूचना करण्याचे मन त्या पत्राने उघड केले होते. जसे त्यांनी संतोष कोल्हे, सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी यांच्यावर छत्र धरले होते, तसेच हे ‘साधने’च्या संपादकांवर त्यांनी धरले होते. पत्रकारितेत राहिलो असतो तर कदाचित मलाही या छत्राखाली राहायला आवडले असते. २००७ की २००८ मध्ये ‘अनुभव’मध्ये मराठी भाषेवर मी लिहिलेल्या लेखाला त्यांनी त्यांचे पत्र छापायला लावून जाहीर शाबासकी दिली, तेव्हा फार फार आनंद झाला. परंतु तेव्हाही ते कौतुक मी ना मिरले, ना चमकावले. तेंडुलकरांना त्याबद्दल पत्र पाठवायचा प्रश्नच नव्हता. खरे तर ‘तें’ व मी एकदाच भेटलो होतो. तेही पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात. नंतरच्या साऱ्या भेटी अशा लेखी- टपालीच!

- जयदेव डोळे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......