२०१७ : बेस्ट ऑफ ‘कळ’फलक (संजय पवार)
सदर - ‘कळ’फलक
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 26 December 2017
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष कळफलक संजय पवार

प्रसिद्ध नाटककार, स्तंभलेखक संजय पवार यांचं ‘अक्षरनामा’वरील ‘‘कळ’फलक’ हे बंद्या रुपयासारखं खणखणीत साप्ताहिक सदर. वर्षभरात या सदरात प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं संजय पवार यांचं मर्मभेदक भाष्यही जाणून घेता येतं...

.............................................................................................................................................

छकुली आणि मी

छकुलीशी काहीही संबंध नसताना, पार कोर्टात जाऊन निकाल ऐकून आले. खरं तर त्या गर्दीत मला हंबरडा फोडावासा वाटत होता. अगदी मोठ्यानं. छाती फुटली असती इतक्या जोरात. छकुलीसाठी नाही. माझ्यासाठीच. छकुलीचं नाव कळलं नाही, तसं माझंही नाव कुणाला माहीत नाही. छकुलीला रेप करून मारणारांची नावं जशी कळली, तसंच माझ्यावर प्रेम करून जीवानिशी गेलेल्या त्या माझ्या प्रियकराचं नावंही तुम्हाला माहीत आहे. नितीन आगे!.......

Thu, 07 December 2017

.............................................................................................................................................

 ‘मी लाभार्थी’ थर्ड डिग्रीचा! - अनिकेत कोथळे (२६)

महाराष्ट्रीय जनहो! तुम्ही आम्ही आपण सर्वच या मायबाप सरकारचे असे ना तसे ‘लाभार्थी’ आहोत. आपल्या सर्वांच्याच कहाण्या कदाचित जाहिरातीत येणार नाहीत. त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही. अशा वेळी रसून न बसता, जे कुणी ‘मी लाभार्थी’ म्हणून झळकले, मिरवले त्यांच्याबद्दल कणमात्र असूया न बाळगता आपण आपल्याला मिळालेला लाभ, आपणच एकमेकांना सांगायला हवा. आपणच आपला आधार (क्रमांक नव्हे!) बनूया.......

Tue, 14 November 2017

.............................................................................................................................................

‘फेसबुक’ ठीक हो! ‘फेस टु फेस’ कधी भिडणार?

एका पक्षाच्या नेत्यानं आता किती जणांच्या पोस्ट वाचायच्या? कविता झेलायच्या? प्रतिपादनं मांडायची, खोडायची? आपल्या कोशात जाऊन बसलेले राज ठाकरे फेसबुक वरून पुन्हा कोशातच जाणार. केवळ निवडणुका आल्यावरच मैदानं शोधायची? ‘फेसबुक’पेक्षा ‘फेट टु फेस’ हा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा राजकारणाचा खरा पाया आहे. आज लोकांच्या असंतोषाला वाचा फोडणारा आवाज हवाय, व्हर्च्युअल नाही तर खऱ्या भूमीवर....... 

Tue, 26 September 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे…

मुंबई पोलिसांनी कामगारनगरातील सहा मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय! पोलिसांची ही तत्परता डॉ. खोलेबाईंची तक्रार घेताना दिसून आलीच होती. पण या पोरांवर थेट सदोष मनुष्यवधाचंच कलम काय म्हणून लावलं? आणि जे तर स्पष्ट झालं तर मग रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यासाठी कंत्राटदार, पालिका, आयुक्त, वार्ड ऑफिसर यांपैकी किती जणांवर आजपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावलाय?.......

Wed, 20 September 2017 

​​​​​​​.............................................................................................................................................

एक ‘आरजे’ बीएमसी को…

आरजे मलिष्का काय, वागळे काय, ‘ईपीडब्ल्यू’चे संपादक काय, या मच्छरांची सर्वशक्तीमान सत्तेला नेमकी भीती वाटते कशाची? त्यांच्या ‘किटक’सदृश्य उपस्थितीची? की त्यांच्या अणकुचिदार दंशांची? जशी हत्तीला मुंगी कानात शिरायची वाटते तशी?... सोनूचा भरोसा आज बीएमसीवर नाय, पण उद्या तो राज्य मंत्रालय किंवा केंद्र सरकारवरही राहिला नाही तर? तेव्हा राधासुता तुझा धर्म काय राहिल हे लवकर कळेलच!.......

Wed, 26 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

परवाच्या पराभवाला जबाबदार काँग्रेस!

२०१४ पासून तो शेपूट घालूनच बसला होता. हूं नाही की चूं नाही. आपल्या सैन्यावर गोळीबार दूरच, इस्लामाबादेतून मान वळवून बघायचीही हिंमत नाही. गिरनारचा सिंह दिल्लीत वास्तव्याला आल्यापासून पार गळपटलाय शेरखान! निमूट शाल पांघरून, दिलेली मिठाई खात बसतो! अशा शोचनीय शत्रू राष्ट्राच्या अकरा लोकांनी १२५ करोड जनतेच्या हातातोंडातला घास नाक खाजवून दाखवत घेऊन जावा? स्वत:च फस्त करावा? या शोचनीय पराभवाला, मानहानीला कारण काँग्रेस!....... 

Tue, 20 June 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

चला, मोदीमुक्त भाजप करू या!

शीर्षक बरोबरच आहे. अजिबात गफलत झालेली नाही. गोंधळ नाही. उपहास, उपरोध किंवा खास भाजप स्टाईल नावीन्यपूर्ण शब्दप्रयोगही नाही. आहे, ते विधान आहे. ठाम विधान आहे. सदिच्छा म्हणा हवं तर. सद्यकालीन दोन तृतीयांश बहुमतासह सत्तेवर असलेल्या, २५ वर्षांहून अधिक वय असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या पक्षांतर्गत निर्णयात ढवळाढवळ करण्याचीही आमची इच्छा (आणि देशद्रोही धमक) नाही. तरीही आम्ही असं का म्हणतोय? .......

 Tue, 30 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

ना खाया, ना पिया…गिलास तोडा उसका बाराना!

तर इथून पुढे लक्षात ठेवा, भारत बदलतो म्हणजे मोदींचा कुर्ता बदलतो. भारत बदलतो म्हणजे मोदींचं जॅकेट बदलतं. भारत बदलतो म्हणजे मोदींचं ताजं भाषण. भारत बदलतो म्हणजे मोदींची नवी घोषणा. भारत बदलतो म्हणजे मोदींच्या नव्या घोषणेची सर्व प्रसारमाध्यमांतील जाहिरात. भारत बदलतो म्हणजे सरकार विरोधात कुठेच काही छापून, लिहून न येणं, प्रक्षेपित न होणं, व्हायरल न होणं. भारत बदलतो म्हणजे मोदीच पंतप्रधानपदी आजन्म राहणं.......

Tue, 23 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

तीच भूमी, तेच प्रश्न, तीच लढाई!

मुक्ता टिळक या बहुधा शिक्षित असाव्यात. तरीही त्या जेव्हा अज्ञानमूलक बोलतात, तेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर आहे का, हे विचारणं भाग पडतं. आणखी एक घासून गुळगुळीत झालेला मुद्दा. आरक्षणात फक्त प्रवेश घेताना गुण कमी-जास्त हे तत्त्व पाळलं जातं. आरक्षणातल्या विद्यार्थ्याला परीक्षेत, गुणांत आरक्षण नसतं. तिथं ३५च्या खाली नापास, ६० पर्यंत प्रथम वर्ग, पुढे डिस्टिंक्शन हे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही लागू असतं. .......

Tue, 09 May 2017 

​​​​​​​.............................................................................................................................................

उन्मादाला ‘चपराक’ अशी बसेल की…

राजकीय यशानं संघ परिवाराला जो उन्माद चढलाय. त्यामुळे गोहत्या, राममंदिर आदि विषयावर शिरच्छेदापर्यंत जिभा सैल सुटल्या आहेत, तर कुणी तरुण विजय ‘दक्षिणेत आम्ही काळ्यांसोबत राहतोच की!’ म्हणून बेलगाम वर्णवर्चस्ववादी बोलतो! संघ परिवाराने आपला हा हिंदू राष्ट्रवादाचा भगवा उन्माद थांबवावा. अन्यथा या देशातला सच्चा भारतीय या उन्मादाला अशी चपराक देईल की, ज्याचा प्रतिध्वनी खैबरखिंडीतही ऐकू येईल!.......

Tue, 11 April 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

जळता निखारा गिळलेला माणूस!

असंख्य आठवणी घेऊन परवा भैय्यालाल भोतमांगे गेला. सर्वोच्च न्यायालयाला एक तारीख उधार देऊन गेला. फाशीवरून जन्मठेपेवर आलेल्यांना कदाचित चौदा वर्षांचा दिलासा देऊन गेला. बायकोची बदनामी, मुलांची स्वप्नं काळजात कोरून गेला. भैय्यालाल गेली दहा वर्षं एक जळता निखारा गिळून जगत होता. परवा चिता पेटली असेल. नंतर राख साचली असेल. राख सावडायला कुणी गेलंच असेल तर त्याला तो जळता निखारा परवाही जळतानाच दिसला असेल!.......

Tue, 24 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

मोदी मला भेटले

मोदी मला भेटले त्याची ही गोष्ट एकाच अपवादाने पुन्हा भेटत राहते. ईश्वरप्रतिरूप झालेले मोदी मला फक्त एकाच ठिकाणी भेटले नाहीत. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात, मुलांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या, यशोदाबेन नरेंद्र मोदी या प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेच्या शाळेत मोदी मला भेटले नाहीत. अर्थात कुसुमाग्रज म्हणालेच होते, ज्यांना हवाय त्यांच्यासाठी ईश्वर आहे, ज्यांना नकोय त्यांच्यासाठी तो नाही. या वाक्यासह शेवटी मोदी मला भेटले.......

Tue, 17 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......