बालदिन : त्यांचा दिवस, आपल्यासाठी!
पडघम - बालदिन विशेष
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 14 November 2016
  • संपादकीय अक्षरनामा बालदिन विशेष Children's Day

आज बालदिन, मुलांचा दिवस. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’चा बालदिन विशेषांक. हा अंक करताना मुलांना काहीतरी बोधपर सांगावं, आजकालच्या त्यांच्या वर्तनाबद्दल, टीव्ही पाहण्याबद्दल काही उपदेश करावा, असं काहीही करायचं नाही हे मुद्दाम ठरवलं होतं. शिवाय मुलांना आवडेल किंवा त्यांना वाचायला आवडेल असा नामांकित लेखकांचा मजकूरही द्यावयाचा नाही, हेही पक्कं ठरलेलं होतं. फार वर्षांपूर्वी प्रसिद्ध कथा-कादंबरीकार रत्नाकर मतकरी म्हणाले होते की, ‘ज्यांना मोठ्यांसाठी लिहिता येत नाही, त्यांनी लहानांसाठी लिहू नये. केवळ हौस म्हणून, छंद म्हणून लिहू नये. नवं काही सांगता येत असेल तरच लिहावं.’ थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की, मुलांसाठी लिहिणं ही जिकिरीची, गांभीर्याने करावयाची गोष्ट आहे. ती मराठीमध्ये फारशी केली जात नाही, ही गोष्ट वेगळी. आपला तो विषयही नाही.

हा अंक करताना मुलांपेक्षाही प्रामुख्याने त्यांचे पालक नजरेसमोर ठेवले आहेत. या अंकात सिद्धार्थ मांडके आणि तनया टेंबे या दोन मुलांचे लेख आहेत. एकाला प्राणी आवडतात तर दुसऱ्याला पुस्तकं. इयत्ता नववी व सहावीतल्या दोन मुलांचे हे लेख त्यांच्या आवडीनिवडीला त्यांच्या आई-बाबांनी कसं प्रोत्साहन दिलं, ती आवड पॅशनमध्ये कशी रूपांतरित झाली, याविषयीही सांगतील. हे लेख मुलांनी स्वत:च लिहिले आहेत. त्यामुळे ती कसा विचार करतात, घटना-घडामोडींचा कसा अन्वयार्थ लावतात, हेही समजू शकतं. इतक्या कमी वयातली मुलं आपल्या प्रत्येक कृतीविषयी कशी जागरूक असतात, त्यासाठी ती किती मेहनत घेतात, यावरही या दोन लेखांतून पुरेसा प्रकाश पडतो.

‘गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट’ हा लेख सर्वार्थानं वेगळा आहे. मुलांच्या गोष्टी या बोलणाऱ्या प्राण्यांच्या, उडणाऱ्या राक्षसांच्या, सुंदर पऱ्यांच्या असतात. त्यात क्रूर राक्षस असतात, तसे चांगले लोकही असतात. पण हे सगळं गोष्टीतच असतं, असंच मुलांना सांगितलं जातं. पण यातल्या काही गोष्टी या वास्तवातही आपल्याला भेटतात. त्या जिथं घडतात ती ठिकाणं आपल्याला पाहता येतात. मुलांच्या आवडत्या गोष्टीतील पात्रं, प्रसंग शिल्पांच्या, चित्रांच्या रूपानं अमर केले जातात. अशाच काही गोष्टीतील पात्रांच्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. मुलांच्या भावविश्वाला असं आदराचं, अगत्याचं स्थान आपल्याकडेही मिळायला हवं.

‘मूल तुमच्या मनाप्रमाणे घडणारा मातीचा गोळा नाही!’ हा श्रीनिवास आगवणे या तरुण चित्रकाराचा आणि ‘मुलांचा भावनांक वाढवता येतो’ हा मानसोपचारतज्ज्ञ संयोगिता नाडकर्णी यांचा, हे दोन्ही लेख मुलांविषयीचे असले तरी ते पालकांसाठीचे आहेत. ते मुलांकडे पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची दृष्टी देतात.

बालदिन साजरा करायचा तो याचसाठी की, या निमित्तानं आपलं मूल अधिक ‘आपलं’ कसं होईल. मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. त्याला त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे त्याला त्याच्या जागी जाऊन समजून घेता यायला हवं. मुलांच्या जवळ जायचं असेल तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवं. या विशेषांकामध्ये आम्ही आमच्या परीने तो प्रयत्न केला आहे.

हा अंक आपल्याला कसा वाटतो, याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

Post Comment

Nivedita Deo

Mon , 14 November 2016

Tumche baldinache sarvach lekha khoopcha chan ahet


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......