‘शालोम’ : येशू ख्रिस्ताशी संबंधित मराठीतील ८२ कवींच्या १४८ कवितांचे नवनीत
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • ‘शालोम’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Sat , 24 December 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो शालोम Shalom नारायण लाळे Narayan Lale

उद्या नाताळ. ख्रिसमस. त्यानिमित्ताने ‘शालोम – येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता’ या कवितासंग्रहाची ओळख करून देणारा हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

मागच्या आठवड्यात ‘शालोम – येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता’ हा २०१८ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह दिसल्यावर कुतूहल निर्माण होऊन चाळला, आतल्या कवींची नावं वाचली आणि विकत घेऊन बॅगेत टाकला. यातील बहुतांश कवी नामांकित आहेत, अनेक बिगरख्रिस्ती आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यात सतराव्या शतकात ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणाऱ्या फादर थॉमस स्टीफन्स यांच्यापासून हल्ली लिहीत असणाऱ्या अनेक कवींच्या कवितांचा यात समावेश आहे.

लक्ष्मीबाई टिळक, नारायण वामन टिळक, कृष्णाजी रत्न सांगळे, गोपीनाथ तळवलकर, कुसुमाग्रज, सुरेश भट, विंदा करंदीकर, वा. रा. कान्त, बाबा आमटे, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, मंगेश पाडगावकर, अरुण कोलटकर, नीरजा, जयंतकुमार त्रिभुवन, निरंजन उजगरे, अनिल दहिवाडकर, नंदकुमार शेंडगे, फादर वेन्सी डिमेलो, अमित जयंतकुमार त्रिभुवन, लुईस कदम आणि सुधीर ब्रह्मे, अशा ८२ कवींच्या एकूण १४८ कवितांचा या संग्रहात समावेश आहे. कवींपैकी ४५ ख्रिस्ती आणि २३ बिगरख्रिस्ती आहेत. १४ कवयित्री असून त्यापैकी ११ ख्रिस्ती आणि तीन इतरधर्मीय आहेत. या सर्व कवींचा अल्पपरिचय शेवटी परिशिष्टात दिला आहे. काहींची माहिती मिळाली नाही, तेही नमूद केलं आहे.

येशू ख्रिस्त हा विषय निवडण्यामागची भूमिका स्पष्ट करताना संपादक नारायण लाळे म्हणतात - “मराठी काव्यक्षेत्रात अशा अनेक कविता आहेत की, ज्यामध्ये येशू ख्रिस्त या प्रतिमेचे प्रयोजन सातत्याने दिसून येते. ते वेगवेगळ्या स्वरूपात असले तरी, येशू ख्रिस्त या प्रतिमेचे मराठी कवितेत निर्माण झालेले स्थान नाकारता येणार नाही. मराठी कवितेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही जडणघडण तपासून बघणे, मला महत्त्वाचे वाटते. एकाच वेळी धर्मप्रसार आणि मानवी मूल्यांचे जतन करणारी ही कविता माझ्या संपादनकृतीला प्रवृत्त करणारी ठरली.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

लाळे यांनी आपल्या दीर्घ प्रस्तावनेत येशू आणि मराठी ख्रिस्ती कविता या संदर्भात विचार मांडले आहेत. त्यामुळे कवितांबाबत उत्सुकता निर्माण होते. त्याशिवाय गेल्या ४०० वर्षांच्या कालखंडातील मराठी साहित्यातील ख्रिस्ती कवितांचे स्थानही ठळक होते.

येशू ख्रिस्त, ख्रिस्तजन्म, येशूची शिकवण, क्रुसिफिकेशन, पुनरुत्थान, नाताळाच्या शुभेच्छा, सेवाधर्म, उद्धारकर्ता, दीनदयाळू, कैवारी, भक्तिरसप्रधान, धार्मिक अशा अनेक विषयांवरील या कविता आहेत. त्याच वेळी शाश्वत मूल्यांचे जतन करणाऱ्या अनेक कवितांमधून येशू ख्रिस्त किंवा त्याच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख संदर्भ म्हणून आला आहे.

मिलान येथील चर्चमधील लिओनार्दी दा व्हिन्ची या चित्रकाराचे ‘द लास्ट सपर’ हे चित्र, फ्लोरेन्स येथील मायकल अँजेलोचे क्रुसावर खिळलेले येशूचे काष्ठशिल्प आणि ब्राझील इथला फ्रेंच शिल्पकार पॉल लँडोवस्कीने साकारलेला ‘द रिडीमर’ हा येशूचा अतिभव्य पुतळा यांची उदाहरणं देत लाळे म्हणतात, “येशू ख्रिस्त या वैश्विक व्यक्तिरेखेचा कलाकृतींवर झालेला परिणाम दाखवतो आणि संपादनाच्या मूळ संकल्पनेला त्यामुळे पुष्टीच मिळते आणि ‘येशू ख्रिस्तच का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळते.”

लाळे म्हणतात या प्रस्तावनेच्या निमित्ताने धर्मप्रसारक किंवा धर्मप्रचार यांचे महत्त्व सांगण्याचा उद्देश नसून भाषेचे महत्त्व आणि परिणाम दर्शवण्याचा आहे. ‘क्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणाऱ्या ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांच्यापासून मराठी ख्रिस्ती साहित्याचा उगम झाला आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या चालीवर ख्रिस्ती मराठी साहित्याबद्दल आणि कवितांबद्दल म्हणायचे झाल्यास ‘फादर स्टिफन्से रचिला पाया, टिळक झालासे कळस’ असे म्हणता येईल, असे लाळे यांनी लिहिले आहे. मराठी साहित्यात दिसणारे ओवी, अभंग, पाळणा, भूपाळी, प्रार्थना हे काव्यप्रकार ख्रिस्ती मराठी कवितेत उमटलेले दिसतात, हेही या संग्रहात पाहायला मिळते.

मराठीत ख्रिस्ती कवितेला स्थानिक अवतार देण्याचं फार मोठं योगदान १८५३ साली भारतात आलेल्या अमेरिकन मिशनरी हेन्री बॅलेन्टाईन यांनी केलं आहे. मराठी आणि संस्कृत या भाषांचा अभ्यास करून १८४५ साली त्यांनी ‘देवाचे भजन करणारी गीते’ हा ४५ पानांचा संग्रह काढला. त्यांच्या कवितेचाही या या संग्रहात समावेश आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अरुण कोलटकर यांच्या तीन कविता आहेत. त्यातील एका दीर्घ कवितेतील ‘मदर मेरी’च्या स्वगताचा हा भाग हृदयस्पर्शी आहे-

‘तुझा छिन्नविछिन्न देह

क्रूसावरून उतरवण्यात आल्यानंतर

वाट पहावी लागली मला

पंधराशे वर्षे

तेव्हा कुठं डोळाभर पाहू शकले मी तुला

दुःख मोकळं करू शकले

तुला माझ्या संगमरवरी मांडीवर घेऊन

मायकल अँजेलोच्या सौजन्यानं’

व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिका इथं असलेल्या मायकल अँजेलोच्या ‘ला पिएता’ या शिल्पाचा या कवितेला संदर्भ आहे. ‘बायबल’मध्ये वर्णन करण्यात आलेले येशू ख्रिस्ताचे आणि त्याची आई मेरी यांचे संपूर्ण जीवन कोलटकरांची ही कविता उभे करते.

येशू ख्रिस्त आणि क्रूस एकमेकांपासून वेगळे काढणे अशक्य. या संग्रहात क्रूसाविषयाच्या अनेक कविता आहेत. कुसुमाग्रज यांची ही कविता -

‘मृत्युंजय शब्द त्याचे

प्रभो, त्यांना क्षमा कर

काय करतो हे त्यास

नाही देवा कळलेले’

बाबा आमटे ‘समर्पण’ या दीर्घ कवितेत लिहितात-

‘धाराशायी ख्रिस्त!

मेरीच्या मांडीवर त्याचे रक्तलांछित मस्तक

आणि त्याचे शिष्य

गोलगाथाच्या डोंगराकडे पाठ करून उभे’

सदानंद रेगे यांच्या ‘सोहळा’ कवितेतील या काही दोन ओळी -

‘गोलगाथाच्या टेकाडावर

जय्यत सारे तयार आहे

बाकी सगळे तयार आहे

उणीव केवळ त्याची आहे’

आपल्या कवितेत नीरजा म्हणतात-

‘चर्चमध्ये घुमणाऱ्या

सगळ्या प्रार्थना

रडून दमल्या

तसे त्याने

क्रूसावरचे हात वर करून

एक कडकडून जांभई दिली’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

फादर फ्रान्सिस जे. नुनीस यांची रचना अशी आहे-

‘कॅन्सर म्हणजे एक क्रूस

एकट्यानेच वाहायचा असतो

मदत करायला येणार नसतो

कुणी सिरेनीकर’

सायमन मार्टिन ‘क्रूसाचं काय?’ या कवितेत म्हणतात-

‘तो अजमावून पाहातोय शक्यता

क्रूसाशिवाय मरण्याची

प्रश्न इतकाच आहे शिक्षेत सूट मिळाल्यास

परिश्रमपूर्वक बनवलेल्या क्रूसाचं काय?

क्रूसाबाबत संतापलेले जोसेफ तुस्कानो लिहितात

एकदा मी खूप संतापलो

आणि क्रूस उचलून चक्क चुलीत घातला

म्हटलं, तुझा माझा संबंध मिटला

पण तो जळलाच नाही

चूल मात्र विझली’       

विंदा करंदीकर ‘कलंदर’ कवितेत लिहितात

‘क्रूसावरती जगतो त्याचा

क्रूसावरती नसतो घात

चालायचे ते चालतील पाय

करायचे ते करतील हात’  

अनुपमा उजगरे यांच्या ‘उत्सव’ कवितेतील या ओळी -

‘मी फादरना विचारले,

आता येशू अवतरले तर…?

फादर गंभीरपणे उद्गारले

आता येशू अवतरले तर

म्हणतील पुन्हा एकदा

हे बापा, ह्यांना क्षमा कर’

सिसिलिया कार्व्हालो यांची ‘कोलाहल’ ही कविता अंतर्मुख करणारी आहे-

‘अंतर्बाह्य सर्वत्र कोलाहल

गावात आणि देवळातही

चर्चबेलचा नाद विरत चाललाय  

विरत चाल्लेय स्वर्गीय संगीत

पक्ष्यांच्या चोचीतलेही

हिरावून घेतलंय गीत…’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमित जयंतकुमार त्रिभुवन लिहितात-

‘तमसो मा ज्योतिर्गमयाचा मंत्र देवूनी गेला

अंतरातल्या अंधाराला ‘तो’ ख्रिस्त भेदूनी गेला’    

या पुस्तकातली एक रचना रेवगावचे अंध कवी बार्तिमय बाबांची आहे. (‘बायबल’च्या नव्या करारात बार्तिमय या दृष्टीहिनाला येशूने दृष्टिदान दिलं अशी एक कथा आहे.) सखुबाई भिकू गायकवाड या कवयित्रीची एक रचना आहे-  

‘दळण संपविलं पीठ भरून ठेवियलं

प्रभूचं गोड नाव माझ्या हृदयात साठविलं’

सुरेश भट त्यांची ‘येशू’ ही गझल आहे-

‘झुळझुळ शीतल वारा येशू

रिमझिम अमृतधारा येशू

येथे पोचत नाही वादळ

अमुचा शांत किनारा येशू’   

क्रूस हे करुणा, त्याग आणि क्षमाशीलतेचं प्रतीक, तर येशूचा गाईगुरांच्या गोठ्यातला जन्म हा आनंदाचा सोहळा. ख्रिस्तजन्माविषयी अनेक कविता आहेत. लक्ष्मीबाई टिळकांचा ‘ख्रिस्तजन्माचा पाळणा’ आहे-

‘हलवी मना, प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखाते वरी यातनांना

पराकारणे जो झिजवी तनूला

यशोगान त्याचे मुदें गात गाना

हलवी मना, प्रभुपाळणा’

मंगेश पाडगावकर यांच्या ‘जन्म’ या कवितेतील या ओळी आहेत-

‘अलौकिक वरदान लाभे आकाशाचे

गव्हाणीला फूल आले दिव्य प्रकाशाचे’

नाताळाच्या संदेशाविषयी वा. रा. कान्त लिहितात-

‘करुणा -प्रज्ञेचा

वसंत फुलू द्या

शांतीने जगू द्या

मानवता

 

संदेश हाच

ख्रिस्ताचा प्रभूचा

सण नाताळाचा

देई जगा’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

विद्रोह आणि चीड या भावनासुद्धा या कवितेत दिसतात. शाहूराव द. उजगरे यांच्या ‘काळे ख्रिस्ती’ या कवितेनं एके काळी मोठी खळबळ उडवून दिली होती. ख्रिस्ती मिशनरींतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या १९ ऑगस्ट १९२६च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या कवितेत ते म्हणतात-

‘मनुष्यतेला परके झालो आम्ही काळे ख्रिस्ती 

दैवाचे त्रैराशिक आमुच्या विराम पावे वस्ती’

याच पठडीतली ना.वा. टिळकांची ‘मिशनरीस संदेश’ ही कविता. विदेशी मिशनरींना उद्देशून ते लिहितात-

‘बांधा रे गाठोडी

व्हा रे चालते व्हा

ज्या नावडे हिंदू भूमी

….

दास म्हणे झाले काल ते वीसरा

नवी वृत्ती धरा आज आधी’

येशू ख्रिस्ताची प्रतिमा भारतीय लोकजीवनात, भारतीय संस्कृती आणि भाषांमध्ये मुरून एकजीव झाली. ‘येशू ख्रिस्ताची प्रतिमा जी मराठी भाषेत आली, ती केवळ प्रतिमाच नाही तर, जीवनप्रसंग, दया, क्षमा, शांती ही सनातन मूलयेदेखील इथल्या मातीत प्रस्थापित करणारी ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा जगभरात वापरली जाते’ असं संपादक लाळे यांनी म्हटलं आहे. या प्रयत्नातून आणखी काही बीजे हाती लागतील आणि या संपादनात न उमटलेले मार्ग शोधले जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘शालोम : येशू ख्रिस्त  आणि संबंधित मराठी कविता’ - संपादक - नारायण लाळे

साहित्य अकादेमी, दिल्ली | पाने - २०५ | मूल्य - २७५ रुपये.

..................................................................................................................................................................

येशूमधल्या देवत्वापेक्षा येशूमधील माणूसपण आपण ओळखणे आवश्यक आहे... - नारायण लाळे

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......