२०१७ : बेस्ट ऑफ ‘सत्तावर्तन’ (राजा कांदळकर)
सदर - सत्तावर्तन
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 26 December 2017
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष सत्तावर्तन राजा कांदळकर

संपादक-पत्रकार राजा कांदळकर यांचं ‘अक्षरनामा’वरील ‘सत्तावर्तन’ हे समकालीन राजकारणाचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. वर्षभरात या सदरात प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं भाष्यही जाणून घेता येतं...

.............................................................................................................................................

नाना पटोलेंचं बंड सुफळ संपूर्ण होईल?

भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक मोहऱ्यांना पावन करून घेत असताना त्यातलाच एक मोहरा कसा उलटतो याचा अनुभव भाजपला यानिमित्तानं येत आहे. आज पटोले एकटे आहेत. उद्या त्यांना जोड मिळाली आणि आणखी काही नाराज खासदार-आमदार या बंडाच्या झेंड्याखाली उभे राहणारच नाहीत असं नाही. आणि हे बंड राज्यपातळीवर भडकू शकत नाही असंही कुणी खात्रीनं म्हणू शकणार नाही.

Wed , 20 September 2017

.............................................................................................................................................

राज्य सरकारला न्या. अभय ओक यांची अॅलर्जी का आहे?

न्या. ओक पक्षपाती भूमिका घेतात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी भर न्यायालयात केली आणि सर्वत्र शांतता पसरली. न्या. ओक यांना दूषणं देऊन आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करून फडणवीस सरकारनं चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य म्हणजे स्वतःची फटफजिती करून घेतली!

Wed, 30 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

टिळकभक्तांनो, मन करा रे थोर!

टिळकभक्तांनी मन मोठं केलं पाहिजे. गणेशोत्सवाचं जनकत्व निर्विवादपणे भाऊसाहेब रंगारी यांना देऊन हा वाद मिटवायला हवा. त्यामुळे लोकमान्य टिळकांची थोरवी आणखी वाढेल. कारण अशा वादात मन मोठं करण्याची भूमिका खुद्द टिळकांनी अनेक ठिकाणी, अनेक वेळा घेतलेली दिसते. टिळक हे मोठेच आहेत, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. रंगारी यांना त्यांचा मान दिल्यानं त्यांचं मोठेपण उणावण्याचंही काहीएक कारण नाही.

Wed, 23 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

५८व्या मूक मराठा मोर्च्यावरील टळलेली तीन विघ्नं

९ ऑगस्ट २०१६ला औरंगाबादमध्ये पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. तेव्हापासून कालच्या मुंबईच्या ९ ऑगस्टच्या मोर्च्यासह गेल्या वर्षात राज्यभर ५८ मोर्चे निघाले. मुंबईचा मोर्चा निर्वाणीचा होता. लोकांचा सरकारवर रोष होता. मोर्च्याची कोणतीच मोठी मागणी सरकार मान्य करत नाही म्हणून लोकांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमीवर काही आगळीक घडू नये, असा प्रयत्न होता. तरीही तीन विघ्नं येऊ पाहत होती.

Thu, 10 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

रामचंद्र गुहांचा फॉर्म्युला यशस्वी होईल काय?

काँग्रेसनं गांधी घराण्याच्या प्रेमापोटी इतर बदल स्वीकारले नाहीत. नेतृत्व बदल केला नाही तर काँग्रेसलाच पर्यायी नवा पक्ष उदयाला येईल, असं भाकीतही गुहा यांनी केलं आहे. तशीही काँग्रेसची गरज संपलेली आहे. काँग्रेसचं नेतृ्त्व असंच आळशी, निष्क्रिय आणि चालढकल नेत्यांच्या हातात राहिलं तर लोक नवा पक्ष उदयाला आणतील. इंदिरा गांधी यांच्या एकछत्री बलदंड सत्तेला पर्याय देण्यासाठी आणीबाणीच्या काळात लोकांतून जनता पक्ष उदयाला.

Wed, 19 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

ज्याला नाही कोणी, त्याला विखे पाटलांची लोणी

महाराष्ट्रात ज्या राजकीय घराण्यांनी, नेत्यांनी राजकारणाची स्वत:ची खास शैली निर्माण केली, त्यात विखे पाटील यांचं घराणं महत्त्वाचं मानलं जातं. या राजकारणाच्या शैलीला किंवा पॅटर्नला ‘लोणी पॅटर्न’ म्हटलं जातं. अशीच राजकारणाची वेगळी शैली शरद पवार यांच्या घराण्याने निर्माण केली. त्याला ‘बारामती पॅटर्न’ म्हणता येईल. ‘लोणी पॅटर्न’ला ‘बारामती पॅटर्न’पेक्षा जुनी पार्श्वभूमी आहे.

Wed, 12 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

…तर कदाचित गोपाळकृष्ण गांधी राष्ट्रपती झाले असते!

गांधी नकोत, आंबेडकरही नकोत, या काँग्रेसच्या भूमिकेमुळे नीतिशकुमार दुखावले. कम्युनिस्ट नाराजी दाखवत नसले तरी त्यांचं मौन बोलकं आहे. आणि देशातल्या जनतेला जायचा तो संदेश गेला आहेच. मीराकुमार या हरणाऱ्या उमेदवार आहेत, असा विनोद आता रामदास आठवलेही करू लागले आहेत! गांधी-आंबेडकरांना टाळणारा काँग्रेस पक्ष भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर कसा देणार, हा गंभीर प्रश्न राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे.

Wed, 05 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

कुमार केतकरांच्या भविष्यवाणीतल्या खाचाखोचा

केतकर म्हणतात तसं लोकशाही, सेक्युलर विचार देशात राहिले पाहिजेत यात वाद नाही, पण बेभरवशाचे, लेचेपेचे सैन्य घेऊन ही लढाई थोडीच जिंकता येणार आहे? वाजपेयी, अडवाणींचा भाजप वेगळा होता, आताचा मोदी-शहा यांचा भाजप वेगळा आहे. हा भाजप लोकशाही, सेक्युलर असल्याचं हुशारीने भासवून सत्तास्थानी स्थिरावलाय. पुढची वाटचाल करतोय. त्याला रोखायचं असेल तर त्यापेक्षा जास्त हुशारी दाखवावी लागेल. ती हुशारी राहुल गांधींकडे कधी येणार?

Wed, 28 June 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

सत्यपाल महाराजांवरचा हल्ला पाच दिवस कुणी लपवला?

गेली किमान ३० ‌वर्षं सत्यपाल महाराजांचं कीर्तन महाराष्ट्र ऐकतोय. करोडो लोक त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेऊन विचारमग्न झाली. अशा मोठ्या कीर्तनकारावर हल्ला होतो आणि त्याने ना सत्तेच्या अंगावर काटा उभा राहतो, ना पोलीस यंत्रणेला पत्रकार परिषद घेऊन लोकांना माहिती द्यावीशी वाटते, ना केईएम हॉस्पिटलच्या प्रमुखांना, ना राज्याच्या गृहखात्याच्या प्रमुखांना प्रसारमाध्यमांशी या विषयावर बोलावंसं वाटतं.

Fri, 19 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

उत्तर प्रदेशने उभे केलेले प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नेहमी शिमगा करणाऱ्यांना उत्तर प्रदेशातल्या विजयाने पुन्हा एकदा तोंडात बोट घालायला लावलं आहे. हा विजय साधासुधा नाही. याला राक्षसी बहुमतच म्हणावं लागेल. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ४७ जागांवर आपटी खावी लागली, तर काँग्रेसला ७ जागा मिळवून तोंड लपवावं लागलं. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा हत्ती १९ जागांवर गाळात फसला.

Sun, 12 March 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

गुरमेहेर, तू ग्रेट आहेस आणि सेहवाग, तू खुजा!

गुरमेहेर १९ महिन्यांपासून ती ही कॅम्पेन करते आहे. रामजस प्रकरणाअगोदरपासून तिची ही भूमिका युट्यूबवर उपलब्ध आहे. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. मग तोपर्यंत अभाविपचं लक्ष गेलं नव्हतं का? तेव्हा रिजिजू, सिन्हा, सेहवाग आणि आता बलात्काराची धमकी देणारे कुठे होते? रामजस प्रकरणात गुरमेहेरने अभाविपविरुद्ध भूमिका घेतल्यावर त्यांनी तिची भारत-पाक शांततेसंबंधीची भूमिका वादग्रस्त ठरवली.

Wed, 01 March 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

“शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू?”

“नथुरामा तुझी अवस्था पाहून दु:ख वाटतं रे. घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारत दर्शनाला, इंग्लंडला, नौखालीला. दाखवलं असतं तुला जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या सुखाची, शांततेची आणि मानवतेची. पण आता सगळंच तुझ्या-माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणं नेहमीच अवघड आहे, तुला अनुसरणं मात्र आजकाल खूप सोप्पं झालंय.”

Wed, 25 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......