टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, प्रशांत दामले, स्वदेशी जागण मंच, शाहरूख व आर्यन खान
  • Mon , 26 June 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump प्रशांत दामले Prashant Damle स्वदेशी जागण मंच Swadeshi Jagran Manch शाहरूख खान Shahrukh Khan आर्यन खान Aryan Khan

१. भारत स्वत:चे संरक्षण स्वत: करू शकतो आणि हे भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून जगाला दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत बोलताना म्हटले. ‘भारतीय लष्कराने सीमारेषा ओलांडून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या कारवाईवर कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. भारतीय लष्कराचे सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिले आहे,’ असे पंतप्रधान मोदी व्हर्जिनियातील टायसन्स कॉर्नरमधील रिर्ट्झ कार्लटन येथे म्हणाले.

गेली ६० वर्षं भारताच्या संरक्षणासाठी नेपाळमधून सैनिक येत होते की म्यानमारमधून? पंतप्रधानांना परदेशात जाऊन आपल्या देशाची नालस्ती करण्याचा छंद आहे काय?‌ जगाला आपली संरक्षणसिद्धता दाखवण्यासाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची परेड असतेच की! शिवाय जगाला शून्य रस आहे आपल्या संरक्षणसिद्धतेविषयी जाणून घेण्यात. लष्कराच्या ‘रेड्स’ आधीही होत होत्या. त्या गुप्तपणे होत होत्या. आता त्यांचं नामांतर करून त्या चव्हाट्यावर आणल्या जात आहेत, इतकंच. त्यांनी पाकिस्तानवर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचं उत्तर आहे का? ते महत्त्वाचं आहे.

.............................................................................................................................................

२. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने शाही सोहळ्याचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला आहे. जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून यामुळे चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल अशी भीती स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केली आहे. १.५ कोटी रुपयांपर्यंत उत्पादन असलेल्या लघु उद्योजकांना अबकारी करातून सूट देण्यात आली आहे. जीएसटीमध्ये २० लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावीच लागेल. या नियमामुळे लघुउद्योगांवर कराचा बोजा वाढणार असून लघुउद्योगांवर याचा परिणाम होईल असा दावा त्यांनी केला.

अरे वा, जीएसटी विरोधातील संभाव्य उद्रेकाची वाफ नियंत्रित करण्यासाठी स्वदेशी जागरण मंचाची शिट्टी बसवलेली दिसते. निर्णयही आमचा आणि विरोधही आमचा असा हा अजब प्रकार भासतो. प्रत्यक्षात सरकारही आमचं आणि शिवसेनेच्या रूपाने प्रमुख विरोधी पक्षही सरकारमध्येच, या धोरणाचीच ही राष्ट्रीय आवृत्ती दिसते.

.............................................................................................................................................

३. कोणत्याही मुलीला किस करू नकोस, नाहीतर मी तुझे ओठ चिरेन’, असं शाहरूख खानने त्याचा मुलगा आर्यन खान याला बजावलंय. आर्यन लवकरच हिंदी सिनेमात पदार्पण करणार, अशी चर्चा आहे.

प्रेम कसं करायचं हे एका अख्ख्या पिढीला शिकवणारा किंग खान इतक्या बुरसटलेल्या विचारांचा आहे? बापाचं हृदय, बापाला वाटणारी काळजी वगैरे ठीक आहे. पण, आर्यन आणि त्याच्याशी ओष्ठसंपर्क प्रस्थापित करू इच्छिणारी मुलगी यांच्यामध्ये अशी टांग घालण्याचा शाहरुखला अधिकार काय? आर्यनने कुणा मुलीचं बळजबरीने चुंबन घेतलंच, तर त्यावरही काय ते कायदेशीर होईलच की. शाहदादा, तुम्ही जरा पुन्हा एकदा डीडीएलजे पाहाच राव वेळात वेळ काढून.

.............................................................................................................................................

४. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील चिरतरूण अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची नात अनायरा हिचे फोटो फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ‘नात मोठी होतेय’, अशा शीर्षकाने त्यांनी नातीबरोबरचा फोटो शेअर केलाय. त्यात दामलेंच्या चेहऱ्यावरून सुख म्हणजे नक्की काय असतं, याची झलक मिळते. अनायरा ही प्रशांतजींच्या मुलीची मुलगी आहे.

हे सगळं खूपच गोड आहे प्रशांतजी; पण, आपल्या चाहत्यांना, खासकरून महिला चाहत्यांना असं दुखावण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? नात मोठी होतेय, असं म्हणता म्हणता तुम्ही आजोबा होण्याच्या वयाचे झालात, हे सांगून टाकलंत राव त्यांना. गोंडसपणाचं मूर्त रूप असे तुम्ही आजोबा? अहो, तुमच्या अनायरालाही तुम्ही तिच्या बाबांपेक्षा छोटे आहात, असं वाटत असेल.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री उशीरा मोदी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले. मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत खरा मित्र असल्याचे सांगून द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करू, असे म्हटले आहे.

अरे देवा, भारतीय गोटात सुतकी वातावरण असेल आता. ट्रम्प महोदयांना भारत हा खरा मित्र वाटू लागला असेल, तर आपली काही खैर नाही. हे गृहस्थ सगळ्या जगाला अडचणीत आणणाऱ्या लीलांसाठी कुप्रसिद्ध होत चालले आहेत. त्यात ते मित्रांसाठी अधिक घातक बनत चालले आहेत. भारत खरा मित्र असेलच, तर संबंध सुधारण्याइतके बिघडले कसे, हे त्यांना विचारण्यात हशील नाही. खऱ्या मित्रांमध्येच खूप रुसवे-फुगवे होतात, असं विधान ते तोंडावर फेकतील.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......