पटकथा लेखक साहित्यिक असतात का?
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 17 June 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar स्किप्ट हे साहित्य आहे Is a script Literature नागराज मंजुळे Nagraj Manjule फँड्री Fandry मेघना पेठे Meghana Pethe नातिचरामि Naticharami

प्रख्यात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर त्यांच्या भाषणांमधून आणि मुलाखतींमधून एक महत्त्वाचा मुद्दा मांडत असतात. जावेदसाहेबांच्या मते ते स्वतः लेखक तर आहेतच. त्यामुळे ते साहित्यिकही आहेत आणि त्यांचं साहित्यामधलं योगदान म्हणजे त्यांनी चित्रपटांसाठी केलेलं लिखाण आहे. चित्रपटासाठी लिहिलेली कथा-पटकथा हा साहित्याचा भाग होऊ शकतो का, हा एक सनातन वादाचा मुद्दा आहे. म्हणजे कादंबरी, कथा, लघुकथा, कविता, ललितलेख इ. ज्याप्रमाणे साहित्याचे प्रकार मानले जातात, तशी चित्रपटाची कथा-पटकथा मानली जात नाही हे उघडच आहे. पण चित्रपटाची कथा-पटकथा ही वर उल्लेखित साहित्यिक प्रकाराप्रमाणेच सृजनशील लिखित निर्मिती आहे. मग त्याला साहित्याचा दर्जा का नको, असा प्रश्न उद्या कुणी विचारला तर त्याचं उत्तर काय असावं? हा प्रश्न जसा गुंतागुंतीचा आहे, तसंच त्याच उत्तरही गुंतागुंतीचं आहे. या प्रश्नाच्या उत्तराला होकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. 

चित्रपटाची पटकथा ही चित्रपटाची 'ब्ल्यूप्रिंट' आहे असं मानलं जातं. चित्रपट हे मुळात दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटाची पटकथा हा चित्रपट निर्मितीमधला महत्वाचा असला तरी फक्त एक टप्पा आहे. चित्रपट बनवणं हे एक टीम वर्क आहे. शेकडो लोक या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेले असतात. कथा -पटकथा लेखक हा चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत योगदान देणाऱ्या शेकडो लोकांपैकी एक. या उलट साहित्याचे जे इतर फॉर्म असतात, त्यांची सृजनशील प्रक्रिया ही बहुतेक वेळा एकट्या माणसाची आहे. म्हणजे एखादा लेखक कथा लिहिताना किंवा एखादी कादंबरी हातावेगळी करत असताना एकट्याने हे काम करत असतो. त्या अर्थाने ही प्रक्रिया खूप वैयक्तिक असते. पटकथा लिखाणात तुम्ही एकटे राहून काम करू शकत नाही. साहित्य निर्मितीमध्ये लेखक हाच 'कॅप्टन ऑफ द शिप' असतो. चित्रपटनिर्मितीमध्ये दिग्दर्शक हा 'कॅप्टन ऑफ द शिप' असल्यामुळे चित्रपटनिर्मितीच्या सगळ्याच विभागांमध्ये दिग्दर्शकाचा शब्द हाच शेवटचा शब्द असतो. हा पटकथा निर्मिती प्रक्रिया आणि इतर साहित्य निर्मिती प्रक्रियेमधला सगळ्यात मोठा फरक आहे. पटकथेच्या निर्मिती प्रक्रियेचा उद्देश हा ती वाचकांनी वाचावी या उद्देशाने झालेला नसतोच. चित्रपटाच्या दृकश्राव्य माध्यमासाठी एक फाउंडेशन तयार करणं हा त्याचा उद्देश असतो.

सध्या हॉलिवुडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा प्रकशित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अर्थात तो पण प्राथमिक अवस्थेत आहे. आपल्याकडे पटकथा लेखन हे क्षेत्रच एवढं दुर्लक्षित आहे की, चित्रपटनिर्मितीशी प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या लोकांनाही पटकथा वाचण्यात फारसा रस नसतो. आमिर खानसारखे काही तुरळक अपवाद वगळता कोणी नट पटकथा वाचण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे उद्या आपल्याकडे 'मुघले आझम', 'शोले' किंवा 'दंगल'चा स्क्रीनप्ले पुस्तकरूपात प्रकाशित झाला तर किती वाचक ते विकत घेऊन वाचतील याबद्दल शंका आहेत. काही बॉलिवूड पोर्टल्स भारतीय चित्रपटांना वेगळं वळण देणाऱ्या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या संकेतस्थळांवर प्रकाशित करायला लागले आहेत, हा एक स्वागतार्ह बदल आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन चित्रपट बघू इच्छिणाऱ्या किंवा चित्रपटाचं गांभीर्याने विश्लेषण करू पाहणाऱ्यांची एक मोठी सोय त्यामुळे झाली आहे हे खरं. पण पुन्हा त्या पटकथांचा वाचकवर्ग अतिशय मर्यादित आहे हे मान्य करावं लागेल.

पटकथा या वाचनासाठी लिहिल्या जात नाहीत तर चित्रपटनिर्मितीमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बनवल्या जातात. त्यामुळे वाचनमूल्य किंवा साहित्यनिर्मितीचा जो मुख्य उद्देश असतो, त्याच्या निकषांमध्ये पटकथा बसत नाहीत हेच खरं. पटकथा लेखकाला पटकथेत मनाप्रमाणे बदल करण्याचं स्वातंत्र्य नसतं. दिग्दर्शक किंवा काही केसमध्ये निर्माता हा पटकथेत शेवटी काय राहील यासंदर्भात अंतिम शब्द असतो. इतर साहित्यांच्या फॉर्ममध्ये लेखक हाच अंतिम शब्द असतो. मोठमोठ्या प्रकाशन संस्थेमध्ये तिथले संपादक लेखकाला त्यांच्या लिखाणाच्या खर्ड्यात बदल सुचवतात. पण ते बदल करायचे किंवा नाही करायचे याबद्दल लेखकाची ठाम मतं असतील तर असे बदल करण्याचे बंधन त्याच्यावर लादता येत नाही. हा अजून एक महत्त्वाचा घटक. 

पण पटकथा लेखन हे शेवटी एका लेखकाची कलात्मक अभिव्यक्तीचं असतं हे अमान्य करून चालणार नाही. ती कितीही डेडलाईनला बांधलेली गेलेली असली, जरी सर्वसामान्य वाचकाशी जोडलेली गेली नसली आणि खुद्द लेखकाचा शब्द इथं अंतिम नसला तरी ती शेवटी एका लेखकाची कलात्मक अभिव्यक्ती आहेच.

साहित्याची व्याख्या आणि साहित्याचे निकष या प्रांतात दरवेळी जायची गरज आहेच का? मला आठवतं 'नातिचरामी'च्या प्रकाशनानंतर तिचा नेमका फॉर्म कुठला, यावर जड साहित्यिक चर्चा झडल्या होत्या. त्यावर लेखिका मेघना पेठे यांनी साहित्याला कुठल्या तरी 'फॉर्म'मध्ये अडकवल्याशिवाय आपल्याला चैन का पडत नाही, असा प्रतिसवाल केला होता. हा घटनाक्रम अनेक वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात वाचला होता. त्यामुळे तपशिलात काही गल्लत असल्यास चूक भूल द्या घ्या. पण मूळ मुद्दा हा की कुठल्याही क्षेत्राचे काही निकष असणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा प्रमाणाबाहेर बाऊ केला जाऊ नये. काही काही पटकथा दर्जाच्या बाबतीत इतक्या उच्च पातळीवरच्या असतात की, त्या कुठल्याही साहित्यिक कलाकृतीला स्पर्धा देऊ शकतात. रजत कपूरच्या 'आंखो देखी'च्या पटकथेचं उदाहरण इथं घेता येईल. 'आंखो देखी'च्या पटकथेच्या मागचा अनवट विचार, त्याचे संवाद आणि एकूणच वीण एवढी घट्ट आहे की, दाद दिल्याशिवाय राहवत नाही. रजत कपूर हा दिग्दर्शकच चित्रपटाचा लेखक असल्याचा हा परिणाम असावा. अशा अनेक चित्रपटाच्या पटकथा या साहित्यिक मूल्य याबाबतीत उच्च दर्जाच्या आहेत. नागराज मंजुळेच्या 'फॅन्ड्री'ची पटकथा पण अशीच असावी. दुर्दैवाने मराठी चित्रपटांच्या पटकथा प्रकाशितही होत नाहीत किंवा त्या ऑनलाईनही उपलब्ध नाहीत. आपल्या बॉलिवुडच्या सहकाऱ्यांकडून मराठी इंडस्ट्रीने हे शिकायला हवं. 

चित्रपटाची पटकथा 'लिटरेचर' आहे का, यासंदर्भात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करता येतात. पण मुळातच किती पटकथा लेखकांना स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्यात रस असेल, हाही प्रश्न आहेच. पण समजा उद्या चित्रपट लेखनाला उद्या साहित्य म्हणून दर्जा मिळालाच (तो कोण देणार आणि कसा देणार या तपशिलात तूर्त जायचं टाळून) तर ते चित्रपट क्षेत्राच्या आणि साहित्य विश्वाच्या फायद्याचं असेल हे नक्की. चित्रपटांच्या पटकथेचं प्रकाशन आणि त्यासंदर्भात वितरणव्यवस्था व अर्थव्यवस्था उभी राहिली तर त्याचा एकूणच मराठी साहित्यविश्वाला फायदाच होईल असं वाटतं. 

……………………………………………………………………………………………

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Chandrakant Kamble

Wed , 28 June 2017

good.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......