टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • योगी आदित्यनाथ, रामदास आठवले, प्रियंका रावत, सुनील मित्तल आणि लव-जिहाद
  • Mon , 01 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या योगी आदित्यनाथ Yogi Adityanath रामदास आठवले Ramdas Athawale प्रियंका रावत Priyanka Rawat सुनील मित्तल Sunil Mittal लव-जिहाद Love Jihad

१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ गोरखपूरमध्ये आरएसएस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत म्हणाले, फक्त ‘गोमाता की जय’ म्हणून गोमातेचं संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल. त्याच वेळी, अनेक स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी देशामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर दादागिरी करत आहेत. या स्वयंघोषित गोरक्षकांनी गोरक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालू नये, असा इशारा त्यांनी वेगळ्या ठिकाणी दिला.

थोडं थांबून, विचार करून, दीर्घ श्वास वगैरे घेऊन नंतरच काय ते पक्कं बोललं तर बरं होईल आदित्यनाथजी! की तुम्ही आतापासूनच ‘छोटे मोदी’ बनायला सुरुवात केली आहे? गावोगावचे गो-गुंड हे त्यांच्या मते ‘गोमातेच्या रक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न’च करत असतात. त्यासाठी दोन-पाच परधर्मीय कापावे लागले, तर तेही धर्मकृत्यच वाटतं त्यांना. त्यांना जरब कशी बसवणार तुम्ही?

............................................................................................

२. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील महिन्याभरापासून राजकीय वर्तुळात रंगली असताना राणे यांनी भाजपमध्ये जावं, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच दिला. ‘नारायण राणे भाजप गेल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, हा माझा त्यांना मित्रत्त्वाचा सल्ला आहे,’ असं रामदास आठवलेंनी म्हटलं. ‘राणे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यास त्यांना पाहिजे ते मिळेल,’ असं सूचक विधानदेखील आठवले यांनी केलं.

ते जायला तयार नव्हते तरी मी त्यांना पाठवले

त्यांचे हित मी माझ्या आर्जवात साठवले

त्यांच्या विरोधातले प्रचार मी जागीच गोठवले

कारण मी त्यांचा खरा हितचिंतक रामदास आठवले

............................................................................................

३. अमेरिकेच्या अन्याय्य ‘एच-१बी’ व्हिसा धोरणाविरोधात भारताने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. यासाठी भारतानेही फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्यांवर का बंदी घालू नये, असा प्रश्न भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणं आवश्यक आहे. भारतात विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. त्यामुळे भारताच्या आयटी व्यावसायिकांसाठी व्हिसाधोरण कडक करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी कामगार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त करून देतात, तिथं भारतीय कंपन्यांना एक निश्चित पगार देण्यासाठी सक्ती केली जाते. हे अतिशय चुकीचं धोरण आहे, असं त्यांनी म्हटलं.

मित्तल म्हणतायत त्यात तथ्य आहेच. मात्र, ट्रम्प यांना धडा शिकवण्यासाठी ट्रम्प बनण्याची गरज नाही. आपण कितीही देशप्रेमानं फुगलो, तरी बेडकीचा बैल होऊ शकत नाही. अमेरिकेतल्या उद्योगांचे भारतातले हितसंबंध सांभाळण्यासाठी त्या कंपन्या सक्षम आहेत. त्या ही ट्रम्पबाजी धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाहीत. ते त्यांच्या संस्कृतीला मानवणारच नाही. लगेच आपल्या पर्यायी कंपन्यांची घोडी दामटवण्याची गरज नाही. त्यांचा या कंपन्यांएवढा वकूबही नाही आणि पोहोचही नाही.

............................................................................................

४. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची चामडी सोलून काढण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेतही याच धमकीचा पुनरुच्चार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बरीच ‘मलई’ (पैसे) खाल्ली आहे. आता भाजपचं सरकार आहे. आता या लोकांनी कामं केली नाहीत तर ‘मलई’सह त्यांची चामडीही सोलून काढेन, असं रावत म्हणाल्या. जे काम करतील तेच या जिल्ह्यात राहतील. आम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड तपासणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. रावत यांनी पोलीस अधिकारी सिंह यांना रामनगर परिसरातील हत्या प्रकरणाच्या संदर्भात फोन केला होता. मी पोलीस अधिकारी आहे. माझं काम मला माहीत आहे, असं उत्तर त्यांनी दिल्याचा आणि ते उद्धटपणाचे असल्याचा रावत यांचा दावा आहे.

रावतबाईंचा उद्धटपणाचा अनुभव पाहता त्यांना पोलिस अधिकाऱ्याचं उत्तर उर्मट वाटणं स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळेच लोकप्रतिनिधी शुचिर्भूत असल्याने जमिनीच्या दोन बोटं वरूनच चालतात आणि नैतिकतेचं आभाळ त्यांना दोन बोटंच उरलेलं असतं. फावल्या वेळात या ताईंना ‘सिंघम’ सिनेमा दाखवला पाहिजे आणि त्यातून अर्थबोध न झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गजाआड करून शिकवणी घेतली पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, सर्वज्ञ आणि राज्याचे मालक नव्हेत, हे यांना कळेल तो सुदिन.

............................................................................................

५. ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा अजब नियम घालण्यात आला आहे. या शाळेच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार ‘मुस्लिम मुलं हिंदू नावं घेतात आणि हिंदू मुलींना ‘नादी लावतात’ आणि हा ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी शाळेनंच मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवलं आहे. या शाळेनं मुलांना दाढी ठेवायलाही बंदी घातली आहे. शाळेतल्या सगळ्या मुलांना ‘योगी कट’ करून घ्यायला सांगितलं गेलं आहे. योगी कट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हेअरस्टाईल. ही शाळा जैन व्यवस्थापनाची असल्यामुळे आम्ही हा नियम लागू केल्याचं शाळेनं म्हटलं आहे. मुलांच्या डब्यांची तपासणी केली जाईल, असंही शाळेनं म्हटलं आहे.

आता इतकं सगळं करताच आहात तर लगेहाथ भगवी छाटी आणि कफनी हा गणवेषही जाहीर करून टाका आणि सगळ्या मुलांना अभ्यासाऐवजी धर्मदीक्षाच द्यायला सुरुवात करा. म्हणजे शहाणी माणसं मुलांना या शाळेत धाडणार नाहीत. न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी और ना ही होगा ‘लव्ह जिहाद’. शाळेची जागा बरी असेल तर तिथं गोशाळाही काढायला हरकत नाही... फक्त नाव बदलून आलेल्या बैलांपासून हिंदू गायींचं संरक्षण करायला लागेल थोडंसं.

............................................................................................

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......