पत्रकारच व्हायचं असं माझं काही निश्चित नव्हतं...
ग्रंथनामा - आगामी
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 30 December 2023
  • ग्रंथनामा आगामी लेखणीच्या अग्रावर Lekhanichya Agravar प्रवीण बर्दापूरकर Pravin Bardapurkar

ज्येष्ठ संपादक, लेखक, ब्लॉगर प्रवीण बर्दापूरकर यांचं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे नवीन पुस्तक लवकरच नांदेडच्या ‘आनंद मीडिया’च्या वतीनं प्रकाशित होत आहे. त्यासाठी लिहिलेलं लेखकांचं ‘खरं हे मनोगत…

............................................................................................................................................

खरं तर पत्रकारच व्हायचं, असं मी काही निश्चित केलेलं नव्हतं. बालपण ते वयाची तिशी हा माझा काळ अतिशय खडतर होता. त्यातला बराचसा विपन्नावस्थेतलाही होता. त्यातली (आजही सोबत असणारी) सुखद बाजू म्हणजे माझ्यावर वाचनाचा संस्कार माई- माझ्या आईनं केला आणि पुढे बेगम मंगलानं तो वाचनसंस्कार समृद्ध केला. बेगममुळे शब्दांना लळा कसा लावावा हे, तसंच इंग्रजी वाचनाकडे मी वळलो. माझ्या जडणघडणीत या दोन स्त्रियांना अनन्यसाधारण स्थान आहे.

पौंगढावस्थेतच मी काहीबाही लिहायला सुरुवात केली. मग कसा कोण जाणे कथालेखनाकडे वळलो. त्या कथा प्रकाशितही होऊ लागल्या. विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या ‘युगवाणी’सह काही परितोषिकंही कथांना मिळाली.

तर, तेव्हा बांधकाम आणि इमारती आणि आताच्या सार्वजनिक खात्यात रोजंदारीवर काम करत होतो, सोबतच अनेक चळवळीत सक्रिय होतो. अक्षर चांगलं असल्यानं प्रत्यक्ष कामावर न जाता कारकुनीची कामं माझ्याकडून करवून घेतली जात आणि भविष्यात रोड कारकून म्हणून नोकरी मिळण्याची शाश्वती होती. म्हणजे व्यवस्थेचा एक भाग होऊन जमेल तसा भ्रष्टाचार वगैरे करून नवीन औरंगाबादमध्ये घर बांधून आणि त्याला ‘मातृछाया’ वगैरे नाव देऊन निवृत्तीनंतरचं आयुष्य ‘सुखात’ कंठण्याची सोय नक्कीच होणार होती. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

याच दरम्यान पत्रकारितेतही माझी ‘लेखन लुडबूड’ सुरू झालेली होती. त्यातून तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या आकाशवाणीच्या औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) केंद्राच्या काही असाईनमेंट्स तत्कालीन वृत्तविभाग प्रमुख वसंतराव देशपांडे यांच्यामुळे मिळाल्या. आकाशवाणीसाठी केलेल्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद बघून पत्रकारितेकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे माझ्या कथा लेखनाला प्रसिद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, हा स्वार्थी विचारही त्यामागे होता, हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं.

वसंतराव देशपांडे यांनीच एक पत्र देऊन मला तेव्हा ‘गोमंतक’चे संपादक असलेल्या माधवराव गडकरी यांच्याकडे पणजीला पाठवलं. अशा रितीनं १९७७साली मराठी पत्रकारितेत मी प्रवेश केला; आता २०२३मध्ये त्याला ४५ वर्षे पूर्ण झाली.

पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण असं प्रवास करत १९८१ साली माझा पडाव नागपुरात पडला. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकांचा दोनच वर्षात मुख्य वार्ताहर होण्यापर्यंत मी मजलही मारली. शिवाय मंगलासोबत रविवार पुरवणीच्या कामाची अतिरिक्त जबाबदारीही माझ्याकडे होती. एकूण ठरवलं त्याप्रमाणं मजेत चाललं होतं.

अचानक माझ्या पत्रकारितेला वेगळं आणि निर्णायक वळण लावलं, ते माधव गडकरी यांनी. तेव्हा ते ‘मुंबई सकाळ’चे संपादक होते. त्यांच्यामुळेच मी मुंबई सकाळ’चा नागपूर वार्ताहर म्हणूनही काम करत होतो. एका नागपूर भेटीत माधवराव गडकरी यांनी अक्षरक्ष: रागावून कथा-कविता लेखन बंद करायला लावून राजकीय वृत्त संकलनाच्या बीटमधे माझी रवानगी केली.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पुढे माधवराव तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या ‘लोकसत्ता’ या दैनिकाचे संपादक झाले आणि माझ्या पत्रकारितेचा प्रवास  एका व्यापक अवकाशात सुरु झाला. नागपूर, मुंबई, दिल्ली अशा महत्त्वाच्या सर्व शहरात काम करण्याची संधी मिळाली. एक अर्धवेळ वार्ताहर ते ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि मग संपादक असा हा प्रवास आहे. नंतर ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचा राजकीय संपादक म्हणून नवी दिल्लीतही पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. ‘साल्सबर्ग सेमिनार’ची प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली. मराठीसोबतच हिन्दी आणि इंग्रजीतही लेखन करता आलं. केवळ देशच नव्हे, तर जगातील ४०पेक्षा जास्त देशांचे दौरे करता आले. विधीमंडळ आणि संसदेच्या कामाचंही वृत्त संकलन करता आलं.

एकूण काय तर, एक पत्रकार म्हणून माझी पोतडी गच्च भरलेली आहे. प्रांजळपणे सांगतो, पत्रकारितेचा प्रवास असा संपन्न होईल, असं माझ्या स्वप्नातही कधी आलेलं नव्हतं. हा जसा एक पत्रकार म्हणून अजूनही सुरूच असलेला माझा प्रवास आहे, तसंच ते पत्रकारितेच्या ‘मिशन टू  प्रोफेशन टू बिझिनेस’ असं झालेलं (माझ्या पिढीला अवमूल्यनात्मक तसंच वैषम्यही वाटणारं) ते स्थित्यंतरही ‘बटविन द लाईन्स’ या कथनात आहे.

माईनं ओंजळीत टाकलेल्या महात्मा गांधी यांच्यावर श्रद्धा आणि समाजवादी विचारानं भारलेला मी होतो, अजूनही आहे. पण पत्रकारिता करतांना ‘News is sacred , comment is free’ हा संस्कार माझ्या पिढीवर झालेला आहे आणि माझ्यापुरता तरी तो आजही तेवता आहे. बातमीत राजकीय भूमिका न आणल्यानं सर्वच राजकीय पक्षात माझा वैपुल्यांनं केवळ संचार राहिला नाही, तर व्यापक घनिष्ट संपर्क निर्माण झाला.

‘दिवस असे की...’ (प्रकाशक - ग्रंथाली) या माझ्या अनुभव कथनाचा हा विस्तार आहे. त्यात ‘लोकसत्ता’च्या आधीचे आणि नंतरचे म्हणजे लोकमत वृत्तपत्रसमूहातील अनुभव आलेले नव्हते. ते दिवस या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक पत्रकार समाज आणि भावजीवनातही एकाच वेळी जगत असतो. पत्रकारांनं तटस्थ असावं, हे म्हणायला सोपं असतं; दु:ख नको तुटताना, अश्रु नको वळताना, हे कवितेत शोभून दिसतं. कुणालाही प्रत्यक्ष जगताना असं वागताच येत नाही, कारण येणारे अनुभव प्रपातासारखे कोसळत असतात. त्यामुळे  भोवंडून जायला होतं. पत्रकारही त्याला अपवाद नाहीतच.

‘हिंदुत्ववादा’ला माझा विरोध असूनही त्यांच्यातील अनेकांशी जीभावाचं मैत्र निर्माण झालं. आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणा माझ्यात जन्मजात आहे, पण पत्रकारिता करताना आक्रमकता कधीच आततायीपणाकडे किंचितही झुकू न देण्यात आणि एकांगीपणा टाळण्यात मला यश आलं. त्यामुळे अनेकांशी पंगे घेऊनही संपर्क कायमच बहुस्तरीय आणि विचारिय राहिला.

सुरुवातीला डावीकडे झुकलेलं माझं लेखन नंतर  जात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून होत गेलं; ही प्रक्रिया आपसूक घडली. ज्याचं जे चांगलं आहे, त्याचं कौतुक करताना कधी संकोच वाटला नाही आणि त्याच व्यक्तीच्या न पटलेल्या निर्णयाला विरोध करताना माझा हात कधी थरथरला नाही. थोडक्यात, माझं लेखन एका अर्थानं विवेकवादी होत गेलं, असं म्हणता येईल. म्हणूनच -

‘मेत्ती मे सर्व भूदेसु

वेंरम् मझं नं केणवी!’

(या भुतलावरच्या सर्वांशी माझी मैत्री आहे, माझं कुणाशीही वैर  नाही.)

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

भाजपची हडेलहप्पी!

विधिमंडळाचं अधिवेशन ‘…नुसतंच कंदील लावणं’ होऊ नये!

निवडणूक निकालाची आकडेवारी आणि वस्तुस्थिती!

भाजपला मोठं, तर काँग्रेसला थोडंसं यश!

..................................................................................................................................................................

‘दिवस असे की...’ (प्रकाशक - ग्रंथाली) या माझ्या अनुभव कथनाचा हा विस्तार आहे. त्यात ‘लोकसत्ता’च्या आधीचे आणि नंतरचे म्हणजे लोकमत वृत्तपत्रसमूहातील अनुभव आलेले नव्हते. ते दिवस या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रत्येक पत्रकार समाज आणि भावजीवनातही एकाच वेळी जगत असतो. पत्रकारांनं तटस्थ असावं, हे म्हणायला सोपं असतं; दु:ख नको तुटताना, अश्रु नको वळताना, हे कवितेत शोभून दिसतं. कुणालाही प्रत्यक्ष जगताना असं वागताच येत नाही, कारण येणारे अनुभव प्रपातासारखे कोसळत असतात. त्यामुळे  भोवंडून जायला होतं. पत्रकारही त्याला अपवाद नाहीतच.

बेगमच्या दीर्घ आणि असाध्य आजाराला मी एक पत्रकार आणि माणूस अशा दुहेरी भूमिका साकारत सामोरं गेलो. त्या दिवसांत खूप काही शिकता आलं, म्हणून बेगम ‘जाताना’चं ते सगळं इथं समाविष्ट केलं आहे. थोडक्यात, १९७७ ते २०२१ म्हणजे बेगम मंगलाचं निधन होईपर्यंतचा हा लेखनपट आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एक स्पष्ट करतो, हे लेखन आत्मचरित्र नाही. गेल्या साडेचार दशकातील पत्रकारितेच्या काळाचं इतिहास लेखन नाही, समकालाचा तो वेध किंवा ते एक सरसकट ‘स्टेटमेंट’ नाही, कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही किंवा पत्रकारितेतील योगदानाचा तो दावा नाही. पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश टाहोही नाही, तर पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचं हे काहीसं आत्मपर प्रांजळ कथन आहे.

पुस्तकाला ‘लेखणीच्या अग्रावर’ हे नाव आमच्या कुटुंबाचे ‘मेंटर’ महेश एलकुंचवार यांनी सुचवलेलं आहे. प्रस्तावना राम जगताप याची आहे. माझ्या पिढीनंतर पत्रकारितेबद्दल समतोल दृष्टी आणि डोहखोल आकलन असणारे जे मोजके पत्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणून राम जगतापकडे मी पाहतो. म्हणूनच त्यानं प्रस्तावना लिहावी, असा माझा आग्रह होता. हे पुस्तक सिद्ध होण्यात विवेक रानडे, भाग्यश्री  बापट-बनहट्टी, अर्चना अजय जोशी, डॉ. सुरेश सावंत हे नेहमीप्रमानं सोबत आहेत. हे सर्व माझ्या जीवाभावाचे आहेत, त्यांच्या प्रती आभार कसे व्यक्त करणार?

नांदेडचे धाकटे लाडके मित्रवर्य राम शेवडीकर आणि दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’ या पुस्तकाच्या निमित्तानं पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ‘आनंद मीडिया’चा शुभारंभ माझ्याच एखाद्या पुस्तकानं व्हावा असा आनंद आणि राम शेवडीकर यांचा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ‘आनंद मीडिया’ला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

आणखी काय सांगणार?

‘लेखणीच्या अग्रावर’ - प्रवीण बर्दापूरकर,

आनंद मीडिया, नांदेड | मूल्य - ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......