टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मनोहर पर्रीकर, दिग्विजय सिंह, शहाबुद्दीन, छोटा राजन, शाहनवाझ हुसैन, योगी आदित्यनाथ आणि अरविंद केजरीवाल
  • Sat , 01 April 2017
  • विनोदनामा टपल्या मनोहर पर्रीकर Manohar Parrikar दिग्विजय सिंह Digvijay Singh शहाबुद्दीन Shahabuddin छोटा राजन Chhota Rajan शाहनवाझ हुसैन Shahnawaz Hussain योगी आदित्यनाथ Yogi Adityanath अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. राज्यसभेचा निरोप घेताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सभागृहाचे आभार मानले. यावेळी पर्रिकर यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनाही धन्यवाद दिले. गोव्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही दिग्विजय सिंह यांना सत्तास्थापनेची जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले. या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी दिग्विजय सिंह यांचे आभार मानत त्यांना चिमटा काढला. ‘मी दिग्विजय सिंह यांचे विशेष आभार मानतो. दिग्विजय सिंह यांनी गोव्यात काहीच केले नाही. त्यामुळे मला सरकार स्थापन करता आले,’ असा चिमटा पर्रिकर यांनी काढला.

पर्रीकर यांच्या तथाकथित साधेपणाचं आणि सचोटीचं कौतुक असलेला एक मोठा वर्ग आहे... त्यांना हा चिमटा आहे, पण तो बसणार नाही. त्यांची कातडी निबर झाली आहे. गोव्याच्या राज्यपालबाईंनी सगळे संकेत, शिष्टाचार धाब्यावर बसवून केंद्रीय मंत्र्यांशी (अरुण जेटली) सल्लामसलत करून जनतेने मुख्यमंत्र्यासकट नाकारलेल्या भारतीय जनता पक्षाला पाचारण केलं आणि नीतीमत्तेचे मानबिंदू पर्रीकर यांनी दोन जिल्ह्यांच्या सरपंचकीसाठी देशाचं संरक्षणमंत्रीपद सोडलं, हा अभिमानास्पद घटनाक्रम यातून सहजच आठवला.

.....................................................................................................................

२. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकावरच भ्रष्टाचाराचा आरोप लागला आहे. या पथकाची आता सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. केजरीवाल यांनी स्पाय युनिट नावाने हे पथक सुरू केले होते. दिल्लीतील शाळांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती अरविंद केजरीवाल यांना देण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली होती.

अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या टोप्या कोणाकोणाच्या डोक्याला शून्य मिनिटांत फिट झाल्या होत्या, याची कल्पना नाहीये का केजरीवालांना? या देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या बाता मारणारा प्रत्येकजण अंती महाभ्रष्टच निपजतो, या इतिहासाचंही ज्ञान दिसत नाही त्यांना. असली कुचकामी पथकं स्थापन करण्याचे स्वस्त मार्ग अवलंबून लोकप्रिय व्हायला तुम्ही काय भाजपचे मुख्यमंत्री आहात काय?

.....................................................................................................................

३. भारतातील सर्वात मोठे हाय-प्रोफाइल गुंड कैदेत असलेल्या तिहार तुरुंगात भारतातल्या दोन मोठ्या गुंडांमध्ये एक वेगळंच गँगवॉर, खरं तर टीव्हीवॉर पेटलं आहे. माफिया डॉन छोटा राजन आणि बिहारचा गुंड राजकारणी शहाबुद्दीन यांच्यामध्ये हे म्युझिकल गॅंगवार पेटलं आहे. छोटा राजनला तुरुंगात टीव्ही मिळाला आहे, हे कळाल्याने शहाबुद्दीनचा तीळपापड झाला असून आपल्यालाही टीव्ही मिळालाच पाहिजे, असा हट्ट त्याने धरला आहे.

पण, म्हणजे बड्या गुन्हेगारांच्या मानवी हक्कांची पायमल्लीच आहे त्यांना टीव्ही वगैरे नाकारणं म्हणजे. असंही नाहीये की हे सगळं ते फुकट मागतायत. सगळ्यासाठी दामदुप्पट पैसे मोजून ते या सुविधा मिळवत असतात. मग सरळ सरकारने प्रिझन लक्झरी टॅक्स लावून या सुविधा पुरवल्या तर त्यातून राजकीय कैद्यांसाठी वातानुकूलित डुप्ले किंवा ट्रिप्लेसारखे सुंदर, टुमदार, सुसज्ज तुरुंग तरी बांधता येतील देशभर.

.....................................................................................................................

४. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भगवान श्रीराम यांच्याशी तुलना केली आहे. उत्तर प्रदेशातील ‘योगीराज’ हे रामराज्य आहे, याच रामराज्याचा उल्लेख कधी काळी राजीव गांधी यांनी केला होता, असे हुसैन एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान म्हणाले.

राजीव गांधी हुसैन यांच्या स्वप्नात आले होते आणि आनंदाने रडत रडत त्यांनी इतक्या वर्षांचं आपलं स्वप्न आता पूर्ण झालं आहे, असं सांगितलं, हे त्यांनी सांगितलं नाही का? फारच संकोची आहेत बिचारे. रामाच्या काळात बिभीषण आणि सुग्रीव होते, त्यांची जागा आज शहानवाझांनी घेतली आहे, हेही त्यांनी विनयशीलतेमुळेच सांगितलं नसावं.

.....................................................................................................................

५. राज्यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्याच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोडतोड केल्याची घटना समोर आली आहे. इंदौरमध्ये संघाचे नेते हिम्मत राठोड यांचे निधन झाले. राठोड यांच्यावर गोकुळदास रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे राठोड यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धुडगूस घातला. रुग्णालयात तोडफोड करण्यात आली.

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रुग्णालयाची मोडतोड झाली, मोडतोड करणारे भारतमाता की जय अशा देशप्रेमाने भारलेल्या घोषणा देत होते. त्या सर्वांनी जाज्वल्य धर्माभिमान दाखवून देणारा टिळा लावला होता, या सगळ्या सकारात्मक गोष्टी कधीच लोकांपुढे आणणार नाही हा बिकाऊ मीडिया!!!

.....................................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......