आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘सालं अतीच झालं!’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस सालं अतीच झालं Saala Atich Zaal खेमराज भोयर Khemraj Bhoyar

क्रांती किंवा चळवळ रस्त्यावरचीच असते असे नाही, ती वैचारिकही असू शकते. जगातल्या क्रांत्या वा चळवळींच्या इतिहासात आपण हे पाहिलेलं आहे. ‘फ्रेंच राज्यक्रांती’मध्ये वैचारिक चळवळीची भूमिका व्हॉल्टेअरने मांडली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वैचारिक क्रांतीचा फार मोठा हातभार लागला होता. प्रस्थापितांकडून अन्याय, अत्याचार होताना त्याविषयी जनतेत चीड, राग निर्माण करण्याची भूमिका विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक लेखनातून पार पाडतात. हे फक्त भाषणांतून किंवा वैचारिक लेखनातून होते असे नाही, तर ललितसाहित्यातूनही तितक्याच प्रभावीपणे होते. कवी कुसुमाग्रज जेव्हा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ म्हणतात तेव्हा शब्दही गर्जत येतात.

समकाळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, खोटारडेपणा वाढतो आहे, भंकसगिरी बोकाळते आहे, तेव्हा भूमिका ठेवून जगणाऱ्या कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कवी खेमराज भोयर यांची यांचा हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. श्रीधर अंभोरे यांचे समर्पक मुखपृष्ठ लाभलेल्या या कवितासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी न्यायपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. यासोबत कवी लोकनाथ यशवंत व सागर सरहद्दी यांनी केलेले मलपृष्ठावरील भाष्य कवितासंग्रहाची उंची वाढवणारे आहे.

डॉ.यशवंत मनोहर म्हणतात, “चळवळीतील प्रत्येक मन कवीचेच मन असते. काही मने  कृतींनी बोलतात, तर काही मने कवितांनाच कृतीमय करतात. सार्त्र  म्हणतो त्याप्रमाणे ‘To speak is to act. The writer a free man addressing free men, has only one subject- freedom’. कवी लिहितो ही त्याची कृतीच असते. जग बदलण्यासाठीच तो लिहितो आणि मानवाला स्वतंत्र करणे हाच त्याचा विषय असतो.”

‘कविता हीसुद्धा चळवळीतील एक कृतीच असते’ हा विचार प्रस्तुत कवितासंग्रह वाचताना वारंवार येतो. कवी लोकनाथ यशवंत म्हणतात, “आपण राहतो ती दुनिया फारच लबाड आहे. येशू- बुद्ध- पैगंबर यांच्या आदर्शच्या खूपच लंब्याचवड्या बाता करते आणि युद्धाच्या खुरापतीही सतत उकरून काढते. जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकते नि लाखो माणसांना क्षणात मारून टाकते. अशी दुटप्पी दुनिया बघून कवी अस्वस्थ होतो.” त्यातून कवीचे शब्द शस्त्र म्हणून बाहेर पडतात. ‘ये तो बहुत जादा ही हुवा…’ असे मत सागर सरहद्दी व्यक्त करतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

या कवितासंग्रहात एकूण ९६ कविता आहेत. समकालीन समाजकारण, राजकारण, अर्थकारण, मीडिया यांची दुटप्पी भूमिका पाहून कवी अस्वस्थ होतो. लोकशाहीची क्रुरकर्म पाहून आपणास लाज वाटायला लागते. कोण सत्तेत? कोण विरोधी पक्ष हेच कळत नाही.

“मी सत्ताधारी, तू विरोधी

तू विरोधी, मी सत्ताधारी

पर्यायच नाही दुसरा” (पृ.२३)

आपण नम्रपणे मालकी स्वीकारली आहे. स्वसन्मान, अस्मिता खुंटीला गुंडाळून ठेवली आहे. कारण  ‘तुकडा’ भेटला की, घशाला कोरड पडेपर्यंत बोंबलणारे, बेंबीच्या देठापासून चिडीचूप आहेत. दलालांची फौज वाढलेली आहे. कसायाच्या दावणीला सारे आमचेच चमचे आहेत. रक्ताचा लिलाव करून, त्यांचीच थुंकी चाटत आहेत. सत्काराच्या भिकेला स्वतःची लाज विकली आहे. याची कवीला प्रचंड चीड येते. तो आपल्या लेखणीतून प्रहार करतो. आपल्या समविचारी दोस्तांना बंड करण्यास, क्रांती करण्यासाठी प्रवृत्त करतो-

“काठ फिरून खोलीचा

अंत लागणे नाही इथे

मेंदू नासव्या भक्तीची

ती कोंडी फोड दोस्ता” (पृ.३९)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गटारातील गटातटांना घोडा लाव, लाथ मारून पाणी नाही तर पेट्रोल काढ असा सल्ला कवी देतो. ‘मला कुठल्याच वादात पडायचं नाही’ म्हणणाऱ्यांना कवी आपल्या बापाची आठवण करून देतो. आपण आपली खरखटी ठेवून त्यांचं धुवायला निघालो, दोस्त कोण? दुश्मन कोण? यावरून आपण भांडत बसलो, याचा राग कवीला येतो. म्हणून तो आपल्या मुलाला बजावून सांगतो- ‘शिक्षणाच्या परीक्षेत नापास झालास, फरक पडत नाही. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी मात्र तुला महापुरुषांच्या विवेकाचा धागा पकडावा लागेल. कारण आजच्या कृतिशून्य  जगण्याचा कवीला संताप येतो-

“लिहून फार झाले

गाऊन फार झाले

पोकळ धमकी वार

देऊन फार झाले” (पृ.८२)

काठीविना झेंड्याला अर्थ राहत नाही. मोर्च्यात कधी न राहता, चर्चेत सहभागीला किंमत नाही, करणी आणि कथनीत फरक असू नये, ही कवीची प्रांजळ भावना आहे. “तुम्ही बाटलीनं पिता, की बोळ्यानं, या वादात मला पडायचं नाही, गंध बनून लोळायचं नाही, अन् आपसात लढायचं नाही” ही भूमिका हा कवी घेतो.

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. पण दुर्दैवाने काही बोटांवर मोजता येतील, असे अपवाद वगळले तर बाकी सर्व विकले गेली आहेत. निरर्थक चर्चा, सत्तेची दलाली, ठरवून घेतलेल्या मुलाखती करणाऱ्या मीडियाला कवी प्रश्न करतो-

“माउल्या भोगून कापले-फाडले

पोटातील तिच्या गर्भही गाडले

सांगा कलम कसायांनो आता

आटली का शाई? मेंदू का सडले?” (पृ.६७)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डोळ्यांदेखत धिंड काढताना, वस्ती जाळताना, धर्माचे ठेकेदार हैदोस घालताना, लोकशाहीआड नंगेशाही चालू असताना तुमची कलम का चालत नाही? असा प्रश्न कवी मीडियाला विचारतो. डुप्लिकेट लोकांचा खूप राग कवीला येतो. फेकू नेत्यांचा राग येतो. तो फक्त राजकारण्यांना, मीडियालाच उघडे पाडतो असे नाही, तर समाजातल्या संधिसाधू लोकांनाही सोडत नाही-

“तो ‘रामराम’

नमस्कार करीत

माझ्याजवळ थांबला

हळूच मला ‘जय भीम’ म्हणाला

अन् माझा हात

पायातील

बुटाकडं लांबला…” (पृ.८७)

ज्या बापाने तुला अस्तित्व दिलं, त्या बापाचं नाव घेताना तुला लाज वाटत असेल तर खबरदार, असा दमही कवी देतो. ‘फुले-शाहू-आंबेडकर-शिवाजी’ यांचा आरसा व आदर्श घेऊन पुढे येण्याचा सल्ला देतो.

थोडक्यात, समकाल भयावह, भीषण शब्दांत व्यक्त करताना कवी शब्द शस्त्र म्हणून घेऊन येतो. ‘बेशरम’, ‘कृतिशून्य’, ‘खेकडे’, ‘फौज’, यांची संख्या वाढते आहे. आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

‘सालं अतीच झालं!’ - खेमराज भोयर

परिस पब्लिकेशन, पुणे

पाने – १५२

मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......