टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • लालकृष्ण अडवानी, मायावती, मनोहर पर्रीकर, संजय लीला भन्साळी, नवाज शरीफ आणि अर्जंटिनामधील नवीन बेडूक
  • Wed , 15 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या लालकृष्ण अडवानी मायावती Mayawati मनोहर पर्रीकर Manohar Parrikar संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali नवाज शरीफ Nawaz Sharif अर्जंटिनामधील नवीन बेडूक Frog in Argentina

१. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. गुजरातमधील सोमनाथ येथील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी यांचे नाव पुढे केल्याचे वृत्त आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शहा, केशुभाई पटेल आणि खुद्द लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.

चला, अडवाणींची ओळख ‘तहहयात भावी पंतप्रधान’ अशीच राहणार की काय, अशी शंका वाटत असताना मोदींनी ती बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, हे चांगलं झालं. उभयतांची राजधर्माची संकल्पनाही मॅचिंग आहे. शिवाय निवडणूक जुलैमध्येच असल्याने आणि भाजपकडे संख्याबळ असल्याने त्यांच्यावर ‘तहहयात भावी राष्ट्रपती’ बनण्याची वेळ येणार नाही.

...........................................................................

२. कोल्हापुरातील पन्हाळ्यावर येथे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटला मंगळवारी रात्री आग लावण्याचा प्रयत्न झाला. मसई पठारावर सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. काही अज्ञात व्यक्तींनी मोडतोड करत सेटची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये पद्मावतीचे चित्रीकरण सुरू असताना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळी यांना मारहाण केली होती.

करणी सेनेचे लोक कोणीतरी विचारशक्तीवरच करणी केल्यासारखं वागून संघटनेचं नाव भलत्याच प्रकारे सार्थ करतायत... जो सिनेमा अजून तयारच झालेला नाही, त्या सिनेमात आपल्या कोणत्या तरी काल्पनिक ऐतिहासिक श्रद्धास्थानाची विटंबना होणारच आहे, ही त्यांची अंधश्रद्धा अचाट आहे.

...........................................................................

३. मनोहर पर्रिकरांनी गोव्याचे १३वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोकणी भाषेत शपथ घेताना पर्रिकर ‘मुख्यमंत्री’ हा महत्त्वाचा शब्द विसरले. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या मदतीला धावून गेले. ‘तुम्ही फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली आहे,’ असं त्यांनी पर्रीकरांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वापरून पुन्हा एकदा शपथ घेतली.

स्वाभाविक आहे. माणूस कितीही साधा, निष्ठावान कार्यकर्ता असला, सर्व सत्ताकांक्षांच्या वर पोहोचला असला, तरी संघटनेच्या आदेशामुळे दिल्लीचं मैदान सोडून गल्लीतल्या अंगणात यावं लागलं की, एवढी गडबड होणारच. गडकरींना वेगळीच काळजी. शपथ चुकल्याने काही तांत्रिक गडबड होऊन पर्रीकरांना पुन्हा दिल्लीलाच यावं लागलं, तर कितीजणांची केवढीतरी पंचाईत झाली असती ना?

...........................................................................

३. मतदान यंत्रामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले आहे. मायावती यांचा पराभव हा चुकीच्या धोरणांमुळे झाला असून त्यांनी पराभवाचा स्वीकार केला पाहिजे असे जेटली यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्ष निवडणुकीत आहे म्हटल्यावर मायावती यांनी मुळात निवडणुकीत उतरायलाच नको होतं. उलट वेळात वेळ काढून भाजपचा, नोटाबंदीचा प्रचार करायला हवा होता. किमानपक्षी आपले काही हमखास विजयी होणारे भिडू कमळदलात पाठवून निवडून आणायचे होते. हे काही न करता त्यांनी निवडणूक लढवली म्हणजे रणनीती चुकलीच ना साफ!!

...........................................................................

४. अंधारात प्रकाशित होणारा पहिला बेडूक अर्जेटिनात सापडला असून त्याच्यात हिरवा, पिवळा व तांबडा रंग प्रकाशित रूपात दाखवण्याची क्षमता असते, पण अंधारात तो निळा व हिरवा प्रकाश बाहेर टाकतो. कमी तरंगलांबीचा प्रकाश शोषून जास्त तरंगलांबीचा प्रकाश बाहेर टाकण्याच्या गुणधर्माला प्रदीप्तता म्हणतात. आतापर्यंत उभयचरांमध्ये हा गुणधर्म दिसला नव्हता.

आता व्हॉट्सअॅप पोस्टची वाट पाहणं आलं... भारतात ऋषीमुनींच्या मंत्रशक्तीने प्रदीप्त होणारे बेडूक होते, त्यांच्या प्रकाशाने आकाशातल्या ढगांना सिग्नल मिळून पाऊस पडायचा, ही पर्जन्यदेवानेच निर्माण केलेली व्यवस्था होती. अशा रीतीने कृत्रिम पाऊसच नैसर्गिकरित्या पाडण्यात भारतीय पारंगत होते. त्यामुळे भारतीय बेडकांना अर्जेंटिनापर्यंत सगळीकडे मागणी होती. पण, भारतासारखी सुबक-सुंदर डबकी नसल्यामुळे बेडकांची ही प्रजाती कालौघात नष्ट झाली... घ्या... मिळवा फोटो... करा फॉरवर्ड! स्प्रेड इट लाइक फायर... क्यूंकि बिकाऊ मीडिया आप को ये सच नही दिखाएगी...

...........................................................................

५. बळजबरीने धर्मांतर करणे आणि दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे इस्लाममध्ये अपराध मानले जाते, पाकिस्तान कोणत्याही धर्माविरोधात नाही. इथे धर्मावरून कोणतीच लढाई नाही, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीनिमित्त आयोजित एका सोहळ्यात सांगितलं.

नवाज शरीफ आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करून टाकून पाकिस्तान प्रदेशाध्यक्ष झालेत की काय? आता तिथेही पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार आणि अखंड हिंदुस्तानाचा दिशेने पाऊल पडणार अशी चिन्हं दिसतायत.

...........................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......