टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा, बाबुल सुप्रियो, अरविंद केजरीवाल, रामदेव बाबा आणि पल्स कँडी
  • Sat , 11 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमित शहा Amit Shah बाबुल सुप्रियो Babul Supriyo अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal रामदेव बाबा Ramdev Baba पल्स कँडी Pulse Candy

१. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना ट्विटरच्या माध्यमातून एक विनंती केली. महिलांना धमक्या देणाऱ्या किंवा त्यांना ट्रोल करणाऱ्या स्वत:च्या फॉलोअर्सना मोदींनी अनफॉलो करावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी, असे केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. उत्तर प्रदेशात प्रचारमग्न असलेल्या पंतप्रधानांनी यावर काही उत्तर दिल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही.

बाकी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या केजरीवालांनी पंतप्रधानांच्या ट्विटर अकाउंटचा मात्र पुरेसा अभ्यास केलेला दिसत नाही. नाहीतर त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्तच झाली नसती. मोदींना कोण फॉलो करतं यापेक्षा मोदी कोणाला फॉलो करतात, हे त्यांनी पाहायला हवं होतं. एकापेक्षा एक नग असे नामचीन प्रतिगामी, हिंस्त्र हल्लेखोर ट्रोल आणि धर्मांध लोक त्या सन्मानाला पात्र ठरलेले आहेत. अशा मोदींकडून ही अपेक्षा व्यर्थ नाही का?

……………………………………………………………………

२. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी रामदेव बाबा यांना ७५ टक्के सवलतीमध्ये नागपूरची जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांना पतंजली फूड पार्क उभे करण्यासाठी ही जमीन दिली गेली, तेव्हा तत्कालीन अर्थ सचिव बिजय कुमार यांनी रामदेव बाबांना सवलतीत जमीन द्यायला हरकत व्यक्त केली होती. त्यानंतर तीन आठवड्यांत त्यांची त्या स्थानावरून अचानकपणे बदली करण्यात आली आणि कृषी खात्याच्या सचिवपदावर बसवण्यात आलं.

काही लोक कसलीही विशेष पात्रता नसताना राष्ट्रसंत वगैरे बनून बसतात, याची बिजय कुमार यांना कल्पना नसावी, हे आश्चर्यकारक आहे. जिथे एका राज्याचे मुख्यमंत्री (जे भावी पंतप्रधानही असतात) एका बलात्कारी बापूबरोबर सद्गतित होऊन सत्संग करताना दिसतात, तिथे केंद्र सरकार आणि धर्मपरायण सत्ताधीश पक्ष एका संशयास्पद उत्कर्षप्रवण भोंदू बुवाच्या भजनी लागलं तर त्यात नवल काय? वाऱ्याची दिशा ओळखता न आल्यास बिजय कुमार होमगार्ड किंवा बॉय स्काउटमध्येही जमा झालेले दिसतील.

……………………………………………………………………

३. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबचा दाखला देत विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. मतदारांनी उत्तरप्रदेशला ‘कसाब’मुक्त करा असे आवाहनच त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये शहा यांनी कसाब या शब्दाचा उलगडा करताना सांगितले की, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पक्ष आणि ब म्हणजे बहुजन समाज पक्ष असा याचा अर्थ होतो.

हे एक थोर गृहस्थांना त्यांच्या अद्भुत विनोदबुद्धीबद्दल तडीपार करण्यात आलं आहे काय? अन्यथा, ज्या पक्षाचं नाव 'भ' या भारतातल्या बहुतेक भाषांमधल्या सर्वाधिक अभद्रशब्दसूचक अक्षराने सुरू होतं, त्या पक्षाच्या अध्यक्षपदी राहून यांनी इतर पक्षांच्या नावाची उठाठेव केली नसती. भ, ज आणि प या आपल्या शब्दांची अशी फोड केली गेली, तर ती कोणत्याही वर्तमानपत्रात छापण्यायोग्य नसेल, याचं भान ठेवा मिस्टर तडीपार!

……………………………………………………………………

४. पल्स या आबालवृद्धांच्या पसंतीला उतरलेल्या आंबटगोड कँडीने ३०० कोटी रुपयांच्या वार्षिक व्यवसायाचा पल्ला गाठून देशात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रजनीगंधा या पानमसाल्याच्या उत्पादकांनी कच्च्या कैरीच्या चाट मसालायुक्त चटकदार स्वादाची ही कँडी बाजारात आणल्यापासून लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांच्याही त्यावर उड्या पडल्या आहेत.

अहो हळू हळू, त्या कानपूरच्या अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे लोक ऐकतील ना? देशात कोणतंही उत्पादन यशस्वी झालं की, त्यात हे लोक भेसळ, अळ्या, हानीकारक पदार्थ वगैरे शोधून दाखवतात. काही काळाने त्याच चवीचं आणि त्याच घटकांचं पतंजली उत्पादन बाजारात येतं, असा परिपाठच होऊन बसलाय. मॅगी प्रकरण आणि पतंजलीच्या नूडल्सचं आगमन विसरलात का? तेव्हा उगाच पल्सवाल्यांची पल्स वाढवू नका.

……………………………………………………………………

५. तृणमूल काँग्रेसच्या आमदार मोहुआ मोईत्रा यांच्याबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात आज चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.  तृणमूलच्या आमदार मोहुआ मोईत्रा यांनी ४ जानेवारी रोजी बाबूल सुप्रियो यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सुप्रियो यांनी मोहुआ यांचं नाव महुआ म्हणजे मोहाच्या दारूसमान असल्याची टिप्पणी केली होती.

यात खरंतर राग येण्यासारखं किंवा आरोपपत्र दाखल करण्यासारखं काय आहे? अत्यंत प्रखर राष्ट्रवादी आणि परंपरावादी असलेल्या पक्षाचे निष्ठावंत पाईक असलेल्या सुप्रियो यांनी महुआ या देशी दारूची आठवण काढली होती, कोणत्याही विदेशी वाईन किंवा व्हिस्की-व्होडकाची आठवण काढली नव्हती, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही किंवा भांग, गांजा आदी देशी, धार्मिक नशाप्रकारांपैकी कोणत्याही पदार्थाचं सेवन करून सुप्रियो यांनी हे उद्गार काढले असतील, तर तेही क्षम्यच आहे. फारतर, तुमचं नाव बबुल म्हणजे बाभळीच्या झाडाच्या जवळ जाणारं आहे, अशी फिट्टम् फाट् करून टाकायची.

……………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......