टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • दिग्विजय सिंह, विश्वनाथ महाडेश्वर, नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी
  • Thu , 09 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या दिग्विजय सिंह Digvijay Singh विश्वनाथ महाडेश्वर Vishwanath Mahadeshwar नरेंद्र मोदी Narendra Modi लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani

१. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लखनऊ येथील दहशतवाद्यांबरोबरील पोलिसांच्या चकमकीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात असं झालंय का असा सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून निधी मिळत असल्याचा आरोप संघाचे कार्यकर्ते आणि पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाचे आरोपी कर्नल पुरोहित आणि आपटे यांनी मोहन भागवत आणि इंद्रेश यांच्यावर केला होता. याचे उत्तर संघाने द्यावी, अशी मागणीही केली.

दिग्गीराजा, नोटबंदीचा पूर्ण फियास्को झाला आहे, हे कोंबडं आता आरवून आरवूनही थकलं आहे. पण, अतिशय अविश्वसनीय दावे करून, लोकांना नोटबंदीच्या जाचक अनावश्यक उपक्रमात ढकलून, त्यांचे शिव्याशाप घेऊनही मोदींनाच लोक का निवडून देत आहेत, यावर तुम्ही विचार करणं अधिक श्रेयस्कर राहणार नाही का? उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार न देणारे मोदी आणि आयसिसच्या दहशतवाद्याच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायलाही नकार दिलेला असताना, कसलीही माहिती न घेता त्याच्या बाजूने शड्डू ठोकून उतरणारे तुमच्या पक्षासारखे पक्ष यांच्यात गुणात्मक फरक काय?

…………………………….…………………………….…………………………….

२. २२७ सदस्य असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये १७१ इतकी भरघोस मते पडून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौर झाले. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असताना त्यांना १७१  सदस्यांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या ८२ नगरसेवकांनी त्यांना मत दिले. भाजपचे भगवे फेटे घातलेले नगरसेवक इतके उत्साहात होते की, महाडेश्वर यांचा सत्कार सुरू असताना नगरसेवकांनी ‘मोदी मोदी’ असा जयघोष सुरू केला.

‘मान न मान मै तेरा मेहमान’, या म्हणीचा अर्थ आता शिवसेनेला कळू लागेल. शिवसेनेचा महापौर भाजपच्या 'दिलखुलास' मेहेरबानीवर झाला आहे आणि त्याची वाटचाल ही भाजपच्या अदृश्य वेसणीने निश्चित केली जाणार आहे, हेच मोदींच्या जयघोषातून स्पष्ट झालेलं आहे. आपलं संख्याबळ घटलेलं असताना बलाढ्य 'मित्रा'समोर शक्तिप्रदर्शन करायला जाण्याचा अगोचरपणा शिवसेनेने केला खरा; पण, पुढे काय वाढून ठेवलंय याची चुणूक त्यांना आता मिळाली असेल. त्यातून ते काहीच शिकणार नाहीत, हा भाग अलाहिदा.

…………………………….…………………………….…………………………….

३. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केलं, परंतु त्यांना गरिबांचे दुःख काही कमी करता आलं नाही; गरीब हे गरीबच राहिले. भारतीय जनता पक्षाने गरिबांच्या घरोघर जाऊन बँक खाती काढून गरिबांचं खरोखरचं कल्याण केलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बरोबरच आहे पंतप्रधानांचं. इंदिरा गांधींनी फक्त राष्ट्रीयीकरण केलं, त्याने काय होतं. भाईयो और बहनों, आधार कार्ड कुणी आणलं? मोदींनी आणलं. जनधन खात्यांची कल्पना कुणाची? मोदींची. नोटाबंदीतून गरिबांचा फायदा झाला, असं कुणाला वाटतं? मोदींना वाटतं. सगळी खाती काढली कोणी? मोदींनी. सगळ्या खात्यात १५-१५ लाख रुपये भरले कोणी? मोदींनी. रोजगार नसलेला आणि कॅशलेस व्यवहार करू न शकणारा गरीब वर्गच नामशेष कोण करून दाखवणार? मोदी. गरिबांना हटवल्याशिवाय गरिबी हटणार नाही, हा क्रांतिकारक विचार सुचला कुणाला? मोदींना. बोला, मोदी, मोदी, मोदी.

…………………………….…………………………….…………………………….

४. बाबरी मशीद खटल्याबाबत मला कोणतीही माहिती मिळालेली नाही. फक्त वर्तमानपत्रात कुठेतरी मी याविषयी थोडेसे वाचलं होतं, असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बाबरीपतनाच्या खटल्यातले एक आरोपी लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.

तुमचं वय आणि सोय लक्षात घेता तुम्हाला बाबरी मशीद आठवते आहे, हेच फार मोठं आश्चर्य आहे. तुम्ही तिला बाबरी मशीद म्हणूनच ओळखता, हे तर त्याहून आश्चर्यजनक आहे. या खटल्यातून तुमची फार सहज सुटका झाली; आता तुम्हाला अडचणीत आणणारी काही वळणं हा खटला घेतो आहे. लवकरच स्मरणशक्तीला ताण द्यावा लागण्याची वेळ येणार आहे, असं काही त्याच वर्तमानपत्रांतल्या राशीभविष्यात लिहिलंय का हे तपासून घेतलंत तर बरं.

…………………………….…………………………….…………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......