टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • देवेंद्र फडणवीस, रामदास कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, नरेंद्र मोदी, किरेन रिजीजू आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Mon , 06 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi किरेन रिजीजू Kiren Rijiju राधाकृष्ण विखे-पाटील Radhakrishna Vikhe-Patil रामदास कदम Ramdas Kadam देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तोडीसतोड नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपने महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचे पहारेकरी म्हणून भाजपचे नगरसेवक काम करतील, असे सांगत पालिकेच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती राहिल, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकआयुक्त नेमण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.

आई भवानीच्या कृपेने, एकवीरा आईच्या चमत्काराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मुंबईच्या रयतेवर घोंघावणारं अफझुलखानी संकट आता टळलं आहे. अस्मानात दाटलेले काळोखाचे मेघ पांगले आहेत. शाहिस्तेखानाने जेमतेम नखंच छाटलेल्या बोटांनी मर्दमावळ्यांच्या भव्य कपाळांवर सत्तेचा टिळा गोंदला आहे… आता आई जगदंबेच्या इच्छेनुसार मुंबापुरीत सुराज्याचा, सुसाशनाचा आणि कसल्या तरी सुसुचा (तिय्या जमत नाही ना ऐनवेळी) पाळणा हलल्याशिवाय राहणार नाही… (बाळ पंचवीसेक वर्षं पाळण्यातच आहे…) …थोडक्यात काय, नाटक कंपनीचा मुक्काम अजून थोडे दिवस वाढला आहे…

……………………………………………………………………

२. महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असत असे म्हटले जात होते. आता ‘हे राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत’, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर आम्ही राजीनामा देण्यासाठी केव्हाही तयार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले.

कदमसाहेब, महत्त्वाचे कागद असे बाजूला ठेवून देऊ नका. ते उडून जातात. मग ऐनवेळी तुम्हाला ते मिळणार नाहीत आणि उधोजीराजे आदेश देतील तेव्हा ऐनवेळी ते सापडायचे नाहीत. राजीनामे देता यायचे नाहीत. मग उधोजीराजेंच्या शब्दाला, आदेशाला काय किंमत राहील… बाय द वे, राजीनाम्यांच्या कागदांवर काही मजकूर नाही, तुमच्या सह्याही नाहीत, नुसते कोरे कागदच आहेत, हे उधोजीराजांना माहिती नाही ना? की त्यांनीच ही ट्रिक सांगितली आहे?

……………………………………………………………………

३. भाजप आणि शिवसेना यांनी महापौरपदाची मॅच सुरू होण्याआधीच फिक्स केल्यानंतर काँग्रेसचा तीळपापड झाला असून या दोन पक्षांनी मार्चमध्येच जनतेला एप्रिल फूल केले आहे, अशी विखारी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचे अंडं देणारी कोंबडी आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मुंबईबद्दलची समजूत काय आहे, हे मुंबईकरांना माहिती नसेल का? हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येणार, हे मुंबईकरांना कळलं नसेल का? तरीही ते तुम्हाला अजिबात जवळ करत नाहीत, याच दोन नादानांच्या हाती सत्ता सोपवतात, याचा अर्थ आपण त्यांच्यापेक्षा अधिक नादान ठरलो आहोत, हे तुम्ही कधी ओळखणार? फूल्स पॅरॅडाइझमधून बाहेर कधी येणार? मुंबईत येणारा प्रत्येक माणूस आणि इथे राज्य करणारा प्रत्येक पक्ष मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मानतो, हेच तिचं दुर्भाग्य आहे; त्याला शिवसेनेचा अपवाद कसा असेल?

……………………………………………………………………

४. या देशामध्ये पंतप्रधानांना शिव्या दिल्या जातात, तरीही कारवाई केली जात नाही. यापेक्षा किती स्वातंत्र्य हवे, असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी उपस्थित केला. ‘स्वातंत्र्याच्या घोषणा १९४७च्या आधी चांगल्या वाटायच्या. आता भारत स्वतंत्र आहे. मात्र आता तरीही काही लोकांना भारतापासून स्वातंत्र्य हवे आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल विचारायला हवे,’ असे रिजीजू यांनी म्हटले.

किरणभाऊ, आपल्या विद्यमान पंतप्रधानांना आणि त्यांच्या मंत्र्यांना सगळ्या विश्वाची सुरुवात त्यांच्या सत्ताग्रहणापासूनच झाली आहे, असं वाटतं. पण, देश स्वतंत्र झाल्यापासून (म्हणजे १९४७पासून- २०१४ नव्हे) देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घातल्या जात आहेत, त्यात कोणाचाही अपवाद झाला नसावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर तर अपशब्दांचा भडिमार झाला होता. तेव्हाही कोणावर कारवाई झाली नव्हती. शिवाय ही व्यवस्था भारतीय राज्यघटनेने करून ठेवलेली आहे, त्यात तुमचा काही मोठेपणाही नाही आणि कर्तबगारीही नाही.

……………………………………………………………………

५. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. ओबामांनी माझे फोन टॅप केले होते, असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असून या आरोपांनी जगभर खळबळ उडवून दिली आहे.

ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या शक्यतेने अमेरिकेलाच नव्हे तर सगळ्या जगाला भविष्यात केवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे ओबामा यांनी वेळीच ओळखलं होतं म्हणायचं. अमेरिकेचा शत्रू नंबर वन असलेल्या रशियाशी वेगवेगळ्या पातळ्यांवरचे नाजुक स्नेहसंबंध आणि हितसंबंध असलेल्या ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवली नसती, तरच ओबामा यांच्या राजकीय आकलनाबद्दल शंका निर्माण झाली असती.

……………………………………………………………………

६. महाराष्ट्रात पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्याचा दाखला देतच भविष्यात पुरातत्व विभागाला काँग्रेस पक्ष शोधण्याचे काम करावे लागेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात प्रचारसभेत लगावला.

अहो, काँग्रेसच्या राहण्या-न राहण्याने कुणालाच फरक पडत नाही. पुरातत्त्व विभागही इतक्या मृतप्राय गोष्टींचा शोध घेत नाही. त्यांनी खरंतर तुम्ही मारलेल्या मगरीची हाडं, तुम्ही जिच्यातून चहा विकायचात ती किटली, तुमचा तो सुप्रसिद्ध झाडू, तुमची तेवढीच सुप्रसिद्ध पदवी आणि तिच्यासाठी केलेल्या अभ्यासाची पुस्तकं अशा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या वस्तूंचा शोध घ्यायला हवा, नाही का?

……………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......