आपली, समाजाची, मुस्लीम महिलांची शोकांतिका आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • या लेखातील सर्व छायाचित्रं ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातील आहेत
  • Sat , 04 March 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar लिपस्टिक अंडर माय बुरखा Lipstick Under My Burkha अलंक्रीता श्रीवास्तव Alankrita Shrivastava प्रकाश झा Prakash Jha मुस्लीम महिला Muslim women

भारतामध्ये सर्वांत शोषित घटक कोणते असा प्रश्न विचारला की दलित, आदिवासी, भटक्या जमाती असे अनेक समाजघटक डोळ्यांसमोर उत्तर म्हणून येतात. यात अजून एक घटक आहे. तो म्हणजे मुस्लीम स्त्रिया. यावर काही लोक फक्त मुस्लीम स्त्रियाच का? बाकीच्या जाती-धर्मातल्या स्त्रिया का नाहीत किंवा एकूणच स्त्री वर्ग शोषितांच्या यादीत का नाही असे प्रश्न विचारू शकतात. हिंदू धर्मात शाहू-आंबेडकर-फुले यांच्या प्रेरणेनं (आजकाल अतिउजव्या वर्गात यांची रेवडी उडवण्याची परंपरा आहे!) स्त्री जागृतीचं प्रमाण बरंच आहे. दलित समाजातून अनेक स्त्रिया हिरीरीनं शिक्षण घेऊन, स्वावलंबी बनून स्वतःच्या परिवाराच्या आणि समाजाच्या भल्यासाठी योगदान देताना दिसतात. पण एकूणच आपल्या समाजात जी सामाजिक-राजकीय आणि आर्थिक घुसळण चालू असते, त्यात मुस्लीम स्त्रिया क्वचितच दिसतात किंवा दिसतच नाहीत. बॉलिवुडसारखे काही मोजके अपवाद वगळले तर मुस्लीम स्त्रिया कुठे दिसतात? असं कुठलं क्षेत्र आहे, जिथं भारतीय मुस्लीम महिलांनी आपला ठसा उमटवला आहे? दुर्दैवानं या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक आहेत.

अनेकदा भारतीय राजकारण्यांवर अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्याचा आरोप केला जातो. पण हे लांगुलचालन फक्त पुरुष वर्गासाठी असतं. सत्ताधारी वर्ग असो वा विरोधी पक्ष असो, कुणालाच मुस्लीम महिलांसमोर असणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार, निरक्षरता, कायद्याकडून न मिळणारं संरक्षण, अन्यायकारक तलाक प्रथा अशा प्रश्नांवर बोलण्यात रस नसतो. एक समाज म्हणून आपण कोट्यवधी भारतीय मुस्लीम महिलांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे, ही समाज म्हणून आपली शोकांतिका आहे. मुस्लीम कट्टरतावाद्यांचा दबाव एवढा जबरदस्त आहे की, इस्लामविरोधी असणाऱ्या कलाकृतींनाही त्याचा फटका सहन करावा लागतो. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या निमित्तानं हे सगळे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा प्रकाश झा निर्मित चित्रपट छोट्या शहरात राहणाऱ्या चार स्त्रियांची कहाणी सांगतो. कॉलेजमध्ये बुरखा घालून जावं लागणारी तरुण मुलगी, एक ब्युटी पार्लर चालवणारी महिला, तीन मुलांची आई आणि एक वय झालेली स्त्री, अशा चार वेगवेगळ्या वयोगटातून आणि आर्थिक गटातून आलेल्या चार मुस्लीम स्त्रियांची ही गोष्ट आहे. या चित्रपटात   आपली लैंगिकता, असुरक्षितता, स्त्री म्हणून झेलावे लागणारे सामाजिक टॅबू  या सगळ्यांना तोंड देऊन या स्त्रियांच्या होणाऱ्या आत्मशोधाचा प्रवास दाखवला आहे.  चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रीता श्रीवास्तव आहे. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकला आहे. मुंबई फिल्म फेस्टिवल आणि टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला पुरस्कारही मिळाले आहेत.

पण चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची वेळ आली आणि रंग पालटला. त्याच्या शीर्षकातल्या ‘बुरखा’ या शब्दानंच वादाला तोंड फुटलं. अनेक मुस्लीम धर्मगुरूंनी आणि संघटनांनी ही आमच्या धर्मात ढवळाढवळ आहे असा ओरडा सुरू केला. आजकाल सगळ्यांचा आवडता ‘तुम्ही त्यांना का नाही सांगत पहिले’टाईप युक्तिवादही झालाच. इथं ‘तुम्ही’ म्हणजे पडदा/घुंघट परंपरा पाळणारे हिंदू. मजलिस-ए-शूरा या मुस्लीम धर्मगुरूंच्या संघटनेनं देशातल्या वीस कोटी मुस्लिमांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकावा असं आव्हान करणारा ठराव मंजूर केला. काही सुधारक मुस्लीम आवाजांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण अतिअल्पसंख्य असणारे ते आवाज विरून गेले.

पण निर्माता-दिग्दर्शकांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो सेन्सॉर बोर्डाकडून. बोर्डानं या चित्रपटाला प्रेक्षकांसाठीचं प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यासाठीची दिली कारणं विनोदी आहेत. त्यांच्या मते यात भडक लैंगिकतेचं दर्शन आहे आणि शिवीगाळ आहे. शेवटी समाजातल्या एका भागाच्या नाजूक भावना दुखावतात हा टेकू आहेच. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी हे पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. ते स्वतःला भारतीय संस्कृतीचे संरक्षक मानतात. त्यातून त्यांनी जेम्स बॉन्डच्या चित्रपटातलं चुंबन दृश्य काही सेकंदांनी कमी करणं किंवा ‘जंगल बुक’ या लहान मुलांसाठीच्या चित्रपटातील प्रसंगांना कात्री लावणं, असे विनोदी प्रकार केले आहेत. ‘क्या कुल है हम- भाग दोन’ आणि ‘बेफिक्रे’सारख्या बोल्ड दृश्यांचा भडिमार असणाऱ्या चित्रपटांना मात्र त्यांनी सहज क्लीन चिट दिल्या. मात्र ‘उडता पंजाब’सारख्या एका ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

हे निहलानी साहेब म्हणाले की, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारखे चित्रपट समाजावर वाईट परिणाम करतात. वर त्यांनी अशीही मखलाशी केली की, असल्या चित्रपटांना फक्त फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळतात, एरवी थिएटरमध्ये असले चित्रपट बघायला कुणी येत नाही. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’बाबतीत मुस्लीम धर्मगुरू आणि निहलानी यांच्या मतांमध्ये जे साम्य आहे, ते मुळीच आश्चर्यकारक नाही. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असले तरी कर्मठता हा दोघांचाही स्थायीभाव आहे. आणि सामान्यतः दोन्ही बाजूचे धर्मरक्षक एकमेकांना सांभाळूनच घेत असतात! पण त्यांच्या मागास मतांमुळे एका कलाकृतीचा बळी जात आहे, हे त्यांच्या गावीही नाही. चित्रपटात काय चांगलं, काय वाईट आहे, ते प्रेक्षकांना ठरवू द्या ना. प्रत्येक ठिकाणी धार्मिक आणि राजकीय एजंट आडवे येणं आवश्यक आहे का?

अनुराग कश्यप आणि जावेद अख्तरसारख्या तुरळक लोकांनी या मोगलाईविरुद्ध आवाज उठवला. पण हे दुर्मीळ लोक. बहुसंख्य लोकांनी दहशतीमुळे गप्प बसणं पसंत केलं. शाहरूख खानला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’बद्दल प्रश्न विचारला असता त्याने सफाईनं तो प्रश्न चुकवला. मुस्लीम समाजातल्या प्रभावी लोकांनी या मुद्द्यावरून चित्रपटाची पाठराखण करणं अपेक्षित होतं, पण एरवी आभाळाखाली घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर भूमिका घेणारे सेलिब्रिटी दडी मारून बसले आहेत.

मुस्लीम महिलांवर भारतीय व्यवस्थेत होणारा अन्याय जुना आहे. शहाबानो प्रकरण हा आपल्या व्यवस्थेनं मुस्लीम महिलांना दिलेला जणू सांगावाच होता की, ‘बायांनो तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार न करता निमूटपणे जगा. परिस्थिती अशीच राहणार आहे.’ शाहबानो प्रकरणाला किमान एक सोनेरी किनार होती. आरिफ मोहम्मद खानसारख्या सुधारक मुस्लीम राजकारण्यानं राजीव गांधींच्या मुस्लीम महिलांना शतकभर मागे फेकणाऱ्या या निर्णयाचा निषेध म्हणून खासदारकीचा राजीनामा दिला होता. आज ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’च्या मागे उभं राहणारा एकही आरिफ मोहम्मद खान राजकीय पटलावर दिसत नाही, ही आपली समाज म्हणून शोकांतिका तर आहेच, पण मुस्लीम महिलांचीही शोकांतिका आहे. 

 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

Prashant Kadam

Sat , 04 March 2017

मुस्लिम महिलांची अवस्था खरोखरच शोचणीय आहे. किमान धार्मिक मुद्यांवरून इतर कोणत्याही समाजात महिलांवर इतकी बंधने लादलेली नाहीत. मुस्लिम समाजातून यावर बोलताना कोणीही दिसून येत नाही हि फार गंभीर बाब आहे. मुस्लिम महिला देखील शिक्षणाच्या अभावामुळे व प्रचंड धार्मिक पगडा असल्यामुळे यावर बोलत नाहीत. शाहरूख व आमिर सारखे नट वेळोवेळी येरव्ही मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायावर व इतर धर्मीयांच्या आस्थांवर भाष्य करतांना दिसून येतात. परंतू या मुद्यांवर मुग गिळून गप्प असलेले पाहून आश्चर्य वाटते. आपण फार छान मुद्दे उपस्थित केले आहेत. किमान यावरून तरी शाहरूख व आमिर सारख्यांच्या दुटप्पीपणाला का विरोध होतो ते समजून येईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......