टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चित्र - श्रीनिवास आगवणे
  • Fri , 24 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shiv Sena विराट कोहली Virat Kohli डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. शिवसेना ही योद्धाप्रमाणे लढली. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. परिणामांची पर्वा न करता ही लढाई सुरूच राहील. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला असून आम्ही परिणामांची पर्वा करत नाही. हा लढा फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म, विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच आहे.

साक्षात शिवछत्रपतींच्या काळातल्या कागदपत्रांची छाननी केली, तरी असली बंडल चेवाची भाषा त्यांत आढळणार नाही. निखारे काय, झेंडा निसटू दिला नाही काय, घाव काय, अस्मिता काय? ही मंडळी सकाळी दात घासतात तीही ज्वलंत विचारांनीच घासत असावीत, अशी शंका येते. एवढ्या राणा भीमदेवी गर्जना केल्यानंतर ही म्याँव कमळाच्या डिझाइनच्या ताटलीतून ऊन ऊन दूध पिणार नाही, याची गॅरंटी काय?

………………………………….

२. सहा मजली झोपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वांद्रे पूर्वच्या मुस्लिमबहुल बेहरामपाड्यात शिवसेनेने एमआयएमकडून आयात केलेल्या उमेदवाराला पालिका निवडणुकांसाठी तिकीट देऊन या विभागात शिरकाव केला आणि ती खेळी यशस्वी झाली. बेहरामपाड्यात भगवा फडकला.

भारतीय मन केवढं उदार, विशाल आणि क्षमाशील आहे हो! दंगलीच्या काळात या बेहरामपाड्याविषयी इतकी आग ओकण्यात आली होती की, विजय तेंडुलकरांच्या 'रामप्रहर' या स्तंभाला 'बेहरामप्रहर' म्हणून हिणवलं गेलं होतं. मुंबईत जरा कुठे खुट्ट झालं की, मुखपत्रात बेहरामपाड्याचा उद्धार व्हायचा. त्याच पाड्यातले सगळे तथाकथित 'दहशतवादी' सत्तेसाठी रातोरात 'राष्ट्रीय मुसलमान' बनलेले दिसतात. गंमत म्हणजे त्यांनीही हा इतिहास मागे टाकून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून भाजपला नाकारण्यासाठी शिवसेना स्वीकारली. सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असतं ते असं.

………………………………….

३. हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी ‘गेट आऊट ऑफ माय कंट्री’ (माझ्या देशातून चालता हो!) असे ओरडत होता. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

ट्रम्प तात्यांच्या प्रत्येक मूर्ख विधानाला आणि कृतीला चेकाळून प्रतिसाद देणाऱ्यांना आता तरी भानावर यायला हरकत नाही. तात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना टिपण्याचा आनंद लुटताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तात्या त्याच बंदुकीने भारतीयांनाही टिपणार आहेच. त्यांच्या तुघलकी फर्मानांनी आधीच तीन लाखांहून अधिक भारतीयांवर हकालपट्टीची टांगती तलवार लटकली आहे. या जाणीवेने किमान तिकडच्या शासनप्रणीत उन्मादाची एतद्देशीय आवृत्ती काढण्यापासून वाचलो तरी पुष्कळ.

………………………………….

४. आपल्याकडून कमी वयात जास्त अपेक्षा केल्या गेल्या. भारतात क्रिकेट हा धर्म असल्याने प्रेक्षकांकडे संयम नसतो. मी जेव्हा अवघ्या २२ वर्षांचा होतो, तेव्हा माझ्याकडून ३५ वर्षीय खेळाडूच्या प्रगल्भतेच्या अपेक्षा केल्या गेल्या. पण मला माझ्या खेळावर आत्मविश्वास आहे. :  विराट कोहली

मित्रा, चूक प्रेक्षकांची नाही. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे त्यापेक्षाही कमी वयाचे पाहिले आहेत. ते खेळातही अव्वल होते आणि मैदानातल्या, मैदानाबाहेरच्या वर्तनातही प्रगल्भ आणि सुसंस्कृत होते. क्रिकेट हा या देशाचा धर्म आहे, म्हणूनच आपण यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत- एकदा धर्म स्वीकारला की यमनियमही स्वीकारायला लागतातच. त्याबाबतीत सोयीसोयीचं पाहून कसं चालेल?

………………………………….

५. बिहारमध्ये दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले. आंतरराज्य टोळीतील पाच कुख्यात दरोडेखोरांना मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे पकडण्यात आले.

इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना विचाराल तर ते सांगतील, हा मनुष्य इंजीनियर असूच शकत नाही. इंजीनियरिंगच्या अभ्यासात इतका वेळ आणि इतकी शक्ती जाते की एक प्रेयसीही सांभाळताना अवघड. त्यात याने दोन प्रेयसींना सांभाळून त्यांचे लाडकोड केले असतील, तर तो इंजीनियर असूच शकत नाही, सुपरमॅनच असायला हवा, असं ते म्हणतील. आता ही बातमी बाहेर आल्यानंतर पोलिसांआधी त्या दोघी मिळून सुपरमॅनचा पाचोळामॅन करून टाकतील, यात शंका नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......