शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन...
संकीर्ण - पुनर्वाचन
हेमंत कर्णिक
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 16 November 2021
  • संकीर्ण पुनर्वाचन शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं काल पुण्यात वयाच्या ९९व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. २०१५ साली बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं लिहिलेला हा लेख लेखकाच्या संमतीन इथं पुनर्मुद्रित स्वरूपात...

.................................................................................................................................................................

बाबासाहेब पुरंदर्‍यांशी माझी ओळख पु. ल. देशपांड्यांनी करून दिली. ‘गणगोत’मधून. पुलंच्या ‘गणगोत’मध्ये बाबासाहेबांचं व्यक्‍तिचित्र आहे. वाचून अनेक वर्षं लोटली; पण दिनेश, ऋग्वेदी, रावसाहेब ही व्यक्‍तिचित्रं नीट आठवतात. तसंच बाबासाहेब. ते वाचून मला कळलं, बळवंत मोरेश्वर पुरंदरे तरुणपणातच ‘बाबासाहेब’ झाले, वयपरत्वे नाही.

त्या वेळी दादरच्या ‘अमर हिंद मंडळा’त ‘वसंत व्याख्यानमाला’ होत असे. तिथं केव्हा तरी बाबासाहेबांना शिवाजीवर बोलताना ऐकलं. इम्प्रेस झालो. मग त्यांची शिवचरित्राची व्याख्यानं ऐकणं भाग होतं. दहाएक व्याख्यानं ओळीत असत. सगळी ऐकली. एकापेक्षा जास्त वेळा ऐकली. शिवाजी माझ्या प्रेमाचा विषय. (अजून आहे.) बाबासाहेब ज्या रसाळ शैलीत धडाधड तारखा, नावं आणि स्थळं यांचे तपशील फेकत; त्याचं अपार कौतुक वाटे. त्यांच्या तोंडून शिवाजी ऐकताना अंगावर रोमांच उठत. आपल्यातला एक जण उठतो आणि स्वराज्याची स्वप्नवत्‌ संकल्पना नुसती मांडत नाही; तर प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा जागवतो; कसं झालं असेल शिवाजीच्या सोबत्यांना; तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी यांसारखे लोक कसे स्वतःच्या जिवावर उदार झाले असतील; याचं चित्र माझ्या मनात रंगू लागे. शिवाजीचा भक्‍त मी होतोच, बाबासाहेबांबद्दलही प्रेम निर्माण झालं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मग ‘राजा शिवछत्रपति’ विकत घेणं भागच झालं. चांगले हार्ड बाउंड दोन जाडजूड खंड. त्यांची पारायणं केली. शिवाजीचं चरित्र मला पाठ झालं. शाळकरी वय, पौगंडावस्था ओलांडली तरी शिवाजीबद्दल वाचत राहिलो. जे वाचायला मिळालं, त्यातून या राजाबद्दल आदर वाढत गेला. त्याच्या लढाया, त्याचे डावपेच, त्याचा मुत्सद्दीपणा, त्याची दूरदृष्टी, त्याची न्यायबुद्धी, त्याचा मनसबदारीला असलेला विरोध, प्रजेच्या हितासाठी त्याने वेळोवेळी प्रसृत केलेले आदेश...

माझ्या मुलखात शिवाजीसारखा एक लोकनेता होऊन गेला, याचा मला प्रचंड अभिमान वाटत असे. नंतर कितीतरी वर्षं कुणी अमराठी भेटला, गप्पा झाल्या की, मी त्याला शिवाजीचं अचाट कर्तृत्व सांगण्याचा प्रयत्न करत असे. पुढे देशभर कुठे कुठे हिंडताना शोध लागला की, शिवाजी आणि आंबेडकर, या दोन मराठी माणसांचे पुतळे भारतभरच्या गावागावात आहेत. सारा देश त्यांना ओळखतो.

शिवाजीचं नाव ठाउक नाही, तो मराठीच नव्हे. पण मला शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन. अर्थात मी शिवाजीची भजनं गात समाधान पावणार्‍यातला नव्हतो. एक शिवाजी घेऊन बसायचं आणि त्याचा उदो उदो करायचा; तर तसं कालच्या-आजच्या कुणाही गावगुंडाबद्दल करता येईल! महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या इतर थोर व्यक्‍तींची माहिती करून घेऊन मग त्यांच्या संदर्भात शिवाजी किती, कसा थोर, हे ठरवलं पाहिजे. नाही तर मी म्हणणार, शिवाजी थोर; समोरचा म्हणणार, अलेक्झांडर थोर. किंवा हनिबाल थोर. किंवा रोमेल थोर. मला ते नाव माहीत नाही, त्याला शिवाजी माहीत नाही. हा वाद नाही आणि संवादही नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वाचन वाढत गेलं, तसे बाबासाहेब मात्र दूर होत गेले. त्यांचं काही काही खटकू लागलं. उदाहरणार्थ, ‘राजा शिवछत्रपति’ची सुरुवात होते राम दंडकारण्यात येतो, तिथपासून. तिथेच ते एक प्रकारे ‘ही शाहिरी आहे, हा इतिहास नव्हे,’ असं बजावतात. पुढे प्रकरण येतं, ‘साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. देवगिरीच्या यादवांचा पराभव करून अगोदर अल्लाउद्दिन खिलजी आणि नंतर त्याचा सेनापती मलिक कफूर यांनी दक्षिणेत मुसलमानी सत्ता स्थापन केली, तिथून सुरू होते ही ‘साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. तोपर्यंत इतिहास म्हणजे लढाया व राजघराणी नव्हे आणि राजाचा धर्म काय, यावरून प्रजेचं सुखदुःख ठरत नाही, हे समजण्याइतकी अक्कल मला आली होती. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं यांचा छळ वाईट म्हणायचा आणि ज्या काळात तो छळ झाला, ते यादवराज्य चांगलं म्हणायचं, यातला विरोध मला जाणवू लागला होता. मी शिवाजीचा भक्‍त होतो म्हणून शिवाजीची हरेक गोष्ट मला थोर वाटत होती, असं नव्हतं. शिवाजी जरा अतीच थोर होता म्हणून तो मला इतका प्रिय झाला. बाबासाहेबांची शाहिरी पुढच्या वयात मला भावेनाशी झाली. जसं ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे रहायचे थांबले, तसंच.

ते असो. स्वतः बाबासाहेबांनी कधी स्वतःला इतिहासकार म्हटलं नाही. त्यांची प्रसिद्धी ‘शिवशाहीर’ म्हणून. आता शाहीर पोवाडेच गाणार! तसंच बाबासाहेब शिवाजीचे पोवाडे गात. त्यांची स्टेजवर हत्तीघोडे नाचवणारी ‘जाणता राजा’ नावाची सर्कस बघण्याची इच्छा मला झाली नाही. पुढे त्यांनी कोल्हापूरजवळ ‘शिवकाल’ जिवंत करायचा महाप्रकल्प जाहीर केला. तिथं शिवकालीन समाजजीवन प्रत्यक्ष बघायला मिळणार होतं. शालिनीताई पाटीलही त्या प्रकल्पाशी संबंधित होत्या. त्याचं पुढे काहीच झालं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्याकडे बहुतेक पुरस्कार हे उतारवयात एकूण कारकिर्दीचा गौरव म्हणून दिले जातात. त्यांना विशिष्ट फोकस असा नसतो. राजकीय गणितं मात्र असू शकतात. ‘महाराष्ट्रभूषण’सुद्धा याला अपवाद नाही. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान देऊन महाराष्ट्र सरकारने काही वावगं, विसंगत केलं असं मला मुळीच वाटत नाही. उलट, या संधीचा लाभ घेऊन मी त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करतो.

..................................................................................................................................................................

लेखक हेमंत कर्णिक ‘अक्षर’ या दिवाळी अंकाचे एक संपादक आणि स्तंभलेखक आहेत.

hemant.karnik@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......