टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रावसाहेब दानवे, उदयन राजे भोसले, शक्तिकांत दास आणि मनोहर जोशी
  • Thu , 23 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रावसाहेब दानवे Raosaheb Danve उदयन राजे भोसले Udayanraje Bhosale शक्तिकांत दास Shaktikanta Das मनोहर जोशी Manohar Joshi

१. मुंबईसह राज्यातील सहा महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येईल. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. मुंबईत कदाचित थोडाफार फरक पडू शकतो. तशी वेळ आल्यास शिवसेनेनेच भाजपला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा. युती ही शिवसेनेने तोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास टाळीसाठी शिवसेनेनेच हात पुढे करावा. शिवसेना भाजपमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

रावसाहेब, वैचारिक मतभेद असण्यासाठी आधी येनकेनप्रकारेण सत्ता मिळवण्याच्या हव्यासापलीकडे काही विचार असायला हवा असतो. तुम्हा दोघा पक्षांच्या विषारी प्रचारानंतर दोन्ही पक्षांवर तसा आरोप कोणीच करू धजणार नाही. शिवसेनेला मुंबईत सर्वाधिक जागा मिळाल्या तरी महापौर भाजपचाच होणार अशा थाटात तुम्ही त्यांच्याकडूनच युतीसाठी पुढाकाराची अपेक्षा ठेवताय, हे तर जामच भारी आहे.

…………………………………………………………

२. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी

निवडणुकीआधी कुणीही कुणावरही कितीही निरर्गल टीका करू शकतं, निवडणुकीआधी कुणीही कुणावरही कितीही गंभीर आरोप करू शकतं, निवडणुकीआधी कुणीही कुणाचंही कितीही चारित्र्यहनन करू शकतं आणि निवडणुकीआधी आपण काय बरळत होतो, याची भीडभाड न ठेवता निवडणुकीनंतर कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं आणि तोंड वर करून त्याचं समर्थनही करू शकतं, हे आता आम्हाला पाठ झालंय पंत.

…………………………………………………………

३. जावळीच्या खुर्शीमुरा गावातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आली होती. वसंत मानकुमरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला होता. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

राजे, भूतकाळाच्या गडावरून खाली उतरा. ज्यांनी बांगड्या भरलेल्या असतात, त्यांनीही तुम्ही म्हणता त्या अर्थाने आता बांगड्या भरलेल्या नाहीत. त्या दुबळ्या उरलेल्या नाहीत आणि नेभळटपणाचं प्रतीकही राहिलेल्या नाहीत. शिवाय कुणीतरी वेडगळ हल्ला चढवला की, आपण लगेच त्याला नेस्तनाबूत करायला धावायचं, याला आजकाल सरसकट शौर्यही गणलं जात नाही. तेव्हा, (हे तुम्हाला सांगून काहीच उपयोग नसतो, तरीही) सबूर!

…………………………………………………………

४. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात चिनी कोबीची लागवड यशस्वी झाली असून त्या कोबीला चांगली पानेही आली आहेत, असे नासाने म्हटले आहे. अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी अजून कोबीचे सेवन केलेले नाही. चिनी प्रकारातील टोकियो बेकाना नावाची ही कोबीची प्रजाती असून ती अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी वाढवली आहे. थोडी कोबी खाण्यासाठी वापरली जाणार असून बाकीची नासाच्या केनेडी अवकाश केंद्रात अभ्यासासाठी परत पाठवली जाणार आहे. अवकाश स्थानकात वाढवलेले हे पाचवे पीक आहे.

कोबी चिनी आहे म्हटल्यावर निर्वात पोकळीतही तो वाढेल, यात शंका नाही. शिवाय तो अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर मागवून विकला तरी सर्व खर्च जोडूनही तो भारतातल्या फेरीवाल्यांकडे भारतीय कोबीपेक्षा स्वस्त दरातच मिळेल, यातही काही शंका नाही.

…………………………………………………………

५. नोटाबंदीनंतर निर्माण झालेला अभूतपूर्व चलनताप आता कुठे कमी होत असतानाच ‘गरज असेल तरच एटीएममधून लोकांनी पैसे काढावेत. काही जण गरजेपेक्षा जास्त पैसे एटीएममधून काढतात. त्यामुळे इतरांना पैसे मिळत नाहीत. असे होऊ नये यासाठी लोकांनी उगाचच पैसे काढू नयेत,’ असे आवाहन केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी केले आहे.

दासबाबू, खातं आमचं, पैसे आमचे, काढणार आम्ही; किती काढायचे हे सांगणार तुम्ही? बहुत नाइन्साफी है. कोणाला किती पैशांची गरज आहे हेही तुम्हीच ठरवणार का? तुमच्या या उद्योगांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय आणि लोक मुळात बँकांमध्ये पैसेच ठेवायचे बंद होतील. तेव्हा, आवरा… स्वत:ला.

…………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......