इतकेच मला जाताना पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका प्रचाराने छळले होते!
संकीर्ण - व्यंगनामा
संकलित
  • या लेखातील सर्व छायाचित्रं सोशल मीडियावरून साभार घेतली आहे. संबंधितांचे मन:पूर्वक आभार
  • Wed , 22 February 2017
  • व्यंगनामा नगरपालिका नगरपंचायती Municipal council polls Municipal Corporation election भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शरद पवार Sharad Pawar

राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. तोवर हा शेलका साज पहा.

----------------------------------------------------------------------------------------

मतदान करून व्यवस्था बदलता आली असती 
तर व्यवस्थेने मतदानच करू दिले नसते...
...तरी पण, उम्मीद पे दुनिया कायम है।

- सत्यजित चव्हाण (फेसबुकवरून साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी काल मुंबईत, महालक्ष्मीला जिथं मतदान केलं, तिथं राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता, त्यामुळे पवारांनी मतदान केल्यापासून त्यांनी नेमकं कुणाला मतदान केलं, याविषयीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पवार अनेकांचं सॉफ्ट टार्गेट असल्यानं या चर्चेला काल दिवसभर चांगलाच जोर आला होता. आजच पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षांत पवारांनी काय कमावलं असेल तर हा असा संशय नि बेभरवसा.

पवारांनी मतदान तर केलंच आहे तेव्हा ते त्यांनी कुणाला केलं असेल याविषयी अनेकांनी तर्क लढवले गेले, त्यातील हा एक प्रातिनिधिक तर्क. हा तर्क इतरही अनेकांनी वर्तवला आहे. न जाणो पवारांच्या या खेळीनंही कुणाचा तरी तोटा होण्याची शक्यता अगदीच काही नाकारता येत नाही.

असो. पवारांनंतर पुढच्या छायाचित्राकडे काळजीपूर्वक वळू. हे छायाचित्र खरं की खोटं माहीत नाही. हे कुणी परस्पर तयार करून त्याची प्रिंट आऊट काढली असण्याची आणि ते कुठेतरी लावून त्याचं छायाचित्र काढलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यातून सूचित होणारा, ध्वनित होणारा इशारा मात्र खतरनाक आहे.

हा प्रकार तर वरच्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’च्या नावाशी मिळत्याजुळत्या कुणा स्वयंसेवी संस्थेनं ही जाहिरात सदहेतूने केली असली तरी त्यातली दमदाटी अगदी स्पष्ट आहे. ‘...नाहीतर परिणाम भोगावे लागतील’ असंच त्यातून सरळ सूचित केलं जात आहे.

ही पोस्ट काल दिवसभर व्हॉटसअॅपवरून फिरत होती. ज्याने कुणी ती तयार केली, त्याच्या कल्पनाशक्तीला सलामच करायला हवा. कारण या पोस्टमधील भावनेशी बहुतांशी मध्यमवर्गीय सहमत होतील.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......