इतकेच मला जाताना पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका प्रचाराने छळले होते!
संकीर्ण - व्यंगनामा
संकलित
  • या लेखातील सर्व छायाचित्रं सोशल मीडियावरून साभार घेतली आहे. संबंधितांचे मन:पूर्वक आभार
  • Wed , 22 February 2017
  • व्यंगनामा नगरपालिका नगरपंचायती Municipal council polls Municipal Corporation election भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शरद पवार Sharad Pawar

राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. तोवर हा शेलका साज पहा.

----------------------------------------------------------------------------------------

मतदान करून व्यवस्था बदलता आली असती 
तर व्यवस्थेने मतदानच करू दिले नसते...
...तरी पण, उम्मीद पे दुनिया कायम है।

- सत्यजित चव्हाण (फेसबुकवरून साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी काल मुंबईत, महालक्ष्मीला जिथं मतदान केलं, तिथं राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता, त्यामुळे पवारांनी मतदान केल्यापासून त्यांनी नेमकं कुणाला मतदान केलं, याविषयीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पवार अनेकांचं सॉफ्ट टार्गेट असल्यानं या चर्चेला काल दिवसभर चांगलाच जोर आला होता. आजच पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षांत पवारांनी काय कमावलं असेल तर हा असा संशय नि बेभरवसा.

पवारांनी मतदान तर केलंच आहे तेव्हा ते त्यांनी कुणाला केलं असेल याविषयी अनेकांनी तर्क लढवले गेले, त्यातील हा एक प्रातिनिधिक तर्क. हा तर्क इतरही अनेकांनी वर्तवला आहे. न जाणो पवारांच्या या खेळीनंही कुणाचा तरी तोटा होण्याची शक्यता अगदीच काही नाकारता येत नाही.

असो. पवारांनंतर पुढच्या छायाचित्राकडे काळजीपूर्वक वळू. हे छायाचित्र खरं की खोटं माहीत नाही. हे कुणी परस्पर तयार करून त्याची प्रिंट आऊट काढली असण्याची आणि ते कुठेतरी लावून त्याचं छायाचित्र काढलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यातून सूचित होणारा, ध्वनित होणारा इशारा मात्र खतरनाक आहे.

हा प्रकार तर वरच्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’च्या नावाशी मिळत्याजुळत्या कुणा स्वयंसेवी संस्थेनं ही जाहिरात सदहेतूने केली असली तरी त्यातली दमदाटी अगदी स्पष्ट आहे. ‘...नाहीतर परिणाम भोगावे लागतील’ असंच त्यातून सरळ सूचित केलं जात आहे.

ही पोस्ट काल दिवसभर व्हॉटसअॅपवरून फिरत होती. ज्याने कुणी ती तयार केली, त्याच्या कल्पनाशक्तीला सलामच करायला हवा. कारण या पोस्टमधील भावनेशी बहुतांशी मध्यमवर्गीय सहमत होतील.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......