टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामदेव बाबा, देवेंद्र फडणवीस, दिग्विजयसिंह आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Tue , 21 February 2017
  • विनोदनामा टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis दिग्विजयसिंह Digvijaya Singh रामदेव बाबा Ramdev Baba डोनाल्ड ट्रम्प Donald Trump शिवसेना Shiv Sena

१. नोटाबंदीच्या निर्णयात जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देणारे योगगुरू रामदेवबाबा यांनी आता दोन हजार रुपयाच्या नोटेला विरोध दर्शवला आहे. दोन हजाराची नोट अर्थव्यवस्थेला उपयुक्त नसून यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल अशी भीती रामदेवबाबा यांनी व्यक्त केली आहे.

बाबा देशभर फिरतात. वारा कोणत्या दिशेला वाहतोय, हे त्यांना बरोबर कळतं. वारा वाहील तशी पाठ फिरवण्यात ते कुशलही आहेत. शिवाय व्यावसायिक आहेत. आता टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, बिस्किटं, नूडल्स अशा अदभुत स्वदेशी उत्पादनांचा प्रसार केल्याबद्दल पतंजली उद्योगसमूहालाही पतंजली योगपीठाप्रमाणेच प्राप्तिकरमुक्ती वगैरे मिळाली, तर कदाचित दोन हजाराच्या नोटा सुटसुटीत ठरू शकतील.

………………………………………………….

२. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून ४०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला आहे. बिहार निवडणुकीच्या काळात अमित शहा आणि ओवेसी यांच्यात गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत ओवेसी यांना पैसे दिले गेले, असं दिग्विजय म्हणाले.

हे पाहा, शहा यांच्या पक्षाचा कारभार अतिशय पारदर्शक आहे. शहा यांनी पेटीएममार्फत किंवा ‘भिम’ अॅपमार्फत किंवा अन्य कोणत्या कॅशलेस मार्गाने पैसे दिले, त्याची नोंद दाखवल्याशिवाय दिग्गीराजांच्या आरोपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काळा पैसा हा शब्द ऐकला तरी सगळे भाजपेयी पांढरेफट्ट पडतात… काही कायमच तसे दिसतात, ते कशामुळे, असं वाटतं तुम्हाला?

………………………………………………….

३. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या संदर्भातील कागदपत्रे संबंधित यंत्रणांकडे दिल्यास उद्धव यांची चौकशी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय गंमत आहे पाहा. हे इकडे या फुसकुल्या सोडतायत; तिकडे यांचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष युती अभेद्य राहील असं सांगतायत. स्वत: मुख्यमंत्री निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पालिकेत युती होईल, असे संकेत देताहेत. म्हणजे उद्धव यांना क्लीनचिट देण्यासाठीच चौकशी करायची आहे का? की उगाच ब्लॅकमेलिंगचं एक हत्यार?

………………………………………………….

४. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील सभेत पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांवर सडकून टीका केली असून, आपण खोटय़ा बातम्यांचा अडथळा दूर सारून जनतेशी थेट बोलू इच्छितो, असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू आहेत, असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते.

लवकरच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर रेडिओच्या माइकसमोर बसलेल्या ट्रम्प यांचा फोटो आणि त्यांनी कशी भारतीय पंतप्रधानांची कार्यपद्धती आणि संवादपद्धतीही अवलंबली आहे, ते कसे मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत, याच्या कौतुकचालिसांची पारायणं सुरू होणार तर.

………………………………………………….

५. सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर अमेरिकेच्या प्रशासनानं घातलेल्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रॅली काढली होती. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नागरिकांनी 'आज आम्हीही मुस्लिम आहोत,' असा संदेश देणाऱ्या एका गाण्याच्या माध्यमातून आपण मुस्लिमांच्या सोबत असल्याचा संदेशही दिला आहे.

जस्ट एक उत्सुकता! तिकडचे ट्रम्पसमर्थक गोरे राष्ट्रवादी आणि देशप्रेमी अमेरिकन्स या ट्रम्पविरोधक उदारमतवादी, सेक्युलर, लिबरल, पुरोगामी नागरिकांना कोणत्या देशात जाण्याचा सल्ला देतात? पाकिस्तान की अफगाणिस्तान की सौदी अरेबिया की अन्य एखादा मुस्लिम देश?

………………………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......