‘भावलेली माणसं’ : उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारा छोटेखानी चरित्रग्रंथ
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘भावलेली माणसं’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 21 August 2021
  • ग्रंथनामा शिफारस ‘भावलेली माणसं वासुदेव मुलाटे जर्नादन वाघमारे केशवराव धोंडगे द. भि. कुलकर्णी गंगाधर पानतावणे

कुठलीही व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही. वेगवेगळी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ती सर्वच आनंद देणारी असतात असे नाही. पण त्यांच्या जगण्यात महत्त्वाकांक्षा आणि उर्मी दडलेली असते. एका मोठ्या लेखकाला कुणीतरी फार सुरेख प्रश्न विचारला होता- ‘सर्वसाधारणपणे आपल्या पत्नीपेक्षा आपली मैत्रीण किंवा आपल्या पतीपेक्षा आपला मित्र आपली समस्या व्यवस्थित समजून घेतो, असे का वाटते?’ याचे उत्तर त्यांनी फार मार्मिकपणे दिले होते. ते म्हणाले होते-  ‘त्याचं कारण म्हणजे मैत्रीण किंवा मित्र त्या समस्येशी संबंधित नसतात. फक्त समजून घेणे एवढेच त्यांचे काम असते.’

याचा अर्थ संबंध आला की, संघर्ष येतोच. तरीही अशी संबंध आलेली माणसं आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतात. अशा सर्वच व्यक्तींचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख प्रत्येकालाच शब्दरूप करता येतो असे नाही, पण एखादा मोठा कलावंत किंवा लेखक त्याच्या आयुष्यात आलेली माणसं, विशेषतः त्याला ‘भावलेली माणसं’ लालित्यपूर्ण रीतीनं उभी करण्याचा प्रयत्न करतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांचा ‘भावलेली माणसं’ हा लेखसंग्रह त्यापैकीच एक म्हणावा लागेल. डॉ. मुलाटे मराठी साहित्यविश्वाला नवीन नाहीत. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, ललितगद्य, एकांकिका व समीक्षा अशा विविध लेखनप्रकारांत विपुल लेखन केलं आहे. ‘विषवृक्षाच्या मुळ्या’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. नुकतंच त्यांचं ‘झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथनही प्रकाशित झालं आहे. वयाच्या पंचाहत्तरीतही ते लेखनमग्न आहेत.

या संग्रहात डॉ. मुलाटे यांनी त्यांना भावलेल्या तेरा व्यक्तिरेखांचा आलेख मांडलेला आहे. यात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ.द.भि. कुलकर्णी, मनोहर तल्हार, पंडित नाथराव नेरळकर, लोकनेते केशवराव धोंडगे... अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वच त्यांच्या क्षेत्रांत नावाजलेल्या आहेत. त्यांची ओळख करून देताना डॉ. मुलाटे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, जीवनविषयक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या कार्याचा आगळावेगळा परिचय आपल्या समोर ठेवतात.

डॉ. मुलाटे आपल्या मनोगतात म्हणतात, “ही आहेत मला ज्यांच्याविषयी नेहमीच पूज्यभाव, आदर आणि स्नेह जाणवत आला अशी काही माणसं. माणूस जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो, असं म्हणतात, ते खरंच आहे. परंतु माणूस या जगात येण्यापासून ते त्याने या जगाचा निरोप घेईपर्यंत त्याच्या काळात तो एकटा नसतो, हे सत्यही नाकारता येणार नाही.”

डॉ. मुलाटे यांना ही माणसं का भावली, याचा शोध घेताना लक्षात येतं की, ही माणसं सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, लातूरचे पहिले नगराध्यक्ष व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्याविषयी लिहिताना त्यांनी एका कार्यक्रमात मांडलेली भूमिका डॉ. मुलाटे आपल्यासमोर ठेवतात. डॉ. वाघमारे आपल्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात म्हणाले होते, “माझ्या जीवनात तीन उत्कट आसक्ती आहेत. ज्ञानार्जन, दु:खितांविषयीची अनुकंपा आणि समाजपरिवर्तन. समाज परिवर्तनाशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी. त्याचा धर्म, त्याची जात, त्याचे जन्मस्थान, लिंग, भाषा, रंग अशा कोणत्याही गोष्टीचा अडथळा त्याच्या मार्गात येता कामा नये.”

यावर भाष्य करताना डॉ. मुलाटे म्हणतात, “त्यांच्या कार्याचे, जीवनदृष्टीचे, एकूण व्यक्तिमत्त्वाचे सार या त्यांच्या विधानात साठवलेले आहे.”

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाद्वारे मराठी दलित साहित्यात मौलिक योगदान देणारे डॉ. गंगाधर पानतावणे तसे सर्वांना परिचित आहेत. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे लेखन, त्यांचे विचार अनेकांच्या मनात घर करून आहेत. उपेक्षित लेखकांना व्यासपीठ तयार करून देण्याचं काम डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकातून अनेक वर्षं केलं. या नियतकालिकानं मराठी साहित्याला खूप लेखक दिले. आज मराठी साहित्यात नावाजलेल्या अनेक लेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात या नियतकालिकातून केलेली आहे.

डॉ. पानतावणे यांच्याविषयी डॉ. मुलाटे म्हणतात, “माझ्या लक्षात आले की, दलित साहित्याची सैद्धान्तिक मांडणी सुरुवातीच्या काळात ज्या महनीय व्यक्ती करीत होत्या, त्यात पानतावणे सर आघाडीवर होते. बोलताना किंवा चर्चा करताना त्यांच्या विचारात कडवेपणा जाणवत नसे. दलितांच्या वाट्याला आलेले क्लेशदायी जीवन हे धार्मिक आणि वर्णव्यवस्था यातून आलेले आहे. त्यामुळे त्यांचा संघर्ष कोणा व्यक्तीच्या विरुद्धचा नाही, तो आहे त्याला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध.”

या मांडणीतून पानतावणे सर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. विद्रोह, नकार, बंड ही दलित साहित्याची लक्षणं जरी असली तरी आक्रोश किंवा कडवेपणा येऊ न देता सम्यकपणे मानवतावादी विचारसरणी मांडण्याचं महत्त्वाचे काम पानतावणे सर करत होते.

प्रसिद्ध समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयीचा लेख तर मुळातून वाचण्यासारखा आहे. मृत्यूच्या दोन दिवस अगोदर लेखकासोबत साहित्याविषयी त्यांनी केलेली चर्चा अंतर्मुख करणारी आहे.

पंडित नाथराव नेरळकर हे संगीतातील मोठं नाव. त्यांच्याविषयी लिहिताना लेखक म्हणतात, “नाथरावांना जेवढी संगीताची आवड आहे, तेवढीच माणसांची आवड आहे. त्यांचा मित्रपरिवार त्यामुळे विशाल आहे. त्यांना मैत्रीसाठी जात-पात, प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक स्तर, वय काही आडवे येत नाही. गाण्याइतकाच गोष्टीवेल्हाळपणा आणि निरिच्छ प्रेम यामुळे त्यांच्याभोवती सतत माणसांचा गराडा असतो. मला तर ते जगतमित्रच वाटतात.”

कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर मानधनाची फारशी पर्वा न करणारं, परंतु आपल्या सदाबहार संगीतानं रसिकांची मनं जिंकणारं असं हे लोभस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविषयी अनेक प्रसंग लेखकाने नोंदवले आहेत.

यासोबतच मनोहर तल्हार आणि केशवराव धोंडगे यांचे लेख त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

थोडक्यात उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारा हा छोटेखानी चरित्रग्रंथच आहे. अर्थात या व्यक्तिमत्त्वांचा आलेख मांडताना लेखकाला काही मर्यादाही पडलेल्या आहेत, पण तरीही हे लेख दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत, हे नक्की.

‘भावलेली माणसं’ - डॉ. वासुदेव मुलाटे,

स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद,

मूल्य - २५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......