‘हिंदू राष्ट्रवादा’चे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारे पुस्तक
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • ‘THE RSS : A View to the Inside’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 12 August 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र THE RSS : A View to the Inside राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS वॉल्टर अँडरसन Walter Andersen श्रीधर दामले Shridhar Damle माधव सदाशिव गोलवलकर M. S. Golwalkar केशव बळीराम हेडगेवार Keshav Baliram Hedgewar

‘THE RSS : A View to the Inside’ या वॉल्टर अँडरसन आणि श्रीधर डी. दामले यांनी लिहिलेल्या पुस्तकात मोदी सरकारच्या धोरणांवर भाष्य करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ‘हिंदू राष्ट्रवादा’चे पुनरुत्थान करण्याचे कसे प्रयत्न करत आहे, याचा एक व्यापक आढावा घेतला आहे. हिंदुत्वाच्या राजकारणावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. अँडरसन-दामले या लेखकद्वयींनी या आधीही या विषयावर लेखन केले आहे. परंतु या पुस्तकात चर्चा केलेल्या अनेक विषयांपैकी प्रथमच घेण्यात आलेला विषय म्हणजे मोदी सरकारच्या धोरणाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर केलेले भाषण. 

या पुस्तकाची सुरुवात ‘A Growing Involvement in the Policy Process’ या प्रकरणाने होते. संघाचा मोदी सरकारच्या धोरण प्रक्रियेतल्या सहभागाला सुरुवात कशा प्रकारे झाली, हे सांगताना  लेखकांनी ३० सप्टेंबर २०१७ रोजी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोहन भागवत यांनी केलेले भाषण उदधृत केले आहे. त्यामध्ये भागवत मोदींच्या धोरणांबद्दल आणि भारताच्या विकासात्मक प्राधान्यांबद्दल गंभीरपणे बोलले आहेत. भागवत यांनी जीएसटी करप्रणालीबाबत आपली मते व्यक्त केल्यानंतर जीएसटी परिषदेने नोव्हेंबर २०१७मध्ये करप्रणालीत सुधारणा केली. भागवत यांनी शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत, पीक विमा, माती परीक्षण आणि ई-विपणन यांसारख्या विद्यमान योजनांच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकत असतानाच त्यात सुधारणा सुचवल्या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या पुस्तकात लेखकांनी १९व्या शतकातील हिंदुत्वाची पाळेमुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील व्यक्ती, या संघटनेवर दोन वेळा घातलेली बंदी आणि आता संघाने मिळवलेली राजकारण आणि समाजावरील पकड याचाही इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसह पूर्व आशियाई देशांवर परिणाम करणाऱ्या भारतातील परिवर्तनाचाही मागोवा घेतला आहे.

या पुस्तकात दोन महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती मिळते. एक, हेडगेवार आणि दुसरे, गोलवलकर. १९२५मध्ये केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९४०पर्यंत ते संघाचे सरसंघचालक होते. देशाचे विभाजन, महात्मा गांधींची हत्या आणि १९४७मध्ये संघावर घातलेली बंदी हे सर्व माधवराव सदाशिवराव गोलवलकर यांच्या ३३ वर्षांच्या (१९४० ते १९७३) कारकिर्दीदरम्यान घडले. मधुकर दत्तात्रय देवरस यांनी संघाला राजकारणात ढकलले, त्याला हेडगेवार यांनी जोरदार विरोध केला होता.

‘The RSS Overseas’ या तिसऱ्या प्रकरणात संघाच्या परदेशातील उपस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी लेखक २८ सप्टेंबर २०१४ रोजी अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या मोदींच्या भाषणाचा संदर्भ देतात- “Ushering the audience into the huge hall were volunteers from the Hindu Swayamsevak Sangh (HSS) the overseas counterpart of the RSS in the US.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचे मूळ उद्दिष्ट चारित्र्य विकासावर भर देण्याचे होते. त्या अनुषंगाने चारित्र्य विकासावर लक्ष केंद्रित केले गेले. जसजसा काळ पुढे सरकत गेला आणि नवीन आव्हाने येत केली, तसतसे संघात नवे नेतृत्व उदयास आले.

‘Indianizing Education’ या चौथ्या प्रकरणात संघाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती मिळते. संघात शिक्षणाच्या ‘भारतीयीकरणा’वर भर देण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात हिंदू धर्माची चिन्हे असण्याबरोबरच हिंदू श्रद्धा, पौराणिक कथा, हिंदूंचे उत्सव व विधी, योग आणि संस्कृत वर्गांना प्रोत्साहन दिले पाहिजे, यावर संघाचा भर होता\असतो. शालेय अभ्यासक्रमाबाबत संघ आणि राज्य सरकार यांच्यात करार न झाल्यामुळे संघाने स्वत:च्या शाळा सुरू केल्या आणि काही राज्य सरकारांनीही नंतर तशा शाळा चालवायला सुरुवात केली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समुदायाबद्दल लवचीक दृष्टिकोन ठेवला आहे. संघातल्या काही बुद्धिजीवींचा ‘घरवापसी’वर विश्वास आहे. ज्यांचे वंशज हिंदू होते, असे भारतात आलेले सर्व मुस्लीम आणि ख्रिश्चन ‘हिंदू’ झाले पाहिजेत, कारण त्यांचा वंश ‘हिंदू’च आहे, असे त्यांना वाटते. या तत्त्वज्ञानाला विरोध करणाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंडोनेशियाचे अनुकरण केले पाहिजे, जिथे मुस्लिमांनी स्वत:च्या धर्माशी तडजोड न करता हिंदू संस्कृतीतल्या अनेक पैलूंचा आपल्या जीवनात समावेश केला आहे.

संघाच्या अनेक कार्यक्रमांपैकी ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’ (एमआरएम)ची स्थापना हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही वरिष्ठ नेते असल्याचे नंतर स्पष्ट झाले. बहुसंख्य मुस्लीम नेत्यांचा असा विश्वास आहे की, हिंदू समाजाशी संघर्ष करण्यापेक्षा त्याच्याशी मित्रता ठेवल्यास फायदा होऊ शकतो. २००३मध्ये मंजूर झालेल्या ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’च्या ठरावात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती आणि २००४मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावात राष्ट्रीय एकात्मतेला पुढे नेण्यासाठी काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘A Debate on Economic Self-Sufficiency’ हे आठवे प्रकरण संघपरिवाराच्या ‘आर्थिक स्वयंपूर्णते’बद्दलच्या विचारांचा मागोवा घेते. जागतिक भांडवलशाहीबद्दल भाजपचे विचार आणि संघाचे समाजवादी व भारतकेंद्रित विचार, यांमधील तडजोडींची अनेक उदाहरणे या प्रकरणात दिली  आहेत.

मुस्लीम आणि पाकिस्तानबाबत संघाची विचारधारा चीनपेक्षा वेगळी आहे. या पुस्तकात चीन भारताचा शत्रू असल्याचे नमूद केले आहे. त्यातून मोदी सरकारची भूमिका स्पष्ट होते. या पुस्तकातून जो अर्थ निघतो, त्यानुसार चीनशी लढा देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे मोदी सतत म्हणत राहतील, परंतु प्रत्यक्षात तसे काहीही करणार नाहीत. 

या सर्व बाबींचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जुन्या विचारांची आणि हळूहळू बदलत जाणारी संघटना आहे. आपण संपूर्ण भारताबद्दलदेखील असेच म्हणू शकतो. संघ कधीही क्रांतिकारक संघटना होण्याची शक्यता नाही. जातीय गट एकत्र आणणे आणि त्यांना सामावून घेणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट. त्यामुळे संघाचा वेळोवेळी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अभ्यास करावा लागतो, असे लेखकांचे मत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......