टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पाकिस्तानचा नकाशा, नरेंद्र मोदी, मनीष राठी आणि परवेज मुशरर्फ
  • Fri , 17 February 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मनीष राठी Manish Rathi परवेज मुशरर्फ Pervez Musharraf

१. सीआयए या अमेरिकी गुप्तचर संघटनेच्या इस्लामाबादमधील एका माजी अधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा इशारा दिला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेला दहशतवाद आणि अण्विक शस्त्रास्त्रे यामुळे पाकिस्तान हा जगासाठी धोकादायक ठरू शकते, असेही या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पाकिस्तानची ही अवस्था करण्यात आपल्या थोर मायदेशाचा बराच हात आहे आणि आता तो हात झटकायची आणि पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या मौतीने मरू देण्याची वेळ आता आलेली आहे, हे मात्र तो सोयीस्करपणे सांगायचं विसरलेला दिसतोय.

………………………………………

२. गुजरातमध्ये माझा जन्म झाला असला तरी, उत्तर प्रदेशाने मला दत्तक घेतले आहे. हा दत्तक घेतलेला मुलगाच राज्याचा विकास करील. : नरेंद्र मोदी

जाईल तिथे काल्पनिक नाती जोडून खेटू पाहणाऱ्या माणसांकडे भारतीय समाजमन फारच संशयाने पाहतं, हे मोदींना माहिती नाही का? शिवाय या बोलघेवड्या पुत्राने आपल्या खऱ्याखुऱ्या मातृभूमीचा कसा निव्वळ फोटोशॉप विकास केलाय, ते या दत्तक भूमीला माहिती नसेल का?

………………………………………

३. जमात उद दावाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा ठपका भारताने ज्याच्यावर ठेवला आहे तो हाफिज सईद हा लोककल्याणकारी उपक्रम चालवणारा निष्पाप माणूस आहे. हाफिज सईद हा एक उत्तम गैरसरकारी संस्था चालवणारा इसम आहे. तो निर्दोष आहे. त्याला नजरकैदेत ठेवणे चुकीचे आहे. भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्याने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. तो समाजसेवा करणारी संस्था चालवतो. फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन या संस्थेच्या अनेक रुग्णवाहिका आहेत. सईदची संस्था ही धर्मार्थ आहे. सईद हा स्वतः दहशतवादविरोधी आहे. तो कसा दहशतवादी असू शकतो. : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानी सैन्य हे निव्वळ एक आध्यात्मिक भजनी मंडळ असून ते फक्त दुपारी आणि संध्याकाळी प्रार्थना म्हणण्यापुरतं एकत्र येणारं संघटन आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती ही क्रिकेटची मॅच जिंकल्यावर आकाशात रोषणाई करण्यासाठीच करून ठेवली आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक शीरखुर्मा वाटायला घुसले होते, भारतीय सैन्याने गैरसमजातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या… हे अजून बोललेले नाहीत का ह.भ.प. मुशर्रफमियाँ???

………………………………………

४. कर्जबुडव्यांना अद्दल घडवण्यासाठी चीनच्या सुप्रिम कोर्टाने त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज बुडवणाऱ्यांना या आदेशानुसार विमान किंवा बुलेट ट्रेनने प्रवास करता येणार नाही. त्यांच्या मुलांना यापुढे खासगी शाळांत प्रवेश दिला जाणार नाही. कर्जबुडव्यांना काही काम करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कर्जदारांचे पर्सनल आयडी नंबर ब्लॉक करण्यात आले असून हे लोक आता घर भाड्याने देखील घेऊ शकणार नाहीत.

अरे बापरे, आपल्या सुप्रीम कोर्टाने असला काही आदेश दिला तर विमानं, ट्रेन, शाळा आणि इमारती तर ओस पडतीलच; शिवाय अनेक कार्यालयांपासून सरकारांपर्यंत सर्व ठिकाणी माणसांची वानवा भासेल. कर्जबुडव्यांना रस्तेप्रवासाला बंदी घातली तर देशभरात शुकशुकाट पसरेल आणि आधीच रिकाम्या पडलेल्या पोलिस दलाला (त्यातलेही कर्जबुडवे हुसकावले जाणार ना?) फारसं काम उरणार नाही, हा एक त्यातल्या त्यात दिलासा.

………………………………………

५. रेल्वेतून लहान बाळांना बरोबर घेऊन प्रवास करणाऱ्या पालकांना आता बाळासाठी केवळ एका क्लिकवर गरम दूध उपलब्ध होणार आहे. रेलयात्री अॅप्लिकेशनच्या माध्यमातून न सांडणाऱ्या पॅकेट्समधून दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. तान्ह्या बाळांना घेऊन दूरचा प्रवास करणाऱ्या आईबापांना त्यांच्यासाठी आरोग्यदायी आणि गरम दूध मिळवताना फार अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ‘रेलयात्री.इन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनीष राठी यांनी सांगितलं.

खरं तर या चांगल्या योजनेचं मनापासून स्वागतच केलं पाहिजे. पण, आपल्याकडे कागदावर अतिशय चांगल्या असलेल्या योजनांची अंमलबजावणीत काय माती होते, हे लक्षात घेतलं तर लहान बाळांऐवजी जादा पैसे मोजायला तयार असणाऱ्या निगरगट्ट प्रौढांच्याच घशात हे दूध जाण्याची शक्यता अधिक दिसते. शिवाय भेसळीमुळे बिचारी बाळं आजारी पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या तरी आश्चर्य वाटणार नाही.

………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......