‘आपण भूगोलाला ‘इतिहासाची दासी’ मानतो, पण, भूगोलाभ्यास हे सर्व विज्ञानाभ्यासाचं आदि-विज्ञान मानायला हवं!’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘भूगोल कोश’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 16 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस भूगोल कोश Bhugol Kosh एल. के. कुलकर्णी L. K. Kulkarni सुवेझ कालवा Suez Canal लॉर्ड कर्झन Lord Curzon

मानवाच्या अस्तित्वासाठी भू-राजकीय समीकरणं किती महत्त्वाची असतात, याची जाणीव आधुनिक जगाला द लेसेप्स या फ्रेंच इंजिनीअरने सुवेझचा कालवा (१८५९-६९) बांधून पूर्व व पश्चिम यामधील भौगोलिक सीमारेषा पुसून टाकली, तेव्हा झाली. या विचारांची मुळे नेपोलियनने स्थापन केलेल्या ‘सोसिएने द जिऑग्राफी द पारि’ या संस्थेत धरली गेली, याची जाणीव ठेवून अशी संस्था इंग्लंडमध्ये असावी, असे लॉर्ड कर्झनला वाटले. पुढे १९१२ साली ती स्थापन झाली, तेव्हा तो म्हणाला होता, “आपण भूगोलाला इतिहासाची दासी मानतो... पण भूगोलाभ्यासापासून आपण जरा विचलित झालो तर आपणाला भूस्तरशास्त्र, प्राणिशास्त्र, संस्कृतिशास्त्र, रसायन, पदार्थविज्ञान इत्यादी अनेक शास्त्रांत शिरावं लागतं. म्हणून मला वाटतं की, भूगोलाभ्यास हे सर्व विज्ञानाभ्यासाचं आदि-विज्ञान मानायला हवं.” या घटनेचा उल्लेख दिनेश द. माहुलकर यांच्या ‘वृद्धि:’ या पुस्तकात आहे.

भूगोलाचं महत्त्व जाणून या विषयाचा परीघ, विविध संकल्पना, घटना, संज्ञा, संशोधन-कार्य समजून घेण्यासाठी हाती एखादा शास्त्रशुद्ध पायाभरणी करणारा मराठी संदर्भ कोश असावा, असं संशोधकांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा जिज्ञासू वाचकांना वाटतं, तेव्हा एल. के. कुलकर्णी यांचा ‘भूगोल कोश’ अपरिहार्य बनून राहतो. तो मराठीतील एका आघाडीच्या विज्ञान लेखकाकडून आणि भूगोलाच्या अध्यापकांकडून लिहिला गेल्यामुळे त्यात अभ्यासकाच्या दृष्टीनं संदर्भ शोधणं, तपासणं सोयीचं जाईल, याची काळजी घेण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

३५० पानांच्या या दीर्घ कोशात महत्त्वपूर्ण अशा ३५० संबोधांबद्दल शास्त्रीय माहिती आहे आणि त्याची व्यवस्थित वर्णमालेप्रमाणे येणारी अनुक्रमणिका आहे. त्यामुळे पुस्तकात आपल्याला हवं ते सहजपणे शोधता येतं. तसंच काही मराठी संज्ञा या आताशा इंग्रजीत अंगवळणी पडल्या आहेत, याची जाणीव ठेवून एक पारिभाषिक शब्दांची पुरवणी शेवटी जोडली आहे. या पुस्तकाला असलेली परिशिष्टं अतिशय माहितीपूर्ण आहेत. त्यात एकक, मापे, गणना, ग्रह, उल्का, धूमकेतू, तारे, तसंच बऱ्याच माहितीपूर्ण बाबींचा जागतिक व राष्ट्रीय दृष्टिक्षेप दिला आहे.

जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या दृष्टीनं काही तरी वेगळा संदर्भ हवा असतो. कोणाला भूगोल विषयाशी संबंधित व्यक्तींच्या म्हणजे अमेरिगो व्हेस्पुसी, अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट, आर्यभट्ट, कार्ल रिटर, ख्रिस्तोफर कोलंबस, गेरहार्ट मर्केटर, टॉलेमी, फर्डिनांड मॅगेलान, मार्को पोलो, वास्को-द-गामा, शेर्पा तेनसिंग नोर्गे, यांच्या योगदानाबद्दल नेमकी माहिती हवी असते. कोणाला भौगोलिक स्थानाबद्दल माहिती हवी असते, कोणाला राशीचक्र जाणून घ्यायचं असतं, कोणाला आपण कुठे जाऊन आलो वा जाणार त्या प्रदेशाची शास्त्रीय माहिती हवी असते, तर कोणाला जो आपला भवताल आहे; तो पूर्णतः जाणून घेण्याची जिज्ञासा असते. एखाद्याला कैलास, सरस्वती किंवा मानस यांसारख्या धार्मिक स्थळांचा संदर्भ हवा असतो, संशोधकांचं नेमकं मत जाणण्याची उत्सुकता असते.

असे सगळे संदर्भ हा कोश पुरवतो. यात खंड, महासागर, समुद्र, सागर, सागरप्रवाह, उपसागर, हिमनग, नदी, सरोवर, धबधबा, पर्वत, शिखर, घाट, देश, खडक, मृदा, वाळवंट, वने, वातावरण, हवामान, आकाश, आकाशगंगा, ग्रह, उपग्रह, तारे, वारे, झरे, गर्ता, राशी, नक्षत्र, संज्ञा, व्याख्या, घटना, संस्था, प्रकल्प याविषयी साद्यंत माहिती मिळते. आवश्यक तिथं नकाशे आणि रंगीत चित्रं दिली आहेत. त्यामुळे कोश अतिशय उपयुक्त झाला आहे.                   

बहुधा आपल्या सर्वांना सात जागतिक आश्चर्ये आहेत, याची माहिती असते, पण त्यांचे संदर्भ कसे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात बदलत गेले आणि ते नेमके काय आहेत, याची कल्पना नसते, अशा काही रिकाम्या जागा योग्य माहितीने भरण्याचं कामदेखील हा कोश करतो.

माझ्या अनुभवात मिलान ते जिनेव्हा हा नितांत सुंदर ट्रेन प्रवास दोनदा आला. आजूबाजूचं निसर्गसौंदर्य मोहून टाकणारं होतं. आपण आल्प्सच्या कुशीत आहोत, हे कळत होतं, पण आपण इटली व स्वित्झर्लंडच्या मध्ये असलेल्या ‘ग्रेट सेंट बर्नार्ड’ खिंडीतून प्रवास केला, हे हा कोश वाचल्यावर लक्षात आलं. हा कोश हाताशी असला तर, असाच एखादा वैयक्तिक अनुभव समृद्ध करेल, हे निश्चित.           

भूगोलात अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. १७४व्या पानावर ‘भूगोला’ची व्याख्या विशद केली आहे. पण स्थूल स्वरूपात ज्या विषयाला आपण भूगोल समजतो, तो शालेय अभ्यासक्रमात आपण वाचतो, अभ्यासतो, पण अगदी तेवढ्यापुरता. त्यानंतर त्याची आपली साथ संपते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो, त्यांना या विषयाचा हात घट्ट धरून ठेवावा लागतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आजकाल एमपीएससी आणि यूपीएससी यांच्या परीक्षेत ‘भूगोल’ या विषयाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यात तो सामान्य-ज्ञानाचा विषय आहे. म्हणून प्राथमिक गाळणी परीक्षेत टाळता येण्यासारखा नाही. शिवाय त्यात उत्तम मार्क पडत असल्यामुळे मुख्य परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांचा आवडता विषय असतो. पण ज्यांनी भूगोलाची साथ सोडली, ते पुढे कोणत्याही क्षेत्रात गेले तरी तो मात्र त्यांची पाठ सोडत नाही. प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला या विषयाचं भान असणं आवश्यक असतं. ते त्याला अधिक कार्यक्षम बनवतं, दृष्टिकोन व्यापक करतं. कामानिमित्त देशात-परदेशात फिरताना त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास अपरिहार्य बनून राहतो.

आपल्या शिक्षण पद्धतीत ‘शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचं नेमकं मानवी आयुष्यात उपयोजन काय?’, या प्रश्नाचं उत्तर देणारा पहिला पाठ समाविष्ट करण्याची आता आवश्यकता आहे. नाही तर होतं काय की, इलेक्ट्रॉनिक शिकायचं, इंजिनीअर व्हायचं, पण या ज्ञानाचं उपयोजन नेमकं काय, हा प्रश्न मनात धरून आयुष्य ढकलत राहायचं… कधी या क्षेत्राशी संबंधित वा कधी असंबंधित नोकरी वा व्यवसाय करायचा आणि मग संघर्षातून वा आपापल्या अनुभवातून उत्तर शोधायचं. हा स्व-भ्यासाचा एक मार्ग झाला. तो व्यक्तिकेंद्री आहे. दुसरा मार्ग शिक्षणातून आहे मानस घडवण्याचा. तो अधिक दूरगामी परिणाम करणारा आहे. म्हणून बाळकडू दिल्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांच्या उपयोजनाचा पाठ आता त्या त्या विषयारंभी दिला जाण्याची आवश्यकता आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ना. गो. कालेलकरांचं ‘भाषा : इतिहास आणि भूगोल’ हे पुस्तक मराठी भाषेच्या इतिहासाचं पुस्तक म्हणून वाचण्यात आलं होतं, पण भाषेला केवळ इतिहास असतो असे नव्हे, तर भूगोलदेखील असतो, याची जाणीव त्यानंतर वाढीस लागली. भाषा अभ्यासात भूगोलाचं असणं जेवढं अनपेक्षित वाटतं, तेवढंच आपल्याला कोणत्याही कार्यक्षेत्रात सकृतदर्शनी वाटतं, पण थोड्या विचाराअंती त्या क्षेत्राला असलेलं भूगोलाचं अस्तर आपल्याला जाणवतं, म्हणून हा विषय आयुष्यभराचा सोबती होतो.

समर्थ रामदास ‘दासबोधा’त ‘ऐसा त्या भूगोळाचा पार | कोण जाणे ||’ असं म्हणतात, तेच खरं!

‘भूगोल कोश’ - एल. के. कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पुणे

मूल्य - ५०० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......