टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी आणि रामदास आठवले
  • Thu , 09 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh रामदास आठवले Ramdas Athawale

१. पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला बिहार महापालिकेइतके गुण मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून दाखवले आहे. राज्य सरकारमुळे मुंबई किमान तिसऱ्या स्थानावर आहे. अन्यथा, मुंबई महापालिका केंद्राच्या सर्वेक्षणात तळाला असती, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीसनांना दोन सवाल : १. ज्या मुंबई महापालिकेने शहराचा कारभार पाटण्याच्या बरोबरीला नेला, तिथे शिवसेनेबरोबर भाजप सत्तेत नाही का? २. ज्या राज्य सरकारच्या थोर कामगिरीमुळे मुंबईची इभ्रत वाचली, त्यात भाजपबरोबर शिवसेना सत्तेत नाही का?

…………………………………..

२. “अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला केवळ डॉ. मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे,” अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केली. मोदींची ही टीका जिव्हारी लागल्याने काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला.

काँग्रेस सदस्यांनी सभात्याग करण्याची गरज काय होती? खुद्द मोदी यांच्यावरही डाग (म्हणजे ते आणि त्यांचे भक्तगण ज्यांना सोयीनुसार डाग म्हणतात, ते) नाहीच्चैत की! त्यांना बहुधा लाखालाखांचे सूट घालून अंघोळ करण्याची सवय असावी. अर्थात, सगळं काही झाकायला एवढे विराट अमित शाह असताना त्यांना कोटांचीही गरज नाही म्हणा. 

…………………………………..

३. एअर इंडियाचे काही कर्मचारी ब्युफे भोजनासाठी आले असताना सोबत आणलेल्या डब्यांमधून जेवण घेऊन गेले, असा आरोप लंडनच्या एका हॉटेलने केला आहे. यानंतर एअर इंडियाने ‘ब्युफे जेवण घेऊन जाण्यासाठी नाही,’ अशी आशयाची एक नोटीसच सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे.

अहो, नोटीस कसली देताय, सत्कार करा, सत्कार. अन्न वाया जाऊ नये, ही आपली संस्कृती आहे. शिवाय, जेवणाचे पैसे पुरेपूर वसूल करण्याचीही. लग्नात जेवायला माणसं किती जाणार, या हिशोबात आपण अहेर करतो, तर ब्युफेमध्ये प्रत्येकी किती पैसे मोजले असतील, ते वसूल नाही करणार? ब्रिटिशांना आपल्या परंपरेचं प्रखर दर्शन घडवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करायला नको?

…………………………………..

४. अमेरिकेनंतर कुवेत सरकारने पाकिस्तानसह पाच मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली असताना आता सौदी अरेबियातून गेल्या चार महिन्यांत तब्बल ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली गेली आहे. सध्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहवा, आता अखंड हिंदुराष्ट्राच्या सीमा कुवेत आणि सौदीपर्यंत विस्तारणार म्हणा की! एकदा हे तत्त्वत: मान्य केलं आणि त्याने उकळ्या फुटल्या की अमेरिकेसह जगात कुठेही भारतीय वंशाच्या नागरिकांवर कोणत्याही कारणाने अशीच बंदी आली की तेव्हाही टाळ्या पिटायच्या बरं का! तत्त्व म्हणजे तत्त्व.

…………………………………..

५. भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना निवडून येणार नाही, असे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले म्हणाले. 

मुलुंडमध्ये या प्रचारसभेत आठवलेंनी केलेलं कवन पुढीलप्रमाणे :

मुंबई में हार जायेगी शिवसेना,

क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना,

हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना,

इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना...

आता सांगा, यांना दुसऱ्या कोणी टपली मारण्याची काही गरज आहे का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......