टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमिर पुतीन, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, पप्पू कलानी
  • Wed , 08 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis डोनाल्ड ट्रम्पDonald Trump व्लादिमिर पुतीन Vladimir Putin नरेंद्र मोदी Narendra Modi पप्पू कलानी Pappu Kalani

१. मुख्यमंत्रीपद लाभले याचा अर्थ अखंड महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न झालाच तर सर्वांत मोठा विरोध आमच्या वैदर्भीबांधवांकडूनच होईल. कपाळावर कुंकू अखंड महाराष्ट्राचे लावायचे व खोटे मंगळसूत्र दुसऱ्याचे बांधायचे हे धंदे थांबवा. : उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

या सगळ्या राजकारणी मंडळींना बांगड्या, सौभाग्यचिन्हं वगैरे बाईला विवाहसंस्थेची गुलाम बनवून ठेवणाऱ्या चिन्ह-प्रतीकांचा सोस का असतो? भाजपला 'कमळाबाई' असं संबोधून शिवसेनेने कायम अशाच प्रकारची तोंड-'मर्दुमकी' करून दाखवली आहे. बाईला दुबळेपणाचं प्रतीक मानण्याचा आपल्याला काही हक्क आहे का हो धनुष्यबाणवाले दादा! एक बाई केंद्रात सत्तेत होती, तेव्हा आपण कसे मनीमाऊसारखे पिंजऱ्यात गप्प बसलो होतो, त्याची आठवण ठेवा.

…………………………………………………..

२. रशियाबद्दल अंमळ जास्तच जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत टीकेचा भडिमार होत असताना मंगळवारी ट्रम्प यांनी ‘कोण पुतिन मी त्यांना ओळखत नाही’, अशी उपहासात्मक टिप्पणी केली आणि रशियाशी कोणत्याही प्रकारचा समझौता करणार नसल्याचे ट्विट केले.

पुतिन यांच्या मातोश्रींचा बर्थडे जवळ आलाय काय? ट्रम्पतात्या कुठून तरी कुठे तरी जाता-येताना विमान अचानक मॉस्कोला उतरवून बिर्याणी खायला जाणार पुतिनच्या घरी, असा डाउट येऊन राहिलाय.

………………………………………………

३. एकीकडे उल्हासनगरातले नामचीन कलंकित नेते पप्पू कलानी यांना चार हात लांब ठेवत असल्याचा आव आणून त्यांचाच मुलगा ओमी याच्याबरोबर आघाडीचा डाव खेळणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पोस्टरवर मात्र कलानी यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत आणून ठेवल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

भाजप हा स्वच्छ आणि चारित्र्यवान पक्ष आहे, हा निव्वळ एक जुमला आहे, हे एव्हाना स्पष्ट झालंच आहे. आताही निष्ठावंत कार्यकर्त्यांना कलानीच्या चारित्र्याने काही फरक पडत नसेल; त्याचं नाव 'पप्पू' आहे, यानेच ते कावले असतील. महामहीम मोदींच्या पंक्तीत 'पप्पू'? हे त्यांना पसंत पडत नसेल. कलानीच्या सुरेश या मूळ नावाने त्याला हाक मारली की, यांचा आक्षेप संपून जाईल.

…………………………………………….

४. देशात वाघांची संख्या सहा टक्क्य़ांनी वाढली आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. व्याघ्र संरक्षणासाठी केलेल्या उपायांमुळे सध्या देशात २२०० रॉयल बेंगॉल टायगर्स आहेत व ७९१० बिबटे आहेत. ते १३ व्याघ्र अभयारण्यांत असून कॅमेरा ट्रॅप पद्धतीने ही मोजणी केली आहे.

चला चला सैनिकहो, वाघांची संख्या वाढली. आता आपल्याशी कसलाही संबंध नसलेल्या या घटनेचा साहेबांपासून गल्लीनेत्यापर्यंत सर्वांच्या भाषणांत अभिमानाने उल्लेख करून राजकीय फायदा घेण्याची वेळ झाली. चला चला विरोधकहो, वाघांची नुसती संख्या वाढून उपयोग नाही, त्यांनी इतरांच्या ताटाखालचं मांजर बनणं सोडायला हवं, असे विनोद करण्याची वेळ झाली.

…………………………………

५. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सामोरे यावे. दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. वारंवार पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘पंतप्रधान मोदींआधी माझ्याशी निपटा,’ असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

अहाहा, प्रौढ आणि प्रगल्भ राजकीय नेत्यांची काय ही कसदार भाषा! सरदार पटेलांच्या नावाने मुंबईत एक स्टेडियम होतं फ्रीस्टाइल कुस्त्यांसाठी प्रसिद्ध. दारासिंग, रंधवा वगैरे तिथूनच पुढे आलेली नावं होती. तिथेच भेटा सगळ्यांनी आणि काय ते एकमेकांना निपटून टाका. ते योग्यही ठरेल. कारण, तिथल्या सगळ्याच लढती नेहमीच लुटुपुटूच्या आणि फिक्स्ड असायच्या. तुमचीही त्यात खपून जाईल.

………………………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......