टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • हार्दिक पटेलचा शिवसेनेला पाठिंबा. (चित्र - सतीश सोनवणे)
  • Tue , 07 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Govind Pansare Samir Gaikwad डोनाल्ड ट्रम्प Donald Trump अनुभव मित्तल Anubhav Mittal मायली सायरस Miley Cyrus

१. भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून लष्कराकडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जमिनीसाठी भाडे वसूल केल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयची चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी तब्बल १६ वर्षे या जमिनीसाठी भाडं द्यायला लावलं आहे. २००० सालापासून लाखो रुपये या जमिनीच्या भाड्यापोटी देण्यात आले आहेत. या जमिनीचा तथाकथित मालक खरोखरच अस्तित्त्वात आहे की फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, याचा तपास सीबीआय करणार आहे.

हे अधिकारी चुकून लष्करात गेले म्हणायचे. सिव्हिलियन राहिले असते तर राजकारणात, व्यापारात, व्यवसायात, उदयोगात चांगलं करिअर करू शकले असते. लष्कराला पवित्र गाय मानणाऱ्या देशभक्तांनाही आता लक्षात आलं असेल की, बेईमानीचा डीएनए गणवेषाने बदलतही नाही आणि झाकलाही जात नाही.

…………………………………………..

२. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती मागितली आहे. त्याला सध्या फक्त जपमाळ देण्याचीच परवानगी न्यायालयाने दिली आहे.

अगरबत्तीचा आग्रह समजू शकतो, पण गोमूत्र सनातनचंच हवं, याचं कारण काय असेल? सनातनमध्ये अभिमंत्रित गायींचं गोरज वेळेला, मुहूर्त वगैरे पाहून मूत्र गोळा करत असतील काय? या गायी देशी वाणाच्याच असतील काय? अतिशुद्ध गोमूत्र मिळवण्यासाठी या गायींना सात्त्विक चारा खाऊ घातला जात असेल काय? बिस्लरीचं पाणी पाजलं  जात असेल काय? सनातनचे परमगुरू गोमूत्राच्या शुद्धतेत काही व्यक्तिगत योगदान देत असतील काय?

…………………………………………..

३. सात मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय रद्द केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर आगपाखड केली आहे. एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. काही विपरीत घडलं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोक देशात येतच आहेत, हे वाईट आहे, असं ट्रम्प म्हणाले.

एखादा माणूस देशालाच काय, सगळ्या जगाला असुरक्षिततेच्या खाईत कसा ढकलू शकतो, हे ट्रम्पमहोदयांच्या कारकीर्दीच्या १३ दिवसांतच सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्याशी क्षुद्र न्यायाधिशाची काय तुलना होणार? ट्रम्पतात्यांचे पूर्वजही मातीत उगवलेले नाहीत, 'बाहेरून'च आलेले आहेत, हे त्यांना कोणी सांगेल का? ते स्वत: बाहेर निघून गेले, तरी अमेरिकेचं आणि जगाचं भलं होईल.

…………………………………………….

४. फेसबुकवर पोस्ट लाइक करा आणि प्रत्येक लाइकमागे पाच रुपये मिळवा अशी बनावट स्कीम सुरू करून सात लाख लोकांना तीन हजार ७०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनीचा मालक अनुभव मित्तल याला अटक झाली आहे. नोएडामधून लोकांना गंडा घालण्याचा हा प्रकार चालू होता. आपण फसवले गेलो असल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो लोकांनी कंपनीच्या बाहेर जमा होऊन गोंधळ घातला. अवघ्या २६ वर्षांच्या मित्तलने दोन सहकारी आणि पत्नीच्या मदतीने ही कंपनी स्थापन केली होती. पाच हजारापासून ५७ हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट जमा करून घेऊन ही कंपनी सदस्यांना फेसबुकच्या लिंक्स पाठवायची. त्या लिंकवर लाइक केल्याबद्दल पाच रुपये जमा व्हायचे. काही दिवसांनी हे पैसे देणं बंद व्हायचं.

फेसबुकवर लोकांना कामाला लावून त्यांच्या कंटेंटवर झकरबर्ग पैसे कमावतो, असं गमतीने म्हटलं जातं. मित्तलने फेसबुकला कामाला लावून पैसे कमावून दाखवले. फेसबुकवर पोस्टी लाइक करण्याचे खरोखरच पैसे पडले असते, तर आजपर्यंत इथे कितीजण अब्जाधीश होऊन बसले असते.

…………………………………………..

५. सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपडेट करण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकन पॉप स्टार मायली सायरस हिने इन्स्टाग्रामवर चक्क लक्ष्मीपूजेचे फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या घरी विधिवत लक्ष्मीपूजन केल्याचं या फोटोंमधून स्पष्ट झालं आहे.

पोरगी जरा वांड आहे, पण सश्रद्ध आहे हो, म्हणून अलाबला काढून कानसुलावर बोटंच मोडून घेतील संस्कृतीरक्षक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्यामुळे आपण हिंदू धर्माकडे ओढले गेलो, असं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं की समजून जायचं, हिची पुढची कॉन्सर्ट भारतात होणार आहे. आपल्या सनी लिओनीनेही हा फंडा वापरून पाहायला हरकत नाही- तीही पावन करून घेतली जाईल.

………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......