टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - एच वन बी सुधारणा विधेयक (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 01 February 2017
  • विनोदनामा टपल्या एच-वन बी व्हिसा H-1B visa डोनाल्ड ट्रम्प Donald Trump योगी आदित्यनाथ Yogi Adityanath शिवसेना Shiv Sena मनसे Maharashtra Navnirman Sena गिरिराज सिंह Giriraj Singh राणी पद्मावती Rani Padmavati संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali

१. अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर करण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात हा व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन १,३०,००० डॉलर्स करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडून स्वस्त मनुष्यबळाचा पर्याय म्हणून करण्यात येणाऱ्या परदेशी नोकरदारांच्या आयातीला चाप बसणार आहे. याचा मोठा फटका माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना बसणार आहे. यात प्रामुख्याने भारताचा समावेश आहे. या व्हिसासाठीची सध्याची किमान वेतनमर्यादा ६० हजार डॉलर्स इतकी आहे.

अरे देवा, ट्रम्पतात्या आपल्यालाही 'मुसलमान'च समजतात होय! आता कुठे मुसलमानांचं नाक ठेचलं म्हणून नाच सुरू केला होता, तर ट्रम्पतात्यांनी आमच्याच पायाखालचं जाजम खेचलं! आता मॅडिसन स्क्वेअर ओस पडणार की काय?

…………………………………

२.  सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले असून दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आपल्या देशाकडे या सात देशांतल्या किंवा अन्य मुस्लीम देशांमधल्या नागरिकांची रीघ लागली आहे, असा शोध यांना योगविद्येनेच लागला असणार. आदित्यनाथ यांच्या भावनेचं वर्णन करण्यासाठी 'डोनाल्डच्या यज्ञसोहळ्यात आदित्यनाथ सुरागुंग' अशी काही स्वदेशी म्हण नसल्यामुळे नाईलाजाने 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' याच त्यांना सपशेल नापसंत ठरणाऱ्या म्हणीने करावे लागेल.

……………………………

३. कोणतीही अट न ठेवता महापालिका निवडणुकीत युतीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मनसेसमोर शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवून मनसेला खिंडीत गाठले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवू नये अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मनसेने उमेदवार उभे केले नाही तर ते मराठी माणसाच्या हिताचा विचार करत असल्याचे स्पष्ट होईल, असे सेनेने म्हटले आहे.

'एकही मारा लेकिन सॉलिड मारा' हा एकच डायलॉग पाठ असल्याचा परिणाम. कधीतरी नियती 'इस थप्पड की गूँज जिंदगीभर सुनाई देगी' अशी स्थिती निर्माण करते. बाकी हे दोन कौटुंबिक वतनाप्रमाणे चालणारे पक्ष निवडणुकीत उतरले नाहीत, तर मराठी माणसाची काही खैर नाही वगैरे आत्मश्लाघा आता विनोदीही उरलेली नाही.

…………………………………..

४. संजय लीला भन्साळी निर्मित ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी उडी घेतली आहे. राणी पद्मावती या हिंदू होत्या. त्यामुळेच त्यांचं चुकीचं चित्रण केलं गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच हिंदू देवतांवर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवण्याची हिमत नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे. जे लोक भारताचा चुकीचा इतिहास दाखवत असतील तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावलं.

हे गिरीराज सिंह कोण आहेत? केंद्रीय मंत्री, सिनेमा अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ की गुडघ्यात मेंदू संघटनेचे सदस्य? संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीमध्ये राणी पद्मावतीची बदनामी झाली आहे किंवा चुकीचं चित्रण झालं आहे, हे ठरवण्याचा यांचा अधिकार काय? पद्मिनी ही ऐतिहासिक नव्हे, काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, हे यांच्या गावी नसणार, हे उघडच आहे; पण, नेमंक काय चित्रण झालंय, हे यांना कळलं कसं? मोहंमद पैगंबरांवर सिनेमा काढण्यापासून यांना कोणी अडवलंय? कोणीही अडाणी इसम भाजपकडून निवडणूक लढवू शकतो, तुम्ही एआयएमआयएमकडून लढून दाखवा, असं यांना कोणी म्हणालं तर? 

……………………………………….

५. माथेरानमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बेकायदा बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. 

हरित लवादाला तात्काळ हटवून माथेरानचा संपूर्ण विकास केला पाहिजे. सगळे रस्ते पक्के केले पाहिजेत. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. म्हणजे पर्यटकांना माथेरानमध्ये सर्वदूरपर्यंत पोहोचून निसर्गाची नासाडी करता येईल. स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय उत्तम प्रकारे चालणं महत्वाचं. माणूस निसर्गापेक्षा मोठा आहे. फार फार तर काय होईल, माथेरान हे हिल स्टेशनच राहणार नाही ना? ते माथेरानकरांचं नशीब!

…………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......