‘इंडिका’ : भारताच्या भूगोलाची चित्तथरारक कहाणी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजिंक्य कुलकर्णी
  • ‘इंडिका’चे इंग्रजी व मराठी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 July 2020
  • ग्रंथनामा शिफारस इंडिका Indica प्रणय लाल Pranay Lal

भूगोलाच्या अभ्यासाची फार मोठी परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांपासून भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे दाखले सापडतात. या अभ्यासाला गती प्राप्त झाली ती Cartography म्हणजे नकाशा तयार करण्याचे तंत्र शोधल्यानंतर. आधुनिक काळात उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाईट टेक्नॉलॉजी), जीपीएसच्या या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे. सध्या ‘भौगोलिक इतिहास’ हा शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांपुरताच मर्यादित झाला आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर काही पुस्तके अशी असतात, जी भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. असंच एक प्रणय लाल लिखित, नंदा खरे अनुवादित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक म्हणजे - ‘इंडिका’ होय.

हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणांत विभागलेलं आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतचा आढावा यात आहे. भौगोलिक इतिहासात एक कालमापनाची पायरी सर्वांत महत्त्वाची असते. त्यातले आकडे भयंकर मोठे असतात. त्याऐवजी या पुस्तकात नवीन युक्ती वापरलेली आहे. यात पृथ्वीच्या ४६० कोटी वर्षं वयासाठी ४६ वर्षीय स्त्रीचं रूपक योजल्यामुळे आकड्यांच्या जंजाळातून सुटका होते आणि समजायलाही सोपं जातं. पृथ्वी आणि चंद्राच्या आयुष्यातली सुरुवातीची दोन अब्ज वर्षं त्यावर सतत उल्काच आपटत होत्या. या उल्कापातामुळे पृथ्वीला हिरे, पाणी, सोने वगैरे अनेक खनिजं मिळाली. पुढे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली. वातावरणातील ऑक्सिजन वाढू लागला, सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होऊ लागले आणि ओझोनमुळे परत सूर्याची अतिनिल किरणे अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडायला सुरुवात होऊ लागली. ऑक्सिजन व कार्बन संयोग पावल्याने कार्बनडायऑक्साईड तयार होऊ लागला.

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सुरुवातीला बारा खनिजं होती. सूर्याभोवतीही हीच बारा खनिजं होती. सूर्याच्या उष्णतेनं पृथ्वीवर भूरासायनिक क्रिया सुरू होऊन इतर खनिजांची निर्मिती झाली. काळाच्या पटावर थेट पुढे एकपेशीय सजीवांच्या निर्मितीपर्यंत आलो तर असे लक्षात येते की, या एकपेशीय सजिवांच्या शरीररचना जास्त क्लिष्ट असतात. Mitochondria ज्याला ‘पॉवर हाऊस ऑफ सेल’ असं म्हटलं जातं, त्याची निर्मिती एकपेशीय सजीवात कशी झाली? पृथ्वीच्या आयुष्यात मग आल्या बुरश्या, परंतु त्यांनी अगदी थोडाच काळ वनस्पतींना मागे टाकलं होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf

..................................................................................................................................................................

भारतीय उपखंडात एक पेशीय सजीव कसे तयार झाले? त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? सागरात जशी प्राण्यांची निर्मिती झाली, तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशा प्रकारे झाली? भारतीय उपखंडातील सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला ‘इंडिका’त वाचायला मिळतो.

काही अद्भुत गोष्टीही यात वाचायला मिळतात. उदा. कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याकडे आढळत होते? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? तर काही माशांमध्ये शारीरिक बदल कसे झाले. या शारीरिक बदल होऊन टिकलेल्या छोट्या माशांपैकी Cypselurus प्रजातींचे मासे मोठ्या माशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्यापासून चक्क काही फूट उंच उडू शकतात. Lobe fish प्रकारातील मासे मात्र आज जवळपास नष्ट झाले आहेत.

भारतीय उपखंडातील जीवाष्म अभ्यास दाखवतो की, सूर्यस्नान करणाऱ्यांमध्ये हळूहळू मानेचे हाड व कवटी यांच्यातला सांधा बदलून तो लवचीक झाला आणि मान डावी-उजवीकडे वळवणे शक्य होऊ लागले. याचा फायदा होऊन पाण्यात वावरताना भक्ष्य पकडणे, अन्न चावणे, गिळणे या क्रिया सोप्या होऊ लागल्या. 

अकरावी-बारावीच्या जीवशास्त्रात फर्न (नेचे), सायकॅड या वनस्पतींचा समावेश आहे. मला व्यक्तीशः त्या वनस्पतींचा अभ्यास करायचा फार कंटाळा यायचा. प्रश्न पडायचा की, का करायचा या वनस्पतींचा अभ्यास? ‘इंडिका’ वाचल्यावर लक्षात समजतं की, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान जेव्हा जेव्हा ८०-९०° सेल्सियसपर्यंत गेलं आहे, त्या त्या वेळी फर्न व सायकॅड यांचं बी मातीआड तग धरून राहिलेलं आहे. पृथ्वीवर वनं रुजवण्यात, या दोन वनस्पतींचा सिंहाचा वाटा आहे.

‘प्राणी मोठे आणि अजस्त्र’ आणि ‘भारत नावाचे बेट’ या दोन प्रकरणांत भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपूर्वी कसं तयार झालं? भारतात कोणकोणत्या प्रकारच्या डायनासॉरचं वास्तव्य होतं? त्यांचे जीवाश्म कुठे कुठे सापडले आहेत? गोंडवाना प्रदेशा (मादगास्कर, ऑस्ट्रेलिया, भारत)पासून भारत वेगळा कसा झाला, भारताची निर्मिती कशी होत गेली? भारतीय उपखंडात हिमालय पर्वत कसा तयार झाला? याच्या चित्तथरारक गोष्टी वाचायला मिळतात. 

गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्याचा वेग हा भारताचा इतरांच्या तुलनेत सर्वांत जास्त होता. सुरुवातीला हा वेगळं होण्याचा वेग साधारणपणे आठ सेंटीमीटर प्रति वर्ष इतका जास्त होता. इतरांच्या तुलनेत हा नक्कीच जास्त होता. नंतरच्या काळात अस्मानी संकटामुळे डायनासॉर नष्ट झाले, पण १६ कोटी वर्षं या डायनासॉरनी या पृथ्वीतलावर राज्य केलं.

भारतात सापडणाऱ्या डायनासॉरबद्दल वाचताना वाटतं की, इतका भोगोलिक वारसा आपल्याकडे असताना शालेय अभ्यासक्रमात सातासमुद्रापलीकडे असणारे टुंड्रा प्रदेशात तांदूळ पिकतो का गहू, हे का शिकवतात? त्याऐवजी हा खजिना का उघडून दाखवला जात नाही?

अंटार्टिकावर जेवढा जास्त बर्फ जमा होईल तेवढा भारतात पाऊस कमी पडतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अंटार्टिकावर जितका कमी बर्फ जमा होईल, तेवढ्या जास्त क्षेत्रावरच्या पाण्याची वाफ होते. परिणामी भारतात मान्सून जास्त सुधारतो.

भारतातील नद्यांचा उगम कुठे कसा झाला, त्यात कोणकोणते बदल झाले, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा, नेवाशाला सापडलेली पुरातन हत्यारे याचा इतिहास वाचताना नकळत मराठी म्हणून आपला अहम सुखावतो.

या पुस्तकात तांत्रिक माहिती व शास्त्रीय शब्दांची रेलचेल आहे. जर ही माहिती नकोशी वाटली तर आपण काही पाने ओलांडून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे वाचनात कोणताही रसभंग होत नाही.

या अनुवादित पुस्तकात मुद्रितशोधनाच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत. ‘डीएनए’ हा शब्द ‘डिएने’ असा, तर ‘चेन्नई’ हा शब्द ‘चन्नै’ असा छापला गेला आहे. नकाशांखाली भारताचा उल्लेख ‘पिवळी चांदणी’ असा केला आहे आणि नकाशात प्रत्यक्षात ती दिसत नाही. त्यामुळे नकाशा वाचनात थोडी अडचण येते.

या चुका सोडल्यास पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनीय नक्कीच आहे.

..................................................................................................................................................................

‘इंडिका’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5153/Indica

.............................................................................................................................................

अजिंक्य कुलकर्णी

ajjukul007@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......