दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
  • Fri , 05 June 2020
  • सदर वास्तव-अवास्तव स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantryaveer Savarkar अजित पवार Ajit Pawar भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

सकाळचे साडेपाच वाजले होते. अजितदादांच्या लेखी ती मध्यरात्रच. फोन खणाणला. आगीच्या बंबाची घंटी वाजल्यासारखा दणदणीत आवाज घरात पसरला.

दादांना वाटलं कोणी तरी चुकून गजर लावून ठेवला. काय कटकट आहे असं म्हणत त्यांनी घड्याळावर थापटी मारली. तरी घंटी थांबली नाही. दादांच्या लक्षात आलं की फोन वाजतोय.

दादा जवळ जवळ झोपेतच होते.

फोन टेबलावर होता. दादा अंथरुणातून उठून टेबलाकडं गेले आणि त्यांनी फोन घेतला.

“प्रणाम” पलीकडून.

दादांना हे प्रणाम प्रकरण कळेना. त्यांच्या मस्तकात तिडीक गेली. आधी येवढ्या पहाटे फोन आणि त्यातून प्रणाम.

“काय प्रणामबिणाम लावलंय? कोण बोलतंय?” दादांनी अत्यंत त्रासिक आणि चिडलेल्या स्वरात विचारलं.

“मी भगतसिंग बोलतोय.” पलीकडून.

‘आता हा कोण भगतसिंग? स्वर्गात याला स्वस्थ बसवत नाही काय! कशाला माझी झोपमोड करतोय.’ मनात आलं पण ओठावर आलं नाही.

“अहो भगतसिंग, ही काय फोन करायची वेळ आहे काय? काय झालंय काय? मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला काय?” अजितदादा फोन आदळणारच होते तेवढ्यात पलीकडचा माणूस म्हणाला, “अहो भगतसिंग म्हणजे भगतसिंग कोश्यारी, माननीय राज्यपाल महोदय.”

अजितदादांच्या मनात आलं - हा स्वतःला माननीय म्हणवून घेतो. काय विनोदी माणूस आहे! अहो माननीय आणि महोदय हे इतरांनी म्हणायचं असतं. या येड्याला हेही कळत नाही… आता या महोदयांना काय हवंय?

दादा सावरले. म्हणाले, “बोला सर. जरा झोपेत होतो. सॉरी. तुमचा आवाज ऐकायची सवय नाहीये, त्यामुळं पटकन ओळखलं नाही. त्या दिवशी तुम्ही मला शपथ दिली होती. तेव्हा दोन शब्द बोलला होतात तेवढंच. त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं असतं, ते आम्हाला फडणवीसच सांगत असतात. त्यामुळं तशी तुमची थेट भेट होत नाही. माफ करा. काय सेवा करू?”

दादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उद्धवचं सरकार पाडणार आणि पुन्हा आपल्याला सरकार करायला बोलावणार काय? पण आता उपमुख्यमंत्रीपदावर भागणार नाही. थेट मुख्यमंत्रीपद किंवा संयुक्त मुख्यमंत्रीपद. क्षणाच्या हजाराव्या भागात दादांनी निर्णय घेऊन टाकला.

 “अहो आज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरसाहेबांचा जन्मदिवस.” कोश्यारी.

“ठीक आहे. मी ऑफिसमध्ये पोचल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन करेन.” दादा. फोन खाली ठेवण्याच्याच बेतात होते.

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. ते समुद्रात उडी मारलेले, तुरुंगात कोलू चालवणारे क्रांतिकारी सावरकर.” कोश्यारी.

“कळलं हो मला. मी ते सर्व वाचलंय. लहानपणी मी त्यांनी काढलेल्या प्रभात फेरीत भाग घेतला होता, ‘वंदे मातरम’ त्यांनीच मला शिकवलं, स्वातंत्र्यलढ्यात जनतेनं भाग घेतला, तो त्यांच्याच सांगण्यावरून, गांधीजींची थोरवी त्यांनीच जनतेला सांगितली. ते बरे आहेत ना? मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना कशाची जरूर असेल तर सांगा. व्यवस्था करेन.”

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. त्यांच्यासाठी आता काही करायची जरुरी नाही, ते त्या पलिकडं गेले आहेत.” कोश्यारी.

“कळलं हो मला. किती वेळा तेच तेच सांगत आहात. मला त्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे. फार मोठे आहेत ते. असा माणूस झाला नाही. त्यांचं जे आहे ते त्या ठिकाणी स्वातंत्र्याला असलेलं योगदान जे आहे ते फार मोठं आहे. त्यांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून फ्लॅट हवाय का? त्यांना म्हणावं की अर्ज करा. लगेच सँक्शन करून टाकतो.” दादा.

कोश्यारी गरगरले.

“अहो, स्वातंत्र्यवीरांनी कधी कोणाकडं काही मागितलं नाही. ब्रिटीश सत्तेपुढं त्यांनी कधीही तोंड वेंगाडलं नाही. पण ते जाऊ द्या. तो मुद्दा नाही. त्यांचा आज जन्मदिवस आहे.”

“अहो कोश्यारीसाहेब, मघापासून ही एकच गोष्ट तुम्ही मला सारखी सांगत आहात. मला कळलीय. मी माझ्या सेक्रेटरीला डायरीत लिहायला सांगतो. फोन ठेवू?” दादा.

“अहो मी काय बोलतोय, ते नीट ऐकून घ्या. सावरकरांबद्दल तुम्हा काँग्रेसवाल्यांची वेगळी मतं आहेत ते मला माहीत आहे. पण तो मुद्दा नाही. त्यांचं देशावर प्रेम होतं, देश स्वतंत्र व्हावा यासाठी त्यांनी कठोर तुरुंगवास सोसला हे तर तुम्हालाही मान्य असणार. पण तो मुद्दा नाही. आज त्यांचा जन्मदिवस आहे.” कोश्यारी.

काय कटकट आहे यार, असं दादा स्वतःशीच बोलले.

“त्यांना काय हवंय ते सांगायला ते तयार नाहीत. तुम्ही तरी एकदाचं सांगून टाका आणि विषय संपवा. परवा काकांच्या बोलण्यात काहीतरी विषय होता. काका म्हणत होते की, फडणविसांचंच सरकार केंद्रात असूनही सावरकरांना भारतरत्न दिलेली नाही. भारतरत्न काही आम्ही महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. तुम्हाला शिफारसपत्रं हवंय का? लगेच देतो. पण विषय संपवा.” दादा.

दादांच्या घरातली आणखी एक-दोन माणसं येऊन दादांच्या बाजूला उभी राहिली. ती माणसं बुचकळ्यात.

दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.

कोश्यारी काकुळतीला आले.

“तुम्हाला मागण्याच कळतात तर मागणी करतो. आज मंत्रालयात जाऊन सावरकरांच्या फोटोला हार घाला.” कोश्यारी.

“हात्तिच्या. येवढी बारीकशी गोष्ट सांगण्यासाठी किती फूटेज खाल्लं तुम्ही राव. फोटो पाठवून द्या. हार घालून टाकू.” दादांनी सुस्कारा टाकला.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......